शहरं
Join us  
Trending Stories
1
'कर्नाटक-महाराष्ट्रात मतचोरी; बिहारमध्ये होऊ देणार नाही', राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर निशाणा
2
"रोज म्हणतात व्होट चोरी... व्होट चोरी..., यांचं डोकं चोरी झालंय!" देवेंद्र फडणवीस यांचा विरोधकांवर हल्लाबोल; स्पष्टच बोलले
3
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी ६८ अर्ज; अनेक खासदारांच्या बनावट स्वाक्षरी केल्याचे उघड
4
'आधी १९७१ चा प्रश्न सोडवा, मग आपण चर्चा करू', बांगलादेशच्या भूमीवर पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांचा अपमान
5
बायकोला जाळणाऱ्या नवऱ्याचा एन्काउंटर; पायाला लागली गोळी, पळून जाण्याचा करत होता प्रयत्न
6
समुद्रात भारताची ताकद वाढणार, जर्मनीसोबत ७० हजार कोटींचा करार; ६ हाय-टेक पाणबुड्या बांधणार
7
Cheteshwar Pujara: भारतीय क्रिकेटमधील मोठी 'इनिंग' संपली; 'मिस्टर डिपेंडेबल' आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त!
8
युक्रेनमध्ये हाहाकार, रशियानं 143 ठिकाणांवर केली  बॉम्बिंग; डोनेत्स्कमध्ये दोन गावांवर कब्जा!
9
"हुंड्यात स्कॉर्पिओ, बुलेट दिली तरी माझ्या मुलीची हत्या, आरोपींच्या घरावर बुलडोझर चालवा अन्यथा..."
10
एआयची कमाल, 25 वर्षांनंतर परतला महिलेचा आवाज...! कसा घडला हा चमत्कार? जाणून थक्क व्हाल!
11
लग्नाला ८ वर्षं होऊनही मुलबाळ नाही, तांत्रिक महिलेला म्हणाला तंत्रमंत्राने गर्भधारणा करतो, त्यानंतर...
12
फलकावरुन झालेल्या वादातून दगडफेक; कोल्हापुरात दोन्ही गटांतील ४०० जणांवर दंगलीचा गुन्हा, लाखोंचे नुकसान
13
राहुल द्रविडनंतर तोच! चेतेश्वर पुजाराच्या टॉप-५ रेकॉर्ड ब्रेक इनिंग
14
Mahindra च्या नवीन SUV ला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद; फक्त अडीच मिनिटांत बुक झाला स्टॉक
15
अरे देवा! मृताच्या कुटुंबाला ६ लाखांची मदत जाहीर; ६ महिला म्हणतात, "मीच यांची खरी बायको..."
16
'अमेरिका रशियन तेल खरेदीची परवानगी देतो; हा ढोंगीपणा...' भारतीय कंपन्यांनी केली पोलखोल
17
हृदयद्रावक! पुरामुळे आयुष्य उद्ध्वस्त... घरं, दुकानं गेली वाहून; अन्नाचा, औषधांचा मोठा तुटवडा
18
दे दणादण! मेट्रोमध्ये एकमेकींच्या झिंज्या उपटल्या तरी गप्प नाही बसल्या, Video तुफान व्हायरल
19
बँक एफडीपेक्षा जास्त व्याज! पोस्ट ऑफिसची या योजनेत १ लाख रुपयांवर मिळेल २३,५०८ रुपयांचा नफा
20
येस बँकेच्या भागधारकांसाठी मोठी बातमी! जपानी बँक २५% पर्यंत हिस्सा खरेदी करणार, काय होणार बदल?

नैसर्गिक आपत्तीने आणले नाकीनऊ

By admin | Updated: March 13, 2015 02:39 IST

सलग तीन वर्षांपासून सातत्याने येणाऱ्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी तर पूर्णपणे नाउमेद झालाच आहे, तर दुसरीकडे वारंवार सर्वेक्षण करावे लागत असल्याने महसूल यंत्रणेच्याही नाकीनऊ आले आहे.

चंद्रशेखर बोबडे नागपूर सलग तीन वर्षांपासून सातत्याने येणाऱ्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी तर पूर्णपणे नाउमेद झालाच आहे, तर दुसरीकडे वारंवार सर्वेक्षण करावे लागत असल्याने महसूल यंत्रणेच्याही नाकीनऊ आले आहे. कितीदा पंचनामे करायचे, कितीदा मदत वाटप करायची, असा सवाल आता उपस्थित केला जातो आहे.२०१२-१३ पासून सातत्याने येणाऱ्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे. कधी दुष्काळ, कधी अतिवृष्टी, गारपीट तर कधी अवकाळी पाऊस यामुळे शेतकऱ्यांचा खरीप हंगाम आणि आताचा रबी हंगाम हातून गेला आहे. हातातील सर्व पुंजी लावूनही काहीही हाती येत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये कमालीची निराशा पसरली आहे. सरकारकडून होणारी मदत तुटपुंजी असल्याने त्यांच्याविषयी नाराजी आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत असल्याने सरकारवर टीका होत आहे. ही टीका टाळण्यासाठी पाऊस, गारपीट झाले की सर्वेक्षण करण्याचे आदेश महसूल यंत्रणेला दिले जाते. पूर्वी हे काम कृषी खात्याकडून केले जात होते. आता महसूल यंत्रणा त्यासाठी राबत आहे. खरीप हंगामात झालेल्या पीकहानीचे सर्वेक्षण आणि नुकसानीचा आढावा अद्याप संपला नसतानाच डिसेंबर महिन्यात पुन्हा गारपीट व अवकाळी पाऊस झाला. अधिवेशन सुरू असल्याने शासनाने पुन्हा फेरसर्वेक्षण करण्याचे आदेश दिले. विभागातील चार हजारांवर गावाची आणेवारी ५० टक्क्यांपेक्षा कमी आली. त्यानुसार शासनाने मदत जाहीर केली. ही मदत वाटप करण्याच्या प्रक्रियेत महसूल यंत्रणा गुंतली होती. फेब्रुवारी अखेरपर्यंत हे काम चालले. ते संपत नाही तोच १ आणि २ मार्चला पुन्हा अवकाळी पाऊस आला. त्यानंतर अजूनही काही भागात गारपीट होतच आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशन होत असल्याने शेतकऱ्यांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. नागपूर विभागातील ३१ तालुक्यांतील ७० हजार हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्राला याचा फटका बसला आहे. त्यात नागपूर जिल्ह्यातील १३ तालुक्यांतील ४२ हजार हेक्टरचा समावेश आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरमध्ये आढावा बैठक घेऊन बाधित क्षेत्राचे सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे पुन्हा यंत्रणा सर्वेक्षणाच्या कामाला जुंपणार आहे. कितीवेळा सर्वेक्षण करायचे व कितीवेळा पंचनामे करायचे, याबाबत आता प्रशासनात चर्चा सुरू झाली आहे. यंत्रणेने पावसाची धास्तीच घेतली आहे.