शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

नवेगाव खैरी पूरक कालवा उपसा याेजना, खिंडसी पूरक कालव्यासाठी ठरणार वरदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:12 IST

रामटेक : चाैराई धरणामुळे ताेतलाडाेह प्रकल्पात व पुढे पेंच प्रकल्पात पाणी येणे बंद झाले आहे. त्यामुळे शासनाने काेच्छी बॅरेजवरून ...

रामटेक : चाैराई धरणामुळे ताेतलाडाेह प्रकल्पात व पुढे पेंच प्रकल्पात पाणी येणे बंद झाले आहे. त्यामुळे शासनाने काेच्छी बॅरेजवरून प्रस्तावित नवेगाव खैरी पूरक कालवा उपसा याेजना व राेहणा उचल याेजना हाती घेतली आहे. या याेजनेची कामे तातडीने व्हावीत यासाठी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या उपस्थितीत मुंबई येथे अलीकडेच एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

कन्हान नदीवर काेच्छी गावाजवळ या याेजनेचे बांधकाम ९० टक्के पूर्ण झाले आहे. एकूण पाणी ४०.४८ दलघमी व वार्षिक पाणीवापर ७५.०६ दलघमी आहे. यंदाच्या पावसाळ्यापासून या बॅरेजमध्ये पाणीसाठा करण्याचे नियाेजित आहे. बुडित क्षेत्रात पंपहाऊस बांधून ८०० अश्वशक्तीचे ८ पंप लावून पाण्याचा उपसा करून ८ कि.मी. उर्ध्व नलिकेद्वारे (२२४० मि.मी.च्या दाेन रांगा) व नंतर १२ कि.मी. प्रवाही कालव्याद्वारे हे पाणी नवेगाव खैरी जलाशयात व पुढे खिंडसी तलावात येऊ शकते. या याेजनेचा खर्च ३२५ कोटी रुपये इतका आहे. तर राेहणा उचल याेजनेसाठी ३९ कोटींचा खर्च रुपये इतका आहे. याद्वारे नागपूर महानगरपालिका पाणी घेणार आहे. त्यामुळे या दाेन्ही याेजना पूर्ण झाल्या तर नागपूर व भंडारा जिल्ह्यातील पाणी समस्या सुटू शकते. लाेहघाेगरी-ताेतलाडाेह वळण प्रकल्प पूर्ण व्हायला किती वेळ लागेल व त्याचा खर्चही ३,६३२ कोटी इतका असल्याने, हे दाेन्ही प्रकल्प पूर्ण हाेणे आवश्यक आहे. याही मुद्यावर या बैठकीत चर्चा झाली. या योजनेच्या प्रस्तावास प्रशासकीय व तांत्रिक मान्यता देऊन निधी उपलब्ध करून देण्याच्या सूचना पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. कोच्छी बॅरेजवरून पाईपलाईनद्वारे नवेगाव खैरी येथे पाणी आणल्यास चौराई धरणामुळे निर्माण झालेल्या तोतलाडोह धरणातील जलसाठ्यामधील तूट भरून काढण्यासाठी आणि पेंच पाटबंधारे विभागांतर्गत सिंचनाखाली असणाऱ्या रामटेक, पारशिवनी, कामठी, मौदा तसेच भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांकरिता कायमस्वरूपी सिंचनाची व्यवस्था होईल. तसेच नागपूर महानगरपालिकेच्या पिण्याच्या पाण्याची कायमस्वरूपी व्यवस्था होईल. हा प्रकल्प नागपूर ग्रामीण नागपूर शहर व भंडारा जिल्ह्यासाठी वरदान ठरेल. बैठकीला जलसंपदा विभागाचे वरिष्ठ अधिकारी व लोकप्रतिनिधी उपस्थित होते. तीत रामटेक तालुक्याची बाजू उदयसिंग यादव यांनी मांडली.