शहरं
Join us  
Trending Stories
1
IND W vs PAK W "म्हारी छोरियां छोरो से कम है के.." हरमनप्रीत ब्रिगेडनंही पाकची जिरवली!
2
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
3
मुंबईतील राजकीय नेत्याच्या मुलाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, शौचालयात गाठले आणि...
4
IND vs AUS : बढती मिळताच अय्यरनं टीम इंडियाला जिंकून दिली ट्रॉफी; घरच्या मैदानात कांगारुंची शिकार
5
गाझातील सत्ता सोडण्यास नकार दिल्यास हमासची धुळधाण उडवू, डोनाल्ट ट्रम्प यांची ताकिद 
6
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
7
Muneeba Ali Controversial Run Out : हुज्जत घालून पाक क्रिकेटच्या इज्जतीचा फालुदा; असं काय घडलं?
8
हिमालयात दार्जिलिंगपासून माऊंट एव्हरेस्टपर्यंत विध्वंस, ६० हून अधिक मृत्यू, कारण काय?
9
IND vs AUS : ३०० पारच्या लढाईत अभिषेक-तिलकनं तलवार केली म्यान; वादळी शतकासह प्रभसिमरन सिंगची हवा
10
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
11
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
12
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
13
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
14
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
15
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
16
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
17
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
18
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
19
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
20
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार

बांगला संस्कृती नवीन पिढीपर्यंत पोहोचवण्याची गरज

By admin | Updated: June 27, 2015 03:18 IST

महाराष्ट्र आणि बंगाल हे दोन्ही राज्य असे आहेत जिथे कला, साहित्य, शिल्प आणि संगीत यांच्यात उल्लेखनीय प्रगती झाली आहे.

जागतिक बांगला संमेलनाला सुरुवात : नितीन गडकरी यांचे प्रतिपादन नागपूर : महाराष्ट्र आणि बंगाल हे दोन्ही राज्य असे आहेत जिथे कला, साहित्य, शिल्प आणि संगीत यांच्यात उल्लेखनीय प्रगती झाली आहे. आजही साहित्य, कला आणि सस्कृतीच्या प्रगतीसाठी दोन्ही राज्यात अनुकूल वातावरण आहे. दोन्ही राज्यांकडे साहित्य, कला व संगीताचा समृद्ध वारसा असून नवीन पिढीपर्यंत तो पोहोचविण्याची गरज आहे. कारण राष्ट्राची निर्मिती करायची असेल तर संस्कृतीप्रति तरुणांना जागरूक करावे लागेल, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी केले. डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात आयोजित जागतिक बांगला संमेलनाचे उद्घाटन नितीन गडकरी यांच्या हस्ते शुक्रवारी करण्यात आले. त्याप्रसंगी ते बोलत होते. तीन दिवस चालणाऱ्या या संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी त्रिपुऱ्याचे राज्यपाल तथागत रॉय, बांगलादेशचे उच्चायुक्त सय्यद मुअज्जिम अली, सर्वोच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायाधीश विकास सिरपूरकर, गोदावरी फाऊंडेशन जळगावचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील, विश्व भारती विद्यापीठ शांतिनिकेतन(पश्चिम बंगाल)चे कुलगुरू डॉ. सुशांत दत्तगुप्ता, माजी खासदार बनवारीलाल पुरोहित, आ. अनिल सोले प्रमुख अतिथी होते. कार्यक्रमाच्या सुुरुवातीला प्रसिद्ध बांगला गायक सूरमणी पं. शंकर भट्टाचार्य यांनी मंगल गायन केले. यानंतर स्वागतगीत सादर करण्यात आले. शाल, पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी जागतिक बांगला संमेलनावर विशेष स्मरणिका ‘बंग-विहंग’ प्रकाशित करण्यात आली. संचालन संमेलनाच्या महासचिव लीली मुखर्जी, पिनाकी बॅनर्जी यांनी केले. बिबेक कुमार मुखर्जी यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)कला-साहित्य क्षेत्रातील प्रसिद्ध मान्यवरांचा सत्कार बंगाली साहित्य, कला व संस्कृतीचा प्रचार, प्रसार करण्यास ज्यांनी आपले आयुष्य खर्ची घातले अशा प्रसिद्ध मान्यवरांचा यावेळी विशेष सत्कार करण्यात आला. यात बांगला साहित्यिक, नाटककार, गीतकार व लेखक मणिशंकर मुखोपाध्याय, मूक अभिनयाद्वारे भावनांच्या अभिव्यक्तीला कलेचे रूप देऊन जगभरात सादरीकरण करणारे जोगेश दत्त, आॅलिम्पिकमध्ये खेळणारे प्रसिद्ध फुटबॉलपटू चुनी गोस्वामी तसेच बंगालमध्ये प्रसिद्ध असलेले मराठी लेखक महेश एलकुंचवार, बांगला आणि मराठी साहित्यात सेतूचे काम करणाऱ्या मृणालिनी केळकर, राम म्हैसाळकर आणि जागतिक बांगला संमेलनाचे संस्थापक सदस्य डॉ. अजय मुखर्जी यांना सन्मानित करण्यात आले. आज दोन सत्रात विविध कार्यक्रम जागतिक बांगला संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी शनिवारी सकाळी ९.३० वाजता पहिले सत्र सुरू होईल. यात बंगाली समाजातील विचारवंतांचे चर्चासत्र होईल. वाजता सुमंत्रा सेन गुप्ता यांचा पाठ, १२ वाजता गायन, १ वाजता प्रसिद्ध कलावंत जोगेश दत्ता यांचे मूक सादरीकरण, सायंकाळच्या सत्रात ईरा मुखर्जी यांचे गायन, ७.३० वाजता ऋषी बॅनर्जी यांचे गायन, ८.१५ वाजता नृत्य नाटक होईल.