शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
2
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
3
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
4
पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
5
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
6
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
7
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
8
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
9
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
10
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
11
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
12
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
13
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
14
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
15
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
16
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
17
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
18
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
19
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
20
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
Daily Top 2Weekly Top 5

महात्मा फुलेंच्या विज्ञाननिष्ठ विचारांची गरज

By admin | Updated: June 24, 2014 00:54 IST

महात्मा जोतिबा फुले यांचे साहित्य हे मानवतावादी व विज्ञाननिष्ठ असून त्यांचे विचार तळागाळापर्यंत पेरण्याची गरज आहे. फुले यांनी केवळ दलितांसाठीच नव्हे तर ब्राह्मण विधवांच्या अस्तित्वासाठीही जीवाचे

मा. म. देशमुख यांचे प्रतिपादन : मोर्शी येथे राज्यस्तरीय सत्यशोधक साहित्य संमेलनअमरावती : महात्मा जोतिबा फुले यांचे साहित्य हे मानवतावादी व विज्ञाननिष्ठ असून त्यांचे विचार तळागाळापर्यंत पेरण्याची गरज आहे. फुले यांनी केवळ दलितांसाठीच नव्हे तर ब्राह्मण विधवांच्या अस्तित्वासाठीही जीवाचे रान केले, असे प्रतिपादन प्रसिध्द विचारवंत मा.म. देशमुख यांनी केले. उपेक्षित समाज महासंंघ व अ.भा. माळी महासंघाच्यावतीने मोर्शी येथील मडघे मंगल कार्यालयात आयोजित चवथ्या राज्यस्तरीय महात्मा फुले सत्यशोधक साहित्य संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. प्रारंभी नगरपरिषदेचे उपाध्यक्ष मोहन मडघे यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. त्यानंतर वैशाली धाकुलकर यांनी महात्मा फुलेंच्या अखंडाचे तर उत्तमराव भैसने यांनी संत गाडगेबाबा यांचे प्रबोधनपर गीत सादर केले. अध्यक्षस्थानी नागपूर येथील फुलेवादी विचारवंत मा.म. देशमुख होते. लेखिका रजिया सुलताना, लोकसाहित्याच्या अभ्यासक निर्मला गोरडे प्रामुख्याने उपस्थित होत्या. व्यासपीठावर प्रेम सातपुते, संतोष हुशे, मनोहर आंडे, अखिल भारतीय माळी महासंघाचे शहराध्यक्ष प्रवीण ढवळे, बबन पाटील, गणेश खारकर, श्रीधर पाचघरे, भाऊसाहेब पेठे, प्राचार्य चंदनकर, दिलीपसिंग गिरासे, केशव कांडलकर, जीवन कडू, श्रीकृष्ण माहोरे, कमलाकर घोंगडे, प्रवीण बनसोेड, महेंद्र मेटे, सुशीला मडघे, दीपक खवले, प्राचार्य रामराव वानखडे, नीळकंठ यावलकर, राजेंद्र आंडे, दिलीप लोखंडे, गिरीश खारकर आदी उपस्थित होते. ‘महात्मा फुले आणि सध्याच्या शिक्षण व्यवस्थेची दिशा’, ‘महात्मा फुले, सावित्रीबाई फुले आणि आजच्या महिलांची मानसिकता’, ‘महात्मा फुलेंच्या क्रांतिकार्यामागील प्रेरणा’, ‘महात्मा फुले व सावित्रीबाई फुलेंच्या साहित्यातील मानवतावाद’, ‘सत्यशोधक समाज चळवळीची गरज’ आदी विषयांवरील परिसंवादातून विचारवंतांनी अभ्यासपूर्ण विचार मांडले. परिवर्तनवादी कविसंमेलनात २० कवींनी कविता सादर केल्यात. फुले यांच्या जन्मदिनी (११ एप्रिल रोजी) राष्ट्रीय उत्सव जाहीर करून सार्वजनिक सुटी जाहीर करण्याची एकमुखी मागणी करण्यात आली. याप्रसंगी मनोहर आंडे यांनी पाचवे राज्यस्तरीय महात्मा फुले साहित्य संमेलन वरूड येथे घेण्याचा निर्धार व्यक्त केला. आभार राजेंद्र मेहरे यांनी मानले. (प्रतिनिधी)