शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Accident: मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
2
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा
3
रशियाची सर्वात शक्तिशाली युद्धनौका S-400 बटालियनसह समुद्रात दाखल, पुतिन काय करतायत..?
4
Video: कुत्रा येणाऱ्या-जाणाऱ्यांवर सतत भुंकायचा; टोळक्याने मालकालाच लाठ्या-काठ्यांनी बेदम चोपले...
5
नशीब असावं तर असं! पावसापासून वाचण्यासाठी दुकानात शिरली, काही वेळाने करोडपती बनून बाहेर आली
6
जिम सोडा अन् ब्रॉन्को टेस्टवर फोकस करा! टीम इंडियातील खेळाडूंना जपावा लागणार फिटनेसचा नवा 'मंत्र'
7
आरोग्य विमा आणि गंभीर आजार विम्यात काय आहे फरक? अनेकजण इन्शुरन्स घेताना करतात चूक!
8
रोज मृत्यूची भीती, तरीही खचली नाही सौंदर्यवती! कोण आहे Nadeen Ayoub? तिच्या नावाची चर्चा का?
9
श्वेताची विवाहित प्रियकरानेच केली हत्या; फिरायला घेऊन गेला आणि कार घातली तलावात, दोघांमध्ये काय बिनसलं होतं?
10
आर्यन खानच्या 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मधून प्रसिद्ध खलनायकाचं कमबॅक, लूक पाहून खूश झाले चाहते
11
BEST Election Results 2025: उद्धवसेना-मनसे युतीचा २१-० ने पराभव; राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया आली
12
जीएसटी कपातीनंतरही कारवर जादा कर लागू शकतो...; सीएने केले विश्लेषण...
13
१० हजार रुपयांत भारतीय जपानमध्ये काय काय करू शकतात? रुपयाची जपानी किंमत किती?
14
दोन वर्षाच्या मुलीसह अख्ख कुटुंब मृतावस्थेत आढळल्याने खळबळ; ५ जणांसोबत नेमकं काय घडलं? 
15
अभिनेत्रीला अश्लील मेसेज करणारा तो युवा नेता कोण? समोर आली धक्कादायक माहिती, राष्ट्रीय पक्षाशी संबंध 
16
4 वर्षांत तीन वेळा प्रेग्नंट, तुरुंगवासाची शिक्षा टाळण्यासाठी महिलेने भलताच मार्ग अवलंबला...! जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
17
Mumbai Crime: 'तुझ्या अंगात भूत आहे', पुजेला बोलावलं आणि ३२ वर्षीय महिलेवर मांत्रिकाने केला बलात्कार
18
श्रावण अमावस्येला पिठोरी अमावस्या का म्हणतात? त्याच दिवशी असतो पोळा आणि मातृदिन
19
राज ठाकरे शिवतीर्थावर परतताच CM देवेंद्र फडणवीसांनी केला उद्धव ठाकरेंना फोन; नेमके कारण काय?
20
रामललांच्या भक्तांना दिवाळीपूर्वीच मिळणार खास गिफ्ट! राम मंदिर ट्रस्ट देणार विशेष भेट, जाणून घ्या सविस्तर

पेरणी झालेल्या शेतांना तलावाचे स्वरूप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2021 04:07 IST

भिवापूर/चिचाळा : उमरेड-मांगरुळ-चिमूर राष्ट्रीय मार्गाचे काम बहुतांशी पूर्ण झाले असून कंत्राटदाराने मार्गाच्या दुतर्फा पाणी वाहून जाण्याकरिता नाल्यांची निर्मिती केली ...

भिवापूर/चिचाळा : उमरेड-मांगरुळ-चिमूर राष्ट्रीय मार्गाचे काम बहुतांशी पूर्ण झाले असून कंत्राटदाराने मार्गाच्या दुतर्फा पाणी वाहून जाण्याकरिता नाल्यांची निर्मिती केली नाही. त्यामुळे गत दोन दिवसापासून सुरू असलेल्या मुसळधार पावासाचे पाणी शेतात शिरले असून, पेरणी झालेल्या शेतांना तलावाचे रूप आले आहे. मालेवाडा, पाहमी, चिचाळा परिसरातील शेतकऱ्यांचे त्यामुळे मोठे नुकसान झाले आहे.

उमरेड ते चिमूर या दुपदरी १०० कि.मी. राष्ट्रीय मार्गाचे गत दोन-तीन वर्षापासून सुरू असलेले काम बहुतांशी पूर्ण झालेले आहे. हा नवनिर्मित राष्ट्रीय मार्ग शेतशिवारापासून पाच ते आठ फूट उंच आहे. शिवाय गरडापार, मांगरुळ, पाहमी, चिचाळा, मालेवाडा ही गावेसुद्धा राष्ट्रीय मार्गाला लागून आहे. दरम्यान पाऊस आल्यानंतर परिसरासह मार्गावरील पाणी वाहून जाण्यासाठी नाल्यांची निर्मिती करण्यात आलेली नाही. त्यामुळे गत पावसाळ्यात पाहमी, चिचाळा, गरडापार शिवारातील राष्ट्रीय मार्गालगतच्या अनेक घरात आणि शेतात पाणी शिरून नुकसान झाले होते. दरम्यान येथील ग्रामस्थांनी मार्गाच्या दुतर्फा नाल्यांची निर्मिती करण्याची मागणी केली होती. परिणामी आंदोलनाची भाषा वापरणाऱ्या नागरिकांचा संताप लक्षात घेता कंत्राटदाराने एक-दोन ठिकाणी नाल्यांचे अर्धवट काम करून हात वर केले. यावर्षी पुन्हा तोच प्रसंग ओढावला आहे. गत दोन दिवसापासून तालुक्यात पावसाचा जोर वाढला आहे. दरम्यान राष्ट्रीय मार्गाला लागून असलेले मालेवाडा येथील शेतकरी नारायण इंगोले, धनराज सातपुते, कवडू सातपुते, रामू लाखे, प्रशांत बारेकर, सूरज ढोरे, यशवंत ढोरे, आनंद सातपुते व चिचाळा येथील भागवत पडोळे, उमा शेंदरे, अभय पडोळे, शेखर कांडारकर, देवराव लाडस्कर, दशरथ गिरडे, विलास पडोळे आदी शेतकऱ्यांच्या शेतात पावसाचे पाणी शिरल्याने मोठे नुकसान झाले आहे.

पेरलेले बियाणे गडप झाले

राष्ट्रीय मार्गाची निर्मिती करणाऱ्या संबंधित विभाग व कंत्राटदाराच्या नियोजनशून्य कामामुळे मालेवाडा, चिचाळा येथील शेतकऱ्यांच्या शेतात पावसाचे पाणी शिरले आहे. कोविडच्या संकटाशी लढा देत शेतकऱ्यांनी उधारवाड करून शेतात सोयाबीनची पेरणी, कपाशीची लागवड आणि धानाचे पऱ्हे टाकले. त्यांना अंकुर फुटण्यास सुरुवात झाली असताना पावसाचे पाणी शिरून शेतांना तलावाचे रूप आले आणि पेरलेले बियाणेसुद्धा गडप झाले.

--

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व संबंधित कंत्राटदाराच्या दुर्लक्षित कारभारामुळे पावसाचे पाणी शेतात शिरून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. याला संबंधित विभाग व कंत्राटदार दोषी आहेत. त्यामुळे चिचाळा व मालेवाडा येथील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी.

- गणेश इंगोले, शेतकरी रा. मालेवाडा.