शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

नक्षलींना विकासानेच पराभूत करणे शक्य

By admin | Updated: May 13, 2017 02:47 IST

नक्षलींच्या भीतीमुळे गडचिरोली जिल्ह्याचा विकास थांबला होता. परंतु, यापुढे गडचिरोली जिल्ह्यात नवीन उद्योग उभारले जातील.

देवेंद्र फडणवीस यांचे मत : नागरिकांचे विकासाला समर्थन लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : नक्षलींच्या भीतीमुळे गडचिरोली जिल्ह्याचा विकास थांबला होता. परंतु, यापुढे गडचिरोली जिल्ह्यात नवीन उद्योग उभारले जातील. नक्षलींना विकासानेच पराभूत केले जाऊ शकते, असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. फडणवीस यांच्या हस्ते शुक्रवारी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. पी. एल. भांडारकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ उत्कृष्ट नवोदित वकील पुरस्कार प्रदान करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. लॉयडस् मेटल अ‍ॅन्ड एनर्जी कंपनीला गडचिरोली जिल्ह्यात स्पाँज आयर्न प्रकल्प सुरू करण्यासाठी शुक्रवारी जमीन हस्तांतरित करण्यात आली. यापूर्वी अनेक उद्योजकांनी गडचिरोली जिल्ह्यात प्रकल्प टाकण्यास नकार दिला होता. त्यामुळे ही नवीन सुरुवात आहे. गडचिरोली जिल्ह्यात मुबलक खनिज संपत्ती असून विकासाकरिता त्याचा उपयोग करणे आवश्यक आहे. स्थानिक नागरिकांना नक्षलवाद नको आहे. त्यांना विकासाची ओढ आहे. त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात यायचे आहे, असे फडणवीस म्हणाले. डॉ. पी. एल. भांडारकर थोर विचारवंत होते. त्यांच्या नावाच्या पुरस्काराने नवोदित वकिलांना चांगले काम करण्यास प्रोत्साहन मिळेल. परंतु, वकिलांनी जीवनात केवळ पैसा कमवायच्या मागे लागू नये. त्यांनी समाज व देशासाठी योगदान द्यावे. केवळ स्वत:साठी जगणाऱ्यांना समाज कधीच लक्षात ठेवत नाही, असे फडणवीस यांनी सांगितले. हा कार्यक्रम विदर्भ लेडी लॉयर्स असोसिएशनच्यावतीने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठातील सभागृहात आयोजित करण्यात आला होता. व्यासपीठावर पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे प्रशासकीय न्यायमूर्ती भूषण गवई, राज्याचे महाधिवक्ता अ‍ॅड. रोहित देव, संघटनेच्या अध्यक्षा अ‍ॅड. पद्मा चांदेकर, सचिव अ‍ॅड. रितू कालिया हे उपस्थित होते. ‘लोकमत’चे राकेश घानोडे सन्मानित ‘लोकमत’चे उपसंपादक राकेश घानोडे यांना डॉ. पी. एल. भांडारकर स्मृती उत्कृष्ट विधी पत्रकार पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे प्रशासकीय न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. ‘लोकमत’मध्ये गेल्या वर्षभरात छापून आलेल्या उच्च न्यायालयातील दैनंदिन घडामोडीच्या बातम्या, विशेष बातम्या, बातम्यांतील तांत्रिक अचूकता इत्यादी बाबी घानोडे यांची पुरस्कारासाठी निवड करताना लक्षात घेण्यात आल्या. वकिली महान व्यवसाय आहे. या व्यवसायाला श्रीमंत परंपरा लाभली आहे. अनेक वकिलांनी स्वातंत्र्य लढ्यात स्वत:ला झोकून दिले होते. देशाची व समाजाची सेवा केल्याने मनाला समाधान मिळते. वकिलांनी ज्ञान मिळविण्यावर जास्त भर द्यावा. - न्यायमूर्ती भूषण गवई नवोदित वकिलांना प्रोत्साहित करण्याची व्यवस्था सध्या नाही. त्यामुळे असे पुरस्कार वकिलांचे मनोबल उंचावतात. आजचे वकील प्रतिभावंत आहेत. न्यायमूर्ती वेळोवेळी त्यांच्या पाठीवर थाप ठेवत असतात. - अ‍ॅड. रोहित देव डॉ. पी. एल. भांडारकर स्मृती पुरस्कार प्रदान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अ‍ॅड. प्रवीण अग्रवाल, अ‍ॅड. स्विटी भाटिया व अ‍ॅड. समीर सोनवणे यांना डॉ. पी. एल. भांडारकर स्मृती उत्कृष्ट नवोदित वकील पुरस्कार प्रदान करण्यात आला. पंचांमध्ये कुटुंब न्यायालयाच्या सेवानिवृत्त प्रधान न्यायाधीश मीरा खडक्कार, वरिष्ठ वकील सुनील मनोहर, अ‍ॅड. अरुण पाटील व अ‍ॅड. कल्पना पाठक यांचा समावेश होता.