शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

आवश्यकतेनुसार होणाऱ्या संशोधनाचा स्थानिकांना लाभ व्हावा - गडकरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2022 18:00 IST

स्व. दादासाहेब काळमेघ उत्कृष्ट संशोधक पुरस्कार वितरणप्रसंगी ते बोलत होते.

ठळक मुद्देस्व. दादासाहेब काळमेघ उत्कृष्ट संशोधक पुरस्कार प्रदान

नागपूर : विदर्भात कापूस आहे; पण संशोधन नाही, कोळसा आहे; पण संशोधन नाही, संत्रा आहे; पण त्यावर प्रक्रिया करणारे उद्योग नाहीत. ज्या प्रदेशात ज्या वस्तूंचे अधिक उत्पादन आहे, त्या उत्पादनांवर संशोधन करून मूल्यवर्धन करण्यास प्राधान्य द्यावे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे आवश्यकतेनुसार होणाऱ्या संशोधनाचा स्थानिकांना लाभ झाला पाहिजे, असे मत केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले.

स्व. दादासाहेब काळमेघ उत्कृष्ट संशोधक पुरस्कार वितरणप्रसंगी ते बोलत होते. देशात संशोधन करण्याच्या खूप संधी आणि क्षमताही असून हा देशाला आत्मनिर्भर करण्याचा मार्ग आहे. ज्ञानाचे व कचऱ्याचे मूल्यवर्धन करून संपत्तीत रूपांतर करणे हे भविष्यासाठी आवश्यक आहे. संशोधन आणि विकासाची देशाला मदत होऊ शकते. आपल्याकडे संशोधकही आहे. सर्वच क्षेत्रांत आवश्यकतेनुसार संशोधन करण्याची गरज आहे. संशोधनासोबतच विज्ञान, तंत्रज्ञान, कौशल्य या चतु:सूत्रीचा योग्य वापर झाल्यास देशाच्या प्रगतीला चालना मिळून देश प्रत्येक क्षेत्रात आत्मनिर्भर होऊ शकेल. यासाठी संशोधनाला प्रोत्साहन मिळाले पाहिजे. हे संशोधन खासगी संशोधन संस्थांच्या माध्यमातून व्हावे. संशोधनातून यश मिळाले नाही म्हणून खचून जाण्याची आवश्यकता नाही, असे गडकरी म्हणाले.

यावेळी माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, डॉ. वेदप्रकाश मिश्रा, स्व. दादासाहेब काळमेघ दंत महाविद्यालयाच्या संशोधन सल्लागार समितीचे अध्यक्ष डॉ. जी. डी. यादव, डॉ. शर्मा, अनंत घारड, अरुण लखानी, शरद काळमेघ, हेमंत काळमेघ प्रामुख्याने उपस्थित होते.

सीएसआर फंड एक टक्क्याने वाढवून संशोधनावर खर्च व्हावा

देशात संशोधन संस्कृती रुजल्यास सुपर पॉवर होण्याचे स्वप्न वास्तवात साकारणे शक्य आहे. यासाठी सीएसआर फंड (सामजिक दायित्व निधी) २ वरून ३ टक्क्यांवर नेण्यात यावा. यातील एक टक्का फंड केवळ संशोधनावर खर्च करण्यात यावा, असे आवाहन माजी केंद्रीय मंत्री खा. प्रकाश जावडेकर यांनी केले.

टॅग्स :PoliticsराजकारणNitin Gadkariनितीन गडकरीResearchसंशोधन