शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
2
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
3
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
4
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
5
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
6
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
7
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
8
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
9
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
10
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?
11
ऑनलाइन गेमिंगवर बंदी येण्यापूर्वी झुनझुनवालांची 'या' कंपनीतून एक्झिट; निखिल कामत, मधुसूदन केला यांना अजूनही विश्वास?
12
वाहतूक नियम मोडल्याचे चलन येताच फाईन भरा, ७५ टक्क्यांपर्यंत सूट मिळणार; महाराष्ट्रात विचार सुरु...
13
"पावसाळी अधिवेशनात लोकसभेत केवळ ३७ तास चर्चा, संसदेचा खर्च खासदारांकडून वसूल करा’’, नाराज खासदाराने केली मागणी
14
"बाळासाहेब थोरातांच्या केसालाही धक्का लावण्याची गोडसेच्या औलादीमध्ये धमक नाही", हर्षवर्धन सपकाळ यांनी ठणकावले
15
घरात काय चाललंय ते कळेना! पाक दिग्गज टीम इंडियात डोकावत श्रेयस अय्यरवर बोलला, म्हणे...
16
'का ग कुठे गेली होती?', सुनेत्रा पवारांबद्दलचा प्रश्न ऐकून अजित पवारांनी पत्रकार परिषदेतच जोडले हात
17
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा
18
Raigad Boat Accident: मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
19
"वरण-भात माझं आवडीचं जेवण", ट्रोल झाल्यावर विवेक अग्निहोत्रींची पलटी, म्हणाले- "मला अक्कल आली तेव्हा..."
20
Gold Silver Price 21 August: सोन्याच्या दरातील घसरण थांबली, चांदीमध्ये ₹१७४५ ची तेजी, सोनं किती महाग झालं? जाणून घ्या

नवेगाव खैरी पूरक कालवा उपसा याेजना, खिंडसी पूरक कालव्यासाठी ठरणार वरदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:12 IST

रामटेक : चाैराई धरणामुळे ताेतलाडाेह प्रकल्पात व पुढे पेंच प्रकल्पात पाणी येणे बंद झाले आहे. त्यामुळे शासनाने काेच्छी बॅरेजवरून ...

रामटेक : चाैराई धरणामुळे ताेतलाडाेह प्रकल्पात व पुढे पेंच प्रकल्पात पाणी येणे बंद झाले आहे. त्यामुळे शासनाने काेच्छी बॅरेजवरून प्रस्तावित नवेगाव खैरी पूरक कालवा उपसा याेजना व राेहणा उचल याेजना हाती घेतली आहे. या याेजनेची कामे तातडीने व्हावीत यासाठी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या उपस्थितीत मुंबई येथे अलीकडेच एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

कन्हान नदीवर काेच्छी गावाजवळ या याेजनेचे बांधकाम ९० टक्के पूर्ण झाले आहे. एकूण पाणी ४०.४८ दलघमी व वार्षिक पाणीवापर ७५.०६ दलघमी आहे. यंदाच्या पावसाळ्यापासून या बॅरेजमध्ये पाणीसाठा करण्याचे नियाेजित आहे. बुडित क्षेत्रात पंपहाऊस बांधून ८०० अश्वशक्तीचे ८ पंप लावून पाण्याचा उपसा करून ८ कि.मी. उर्ध्व नलिकेद्वारे (२२४० मि.मी.च्या दाेन रांगा) व नंतर १२ कि.मी. प्रवाही कालव्याद्वारे हे पाणी नवेगाव खैरी जलाशयात व पुढे खिंडसी तलावात येऊ शकते. या याेजनेचा खर्च ३२५ कोटी रुपये इतका आहे. तर राेहणा उचल याेजनेसाठी ३९ कोटींचा खर्च रुपये इतका आहे. याद्वारे नागपूर महानगरपालिका पाणी घेणार आहे. त्यामुळे या दाेन्ही याेजना पूर्ण झाल्या तर नागपूर व भंडारा जिल्ह्यातील पाणी समस्या सुटू शकते. लाेहघाेगरी-ताेतलाडाेह वळण प्रकल्प पूर्ण व्हायला किती वेळ लागेल व त्याचा खर्चही ३,६३२ कोटी इतका असल्याने, हे दाेन्ही प्रकल्प पूर्ण हाेणे आवश्यक आहे. याही मुद्यावर या बैठकीत चर्चा झाली. या योजनेच्या प्रस्तावास प्रशासकीय व तांत्रिक मान्यता देऊन निधी उपलब्ध करून देण्याच्या सूचना पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. कोच्छी बॅरेजवरून पाईपलाईनद्वारे नवेगाव खैरी येथे पाणी आणल्यास चौराई धरणामुळे निर्माण झालेल्या तोतलाडोह धरणातील जलसाठ्यामधील तूट भरून काढण्यासाठी आणि पेंच पाटबंधारे विभागांतर्गत सिंचनाखाली असणाऱ्या रामटेक, पारशिवनी, कामठी, मौदा तसेच भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांकरिता कायमस्वरूपी सिंचनाची व्यवस्था होईल. तसेच नागपूर महानगरपालिकेच्या पिण्याच्या पाण्याची कायमस्वरूपी व्यवस्था होईल. हा प्रकल्प नागपूर ग्रामीण नागपूर शहर व भंडारा जिल्ह्यासाठी वरदान ठरेल. बैठकीला जलसंपदा विभागाचे वरिष्ठ अधिकारी व लोकप्रतिनिधी उपस्थित होते. तीत रामटेक तालुक्याची बाजू उदयसिंग यादव यांनी मांडली.