शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

नवेगाव खैरी पूरक कालवा उपसा याेजना, खिंडसी पूरक कालव्यासाठी ठरणार वरदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:12 IST

रामटेक : चाैराई धरणामुळे ताेतलाडाेह प्रकल्पात व पुढे पेंच प्रकल्पात पाणी येणे बंद झाले आहे. त्यामुळे शासनाने काेच्छी बॅरेजवरून ...

रामटेक : चाैराई धरणामुळे ताेतलाडाेह प्रकल्पात व पुढे पेंच प्रकल्पात पाणी येणे बंद झाले आहे. त्यामुळे शासनाने काेच्छी बॅरेजवरून प्रस्तावित नवेगाव खैरी पूरक कालवा उपसा याेजना व राेहणा उचल याेजना हाती घेतली आहे. या याेजनेची कामे तातडीने व्हावीत यासाठी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या उपस्थितीत मुंबई येथे अलीकडेच एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

कन्हान नदीवर काेच्छी गावाजवळ या याेजनेचे बांधकाम ९० टक्के पूर्ण झाले आहे. एकूण पाणी ४०.४८ दलघमी व वार्षिक पाणीवापर ७५.०६ दलघमी आहे. यंदाच्या पावसाळ्यापासून या बॅरेजमध्ये पाणीसाठा करण्याचे नियाेजित आहे. बुडित क्षेत्रात पंपहाऊस बांधून ८०० अश्वशक्तीचे ८ पंप लावून पाण्याचा उपसा करून ८ कि.मी. उर्ध्व नलिकेद्वारे (२२४० मि.मी.च्या दाेन रांगा) व नंतर १२ कि.मी. प्रवाही कालव्याद्वारे हे पाणी नवेगाव खैरी जलाशयात व पुढे खिंडसी तलावात येऊ शकते. या याेजनेचा खर्च ३२५ कोटी रुपये इतका आहे. तर राेहणा उचल याेजनेसाठी ३९ कोटींचा खर्च रुपये इतका आहे. याद्वारे नागपूर महानगरपालिका पाणी घेणार आहे. त्यामुळे या दाेन्ही याेजना पूर्ण झाल्या तर नागपूर व भंडारा जिल्ह्यातील पाणी समस्या सुटू शकते. लाेहघाेगरी-ताेतलाडाेह वळण प्रकल्प पूर्ण व्हायला किती वेळ लागेल व त्याचा खर्चही ३,६३२ कोटी इतका असल्याने, हे दाेन्ही प्रकल्प पूर्ण हाेणे आवश्यक आहे. याही मुद्यावर या बैठकीत चर्चा झाली. या योजनेच्या प्रस्तावास प्रशासकीय व तांत्रिक मान्यता देऊन निधी उपलब्ध करून देण्याच्या सूचना पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. कोच्छी बॅरेजवरून पाईपलाईनद्वारे नवेगाव खैरी येथे पाणी आणल्यास चौराई धरणामुळे निर्माण झालेल्या तोतलाडोह धरणातील जलसाठ्यामधील तूट भरून काढण्यासाठी आणि पेंच पाटबंधारे विभागांतर्गत सिंचनाखाली असणाऱ्या रामटेक, पारशिवनी, कामठी, मौदा तसेच भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांकरिता कायमस्वरूपी सिंचनाची व्यवस्था होईल. तसेच नागपूर महानगरपालिकेच्या पिण्याच्या पाण्याची कायमस्वरूपी व्यवस्था होईल. हा प्रकल्प नागपूर ग्रामीण नागपूर शहर व भंडारा जिल्ह्यासाठी वरदान ठरेल. बैठकीला जलसंपदा विभागाचे वरिष्ठ अधिकारी व लोकप्रतिनिधी उपस्थित होते. तीत रामटेक तालुक्याची बाजू उदयसिंग यादव यांनी मांडली.