शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; स्ट्राँग रुम उघडण्यात आल्या, मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

अपंगांना मुख्य प्रवाहात आणण्याची गरज

By admin | Updated: August 26, 2014 01:03 IST

समाजातील अपंग व्यक्तींकडे दुर्लक्ष केले जाते. प्रसंगी त्यांना चांगली वागणूक दिली जात नाही. व्यक्ती अपंग असली तरी ती समाजाचा एक घटक आहे. या घटकांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याची गरज आहे,

अनिल देशमुख : कृत्रिम अवयव व साहित्य वाटप कार्यक्रमकाटोल : समाजातील अपंग व्यक्तींकडे दुर्लक्ष केले जाते. प्रसंगी त्यांना चांगली वागणूक दिली जात नाही. व्यक्ती अपंग असली तरी ती समाजाचा एक घटक आहे. या घटकांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याची गरज आहे, असे प्रतिपादन राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री अनिल देशमुख यांनी केले.वसंतराव देशमुख देशमुख प्रतिष्ठान, भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम कानपूर व नागपूर जिल्हा अपंग पुनर्वसन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने काटोल येथे कार्यक्रमाचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. त्यात प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. यावेळी देशमुख यांच्या हस्ते काटोल विधानसभा मतदारसंघातील अपंगांना कृत्रिम अवयव व साधानांचे वाटप करण्यात आले. या प्रसंगी बोलताना ते म्हणाले, शासनाच्यावतीने अपंगांच्या कल्याणासाठी विविध योजना राबविल्या जातात. मंत्रिपदाच्या कार्यकाळात आपण काटोल विधानसभा मतदारसंघातील गरजूंपर्यंत शासकीय व निमशासकीय योजना पोहोचविल्या आहेत. या योजनांचा वेळीच लाभ मिळाल्याने अनेक गरजवंतांना मोठी मदत झाली आहे. या योजनांचा लाभ मिळाल्यानंतर अनेकांचे जीवन सुखकर झाले आहे. आज या मतदारसंघातील शेकडो गरजू अपंगांचे जीवन सुखकर होणार आहे. त्यांना मोफत कृत्रिम अवयवांचे व साहित्याचे वाटप आपल्या हस्ते होत असल्याने हा आपल्या जीवनातील सर्वात मोठा आनंदाचा क्षण असल्याचेही त्यांनी सांगितले. या योजनेंतर्गत नरखेड व काटोल तालुक्यातील सर्व प्रवर्गातील व वयोगटातील अपंग व्यक्तींचा शोध घेण्यात आला. ८ फेबु्रवारी २०१४ रोजी नरखेड व १० फेब्रुवारी २०१४ रोजी काटोल येथे शिबिराचे आयोजन करून या अपंगांच्या अवयवाचे मोजमाप घेण्यात आले. या मोजमाप शिबिरात नरखेड व काटोल तालुक्यातील अस्थिव्यंग, मतिमंद, सेरेब्रल पाल्सी, बहुविकलांग, कर्णबधिर, अंशत: अंध, अंध या प्रवर्गातील एकूण ९५३ अपंग व्यक्तींचे त्यांच्या गरजेनुसार आवश्यक असणारे कृत्रिम अवयव व साहित्य व साधने यांचे मोजमाप घेण्यात आले होते. या सर्व व्यक्तींना कृत्रिमम अवयव व साहित्याचे नुकतेच वितरण करण्यात आले. (प्रतिनिधी)