शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

कारखाने, बांधकाम साईटजवळ प्रभावी वायूप्रदूषण नियंत्रणाची गरज : नीरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2021 04:07 IST

नागपूर : उद्याेगक्षेत्र, कारखाने तसेच बांधकाम साईटजवळ वायूप्रदूषण नियंत्रणासाठी प्रभावी सिस्टीमची गरज आहे आणि त्यासाठी पर्णसांभार असलेल्या झाडांची ...

नागपूर : उद्याेगक्षेत्र, कारखाने तसेच बांधकाम साईटजवळ वायूप्रदूषण नियंत्रणासाठी प्रभावी सिस्टीमची गरज आहे आणि त्यासाठी पर्णसांभार असलेल्या झाडांची त्या भागात लागवड करणे आवश्यक असल्याचे मत नीरीच्या तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

नागपूर महापालिकेने राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशाेधन संस्था (नीरी) साेबत शहरातील वायू प्रदूषण कमी करण्यासाठी माेहीम हाती घेतली आहे. नुकतेच महापाैर दयाशंकर तिवारी यांनी नीरीच्या टीमसाेबत प्रदूषण स्तर अधिक असलेल्या भागामध्ये विशिष्ट प्रजातीच्या झाडांची लागवड करण्याच्या नियाेजनावर चर्चा केली. लाेकमतने नीरीचे प्रदूषण आणि वृक्षाराेपण तज्ज्ञांची प्रकल्पाविषयी मते जाणून घेतली. नीरीच्या पद्मा राव व डाॅ. लाल सिंग यांनी, पर्णसांभार अधिक असलेले, वायू प्रदूषण साेशनाची क्षमता असलेले, वातावरणातील कार्बन साेशून पाणी वाचविणारी, मुळे बांधण्याची क्षमता असलेली तसेच कमी पाणी लागणारी झाडे लागवड करण्याची गरज आहे. यामध्ये स्नेक प्लॅन्ट, ॲलाेविरा, बाभूळ, कदम, कडूलिंब, गुलमाेहर, अशाेक तसेच कायम हरीत राहणारी झाडे, झुडपे, गवत अशा धूळ साेशणारे पर्णसांभार असलेल्या झाडांचा समावेश असताे. शहरी वातावरणात वायू प्रदूषण, धूळ व ध्वनिप्रदूषणही कमी करण्यात झाडे महत्त्वाची भूमिका बजावतात. झाडांची लागवड केली तरीही त्यांना वाढायला वेळ लागताे. डाॅ. लाल सिंग म्हणाले, काेणत्या प्रकारची झाडे लावण्यासाेबत त्यांची काळजी घेणे महत्त्वाचे आहे. एकदा ती वाढली की त्याचे परिणाम चांगलेच येतात. रस्ते दुभाजक, रस्त्याच्या कडेला, पायवाटेच्या शेजारी व उद्यानात वृक्षाराेपण करणे आवश्यक आहे.

केवळ वृक्षाराेपण हा एकमेव पर्याय नाही तर इतर टप्पेही महत्त्वाचे आहेत. पद्मा राव म्हणाल्या, वायू प्रदूषण नियंत्रण सिस्टिमद्वारे प्रदूषण कमी करावे लागेल. हरित अंत्यसंस्कार व माेबाईल उर्त्सजन निरीक्षणही आवश्यक आहे. रस्त्यावरील धूळ नियंत्रणासह बांधकाम व ताेडण्यादरम्यान हाेणाऱ्या धुळीच्या उत्सर्जनावर नियंत्रण तसेच स्वयंपाक चुलीवरील धुराच्या उत्सर्जनाबाबत सुधारणा करण्याची गरज पद्मा राव यांनी व्यक्त केली. गर्दीतील घुसमट राेखण्यासाठी रस्ते रुंदीकरण, उद्याेगांसाठी साैर ऊर्जेचा उपयाेग करणे, कारखान्यांजवळ ग्रीन बेल्ट तयार करणे आणि उद्याेग क्षेत्रात प्रभावी वायू प्रदूषण सिस्टीम लावणे महत्त्वाचे असल्याचे डाॅ. लाल सिंग म्हणाले.

पर्यावरणवादी काैस्तुभ चटर्जी यांनी सांगितले, नागपुरात धुलीकण (पीएम२.५ व पीएम१०) हे प्रदूषणाचे माेठे कारण आहे. हे बांधकाम प्रक्रियेमुळे धुलीकणांच्या प्रदूषणात वाढ झाली आहे. त्यामुळे धुलीकण व कार्बन साेशणारे, प्राणवायू साेडणारे व ध्वनी प्रदूषणही साेशून घेणारी झाडे लावणे आवश्यक आहेत. मात्र नागपूरसारख्या शहरात २० च्यावर हवा निरीक्षण स्टेशन असणे आवश्यक आहे. विविध प्रकल्पामुळे नागपूरचे ग्रीन कव्हर घटत चालले आहे, त्यामुळे ते वाढविण्यासाठी उपाय करणे आवश्यक असल्याचे चटर्जी यांनी आवर्जून सांगितले.

पर्णसांभार व वायू प्रदूषण साेशण्याची क्षमता असलेली झाडे

बाभूळ, बेल, महारुक, चितवन, कदम, लिंब, शिशम, गुलमाेहर, वड, पाकर, पिंपळ, अशाेक, आम्रा, जांभूळ, चिंच, बाेर आदी.