शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
2
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
3
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
4
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
5
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
6
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
7
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
8
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
9
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
10
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
11
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
12
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
13
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
14
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
15
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
16
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
17
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
18
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
19
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
20
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!

नक्षलींना विकासानेच पराभूत करणे शक्य

By admin | Updated: May 13, 2017 02:47 IST

नक्षलींच्या भीतीमुळे गडचिरोली जिल्ह्याचा विकास थांबला होता. परंतु, यापुढे गडचिरोली जिल्ह्यात नवीन उद्योग उभारले जातील.

देवेंद्र फडणवीस यांचे मत : नागरिकांचे विकासाला समर्थन लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : नक्षलींच्या भीतीमुळे गडचिरोली जिल्ह्याचा विकास थांबला होता. परंतु, यापुढे गडचिरोली जिल्ह्यात नवीन उद्योग उभारले जातील. नक्षलींना विकासानेच पराभूत केले जाऊ शकते, असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. फडणवीस यांच्या हस्ते शुक्रवारी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. पी. एल. भांडारकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ उत्कृष्ट नवोदित वकील पुरस्कार प्रदान करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. लॉयडस् मेटल अ‍ॅन्ड एनर्जी कंपनीला गडचिरोली जिल्ह्यात स्पाँज आयर्न प्रकल्प सुरू करण्यासाठी शुक्रवारी जमीन हस्तांतरित करण्यात आली. यापूर्वी अनेक उद्योजकांनी गडचिरोली जिल्ह्यात प्रकल्प टाकण्यास नकार दिला होता. त्यामुळे ही नवीन सुरुवात आहे. गडचिरोली जिल्ह्यात मुबलक खनिज संपत्ती असून विकासाकरिता त्याचा उपयोग करणे आवश्यक आहे. स्थानिक नागरिकांना नक्षलवाद नको आहे. त्यांना विकासाची ओढ आहे. त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात यायचे आहे, असे फडणवीस म्हणाले. डॉ. पी. एल. भांडारकर थोर विचारवंत होते. त्यांच्या नावाच्या पुरस्काराने नवोदित वकिलांना चांगले काम करण्यास प्रोत्साहन मिळेल. परंतु, वकिलांनी जीवनात केवळ पैसा कमवायच्या मागे लागू नये. त्यांनी समाज व देशासाठी योगदान द्यावे. केवळ स्वत:साठी जगणाऱ्यांना समाज कधीच लक्षात ठेवत नाही, असे फडणवीस यांनी सांगितले. हा कार्यक्रम विदर्भ लेडी लॉयर्स असोसिएशनच्यावतीने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठातील सभागृहात आयोजित करण्यात आला होता. व्यासपीठावर पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे प्रशासकीय न्यायमूर्ती भूषण गवई, राज्याचे महाधिवक्ता अ‍ॅड. रोहित देव, संघटनेच्या अध्यक्षा अ‍ॅड. पद्मा चांदेकर, सचिव अ‍ॅड. रितू कालिया हे उपस्थित होते. ‘लोकमत’चे राकेश घानोडे सन्मानित ‘लोकमत’चे उपसंपादक राकेश घानोडे यांना डॉ. पी. एल. भांडारकर स्मृती उत्कृष्ट विधी पत्रकार पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे प्रशासकीय न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. ‘लोकमत’मध्ये गेल्या वर्षभरात छापून आलेल्या उच्च न्यायालयातील दैनंदिन घडामोडीच्या बातम्या, विशेष बातम्या, बातम्यांतील तांत्रिक अचूकता इत्यादी बाबी घानोडे यांची पुरस्कारासाठी निवड करताना लक्षात घेण्यात आल्या. वकिली महान व्यवसाय आहे. या व्यवसायाला श्रीमंत परंपरा लाभली आहे. अनेक वकिलांनी स्वातंत्र्य लढ्यात स्वत:ला झोकून दिले होते. देशाची व समाजाची सेवा केल्याने मनाला समाधान मिळते. वकिलांनी ज्ञान मिळविण्यावर जास्त भर द्यावा. - न्यायमूर्ती भूषण गवई नवोदित वकिलांना प्रोत्साहित करण्याची व्यवस्था सध्या नाही. त्यामुळे असे पुरस्कार वकिलांचे मनोबल उंचावतात. आजचे वकील प्रतिभावंत आहेत. न्यायमूर्ती वेळोवेळी त्यांच्या पाठीवर थाप ठेवत असतात. - अ‍ॅड. रोहित देव डॉ. पी. एल. भांडारकर स्मृती पुरस्कार प्रदान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अ‍ॅड. प्रवीण अग्रवाल, अ‍ॅड. स्विटी भाटिया व अ‍ॅड. समीर सोनवणे यांना डॉ. पी. एल. भांडारकर स्मृती उत्कृष्ट नवोदित वकील पुरस्कार प्रदान करण्यात आला. पंचांमध्ये कुटुंब न्यायालयाच्या सेवानिवृत्त प्रधान न्यायाधीश मीरा खडक्कार, वरिष्ठ वकील सुनील मनोहर, अ‍ॅड. अरुण पाटील व अ‍ॅड. कल्पना पाठक यांचा समावेश होता.