शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
2
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
3
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
4
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
6
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
7
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
8
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
9
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
10
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
11
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
12
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
13
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
14
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
15
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
16
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
17
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
18
डे-वन टेक-ऑफ घेण्यासाठी नवी मुंबई विमानतळ सज्ज; २५ डिसेंबरपासून व्यावसायिक उड्डाणांना हाेणार सुरुवात
19
आज मुंबई आयआयटीत  रंगणार ‘टेकफेस्ट’चा जागर; तंत्रज्ञानाचा महाकुंभ अनुभवण्याची तरुणाईला संधी
20
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
Daily Top 2Weekly Top 5

वन व पर्यावरण कायद्यात बदलाची गरज

By admin | Updated: November 23, 2014 00:38 IST

भारतात विपुल प्रमाणात नैसर्गिक साधनसंपत्ती आहे. परंतु वन व पर्यावरण कायद्यामुळे तिचा हवा तसा वापर करता येत नाही. अशा विकासाआड येणाऱ्या कायद्यात बदल करण्याची गरज असल्याचे

हंसराज अहिर यांचे प्रतिपादन : व्हीएनआयटीमध्ये राष्ट्रीय संमेलननागपूर : भारतात विपुल प्रमाणात नैसर्गिक साधनसंपत्ती आहे. परंतु वन व पर्यावरण कायद्यामुळे तिचा हवा तसा वापर करता येत नाही. अशा विकासाआड येणाऱ्या कायद्यात बदल करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहिर यांनी शनिवारी के ले. विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थेच्या (व्हीएनआयटी) मायनिंग विभाग आणि माजी विद्यार्थी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने असेम्ब्ली हॉलमध्ये आयोजित ‘खनिज उद्योग व विकासातील आव्हाने’ यावरील द्विदिवसीय राष्ट्रीय कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी व्हीएनआयटीचे चेअरमन विश्राम जामदार होते. आमदार अनिल सोले, संयोजन समितीचे अध्यक्ष अनुप बिस्वास, मायनिंग विभागाचे प्रमुख टी.एल.मुथराज व प्रा. एम.एस. तिवारी आदी व्यासपीठावर होते. अहिर म्हणाले, वाढती लोकसंख्या व बेरोजगारी या देशापुढील गंभीर समस्या आहेत. यावर मात करण्याची गरज आहे. कृषी क्षेत्रात रोजगाराच्या संधी आहेत. यासाठी कृषीवर आधारित प्रक्रि या उद्योग उभे झाले पाहिजे. कृषीनंतर मायनिंग क्षेत्रातच रोजगारांच्या संधी आहेत. त्या उपलब्ध करण्यासाठी नवीन तंत्रज्ञान व संशोधनाची गरज आहे. परंतु वन तसेच पर्यावरण कायद्यामुळे विकासाला ब्रेक लागत असल्याने या कायद्यात सुधारणा करणे गरजेचे आहे. कोळसा प्रामुख्याने वन विभागाच्या जमिनीत आढळतो. कोल इंडियाने स्वत:चे ब्लॉक खासगी कंपन्यांना देण्याचे धोरण स्वीकारले. ही शोकांतिकाच म्हणावी लागेल. दुसरीकडे वन व पर्यावरण कायद्यामुळे कंपन्या उत्खनन करू शकत नाही. यातून मार्ग काढण्याची गरज आहे. आपल्या देशातील शेतकऱ्यांची रासायनिक खताची गरज आयात करून भागवली जाते. नैसर्गिक संपत्तीचा योग्य वापर झाला पाहिजे. यासाठी संशोधनाची गरज आहे. या संमेलनाच्या माध्यमातून देशात नवा संदेश जाईल. मायनिंग क्षेत्रात मोठ्या प्रमाणात रोजगार वाढीला मदत होईल, असा विश्वास अहिर यांनी व्यक्त केला. देशातील नैसर्गिक धनसंपदेचा वापर विकासासाठी झाला पाहिजे. कार्यशाळेत तज्ज्ञांचे मार्गदर्शन लाभणार आहे. या माध्यमातून विकासाला चालना मिळेल. मायनिंग क्षेत्राला भविष्यात चांगले दिवस असल्याचा विश्वास विश्राम जामदार यांनी व्यक्त केला. अनिल सोले, टी.एल.मुथराज यांनीही यावेळी मार्गदर्शन केले. कार्यशाळेला देशभरातील विविध संस्थांचे तज्ज्ञ, प्रतिनिधी सहभागी झाले आहेत. (प्रतिनिधी)