शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

विकासाकरिता प्रक्रिया उद्योगांची गरज

By admin | Updated: November 26, 2014 01:03 IST

राज्याच्या विकासासाठी आखलेल्या ‘व्हिजन महाराष्ट्र’चा आराखडा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी संक्षिप्तपणे मांडला. लोकमत वृत्तपत्रसमूहाचे संस्थापक संपादक, स्वातंत्र्यसेनानी श्रद्धेय

देवेंद्र फडणवीस : ‘व्हिजन महाराष्ट्र’ संकल्पनेचा मांडला आराखडा यवतमाळ : राज्याच्या विकासासाठी आखलेल्या ‘व्हिजन महाराष्ट्र’चा आराखडा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी संक्षिप्तपणे मांडला. लोकमत वृत्तपत्रसमूहाचे संस्थापक संपादक, स्वातंत्र्यसेनानी श्रद्धेय जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या १७ व्या स्मृतिदिनी ‘प्रेरणास्थळ’ येथे ‘व्हिजन महाराष्ट्र’अंतर्गत मुख्यमंत्र्यांनी उद्योग, विदर्भाचा विकास, बेरोजगारी, शेतकरी आत्महत्या, कापूस, सिंचन आणि दुष्काळासोबतच अनेक मुद्दे उपस्थित केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लोकमत मीडिया प्रा.लि.चे चेअरमन, खासदार विजय दर्डा हे होते. राज्याचे माजी शिक्षणमंत्री तसेच लोकमत वृत्तपत्र समूहाचे ‘एडिटर इन चीफ’ राजेंद्र दर्डा हे देखील प्रामुख्याने उपस्थित होते.पंचनाम्याची अट रद्द होणारराज्यातील १९ हजार गावांमध्ये दुष्काळाची स्थिती निर्माण झाली आहे. मदतीसाठी व्यक्तिगत पंचनाम्याची अट या गावांतील शेतकऱ्यांना अडचणीची ठरत आहे. व्यक्तिगत पंचनाम्यामुळे मदत मिळण्यासाठी दोन महिन्यांचा कालावधी लागतो. या अटीला शिथिल करण्याची मागणी केंद्र शासनाकडे करण्यात आली आहे. केंद्र सरकारची याबाबतीत सकारात्मक भूमिका आहे. परंतु काही तांत्रिक मुद्दे सोडविणे बाकी आहे. त्यानंतर तत्काळ व्यक्तिगत पंचनाम्याची अट रद्द करण्याचे आदेश जारी करण्यात येतील, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली.राज्यामध्ये मोठे उद्योग न येण्याचे कारण म्हणजे उद्योगांसाठी अनुकूल वातावरण नसणे. एक कारखाना लावण्यासाठी उद्योजकांना ७६ निरनिराळ्या विभागांकडून परवानगी मिळवावी लागते. त्यामुळे ते येथे येण्यासाठी उत्सुक नाहीत. यावर तोडगा काढण्यासाठी समिती बनविण्यात आली आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.