शहरं
Join us  
Trending Stories
1
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
2
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
3
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
4
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
5
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
6
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
7
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
8
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
9
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
10
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
11
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
12
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
13
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
14
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
15
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
16
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
17
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
18
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
19
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
20
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'

नवेगाव खैरी पूरक कालवा उपसा याेजना, खिंडसी पूरक कालव्यासाठी ठरणार वरदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:12 IST

रामटेक : चाैराई धरणामुळे ताेतलाडाेह प्रकल्पात व पुढे पेंच प्रकल्पात पाणी येणे बंद झाले आहे. त्यामुळे शासनाने काेच्छी बॅरेजवरून ...

रामटेक : चाैराई धरणामुळे ताेतलाडाेह प्रकल्पात व पुढे पेंच प्रकल्पात पाणी येणे बंद झाले आहे. त्यामुळे शासनाने काेच्छी बॅरेजवरून प्रस्तावित नवेगाव खैरी पूरक कालवा उपसा याेजना व राेहणा उचल याेजना हाती घेतली आहे. या याेजनेची कामे तातडीने व्हावीत यासाठी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या उपस्थितीत मुंबई येथे अलीकडेच एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

कन्हान नदीवर काेच्छी गावाजवळ या याेजनेचे बांधकाम ९० टक्के पूर्ण झाले आहे. एकूण पाणी ४०.४८ दलघमी व वार्षिक पाणीवापर ७५.०६ दलघमी आहे. यंदाच्या पावसाळ्यापासून या बॅरेजमध्ये पाणीसाठा करण्याचे नियाेजित आहे. बुडित क्षेत्रात पंपहाऊस बांधून ८०० अश्वशक्तीचे ८ पंप लावून पाण्याचा उपसा करून ८ कि.मी. उर्ध्व नलिकेद्वारे (२२४० मि.मी.च्या दाेन रांगा) व नंतर १२ कि.मी. प्रवाही कालव्याद्वारे हे पाणी नवेगाव खैरी जलाशयात व पुढे खिंडसी तलावात येऊ शकते. या याेजनेचा खर्च ३२५ कोटी रुपये इतका आहे. तर राेहणा उचल याेजनेसाठी ३९ कोटींचा खर्च रुपये इतका आहे. याद्वारे नागपूर महानगरपालिका पाणी घेणार आहे. त्यामुळे या दाेन्ही याेजना पूर्ण झाल्या तर नागपूर व भंडारा जिल्ह्यातील पाणी समस्या सुटू शकते. लाेहघाेगरी-ताेतलाडाेह वळण प्रकल्प पूर्ण व्हायला किती वेळ लागेल व त्याचा खर्चही ३,६३२ कोटी इतका असल्याने, हे दाेन्ही प्रकल्प पूर्ण हाेणे आवश्यक आहे. याही मुद्यावर या बैठकीत चर्चा झाली. या योजनेच्या प्रस्तावास प्रशासकीय व तांत्रिक मान्यता देऊन निधी उपलब्ध करून देण्याच्या सूचना पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. कोच्छी बॅरेजवरून पाईपलाईनद्वारे नवेगाव खैरी येथे पाणी आणल्यास चौराई धरणामुळे निर्माण झालेल्या तोतलाडोह धरणातील जलसाठ्यामधील तूट भरून काढण्यासाठी आणि पेंच पाटबंधारे विभागांतर्गत सिंचनाखाली असणाऱ्या रामटेक, पारशिवनी, कामठी, मौदा तसेच भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांकरिता कायमस्वरूपी सिंचनाची व्यवस्था होईल. तसेच नागपूर महानगरपालिकेच्या पिण्याच्या पाण्याची कायमस्वरूपी व्यवस्था होईल. हा प्रकल्प नागपूर ग्रामीण नागपूर शहर व भंडारा जिल्ह्यासाठी वरदान ठरेल. बैठकीला जलसंपदा विभागाचे वरिष्ठ अधिकारी व लोकप्रतिनिधी उपस्थित होते. तीत रामटेक तालुक्याची बाजू उदयसिंग यादव यांनी मांडली.