शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
4
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
5
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
6
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
7
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
8
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
9
हृदयविकाराच्या झटक्याने प्रसिद्ध मराठी अभिनेता-दिग्दर्शकाचं निधन; ४२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
10
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
11
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
12
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
13
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
14
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
15
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
16
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
17
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
18
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
19
नोकरी गेली खड्ड्यात, आज राजीनामा देणारच, कारण...; ढसाढसा रडत शिक्षिकेने बनवला Video
20
बिबट्यानंतर आता लांडग्याची दहशत... तीन वर्षाच्या चिमुरड्याला उचलून नेलं; कुठे घडला प्रकार?
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीयकृत बँकांची पीककर्जाला ना !

By admin | Updated: June 11, 2015 03:03 IST

आजवर शेतकऱ्यांना मान्सूनपूर्वी म्हणजे एप्रिल- मे महिन्यात पीक कर्जाचा पुरवठा व्हायचा. या कर्जातून शेतकरी पेरणीची तयारी करायचे.

नागपूर : आजवर शेतकऱ्यांना मान्सूनपूर्वी म्हणजे एप्रिल- मे महिन्यात पीक कर्जाचा पुरवठा व्हायचा. या कर्जातून शेतकरी पेरणीची तयारी करायचे. या वेळी मात्र, शेतकऱ्यांना जिल्हा बँक किंवा राष्ट्रीयकृत बँकेमार्फत कुठलाही कर्जपुरवठा झालेला नाही. राष्ट्रीयकृत बँकेने कर्जपुरवठा न केल्यास गुन्हे दाखल करू, असे जिल्हाधिकाऱ्यांचे इशारे वृत्तपत्रात प्रकाशित होत आहे. मात्र, प्रत्यक्षात शेतकऱ्यांना कर्ज मिळेनासे झाले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री, पालकमंत्री व सहकार खात्यातील अधिकाऱ्यांनी यात हस्तक्षेप करावा. प्रत्यक्ष बँकेच्या कर्ज प्रकरणांची पडताळणी करावी व शेतकऱ्यांना त्वरित कर्ज उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी माजी आ. सुनील शिंदे यांनी पत्रकार परिषदेत केली. शिंदे म्हणाले, ‘अर्ज करा, कर्ज घ्या, असे जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केले आहे. प्रत्यक्षात राष्ट्रीयकृत बँकेचे प्रत्येक शाखेत एक हजारावर शेतकऱ्यांचे अर्ज प्रलंबित आहेत.कर्जवितरणासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी तालुका स्तरावर तहसीलदार, सह निबंधक, राष्ट्रीयकृत बँकेचे प्रतिनिधी, सेवा सहकारी सोसायटीचे सचिव यांची समिती नेमली आहे. कर्जासाठी सचिवाने एनओसी द्यायची आहे. मात्र, या समितीची नियमित बैठक होत नाही. तालुका स्तरावर तर बँकांवर कुणाचेही नियंत्रण नाही. त्यामुळे एक टक्का शेतकऱ्यांनाही कर्ज मिळालेले नाही. याची दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी तालुकास्तरीय समित्यांमध्ये शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींचा समावेश करावा व स्वत: आढावा घ्यावा, अशी मागणी शिंदे यांनी केली. २०१३ ते २०१५ या तीन वर्षात कर्जाचे फेररुपांतर करण्यात आले. पण शेतकऱ्यांना कर्जपुरवठा करण्यात आला नाही. त्यामुळे ज्या शेतकऱ्यावर एक लाख रुपयांचे कर्ज होते ते वाढून १ लाख ३६ हजार रुपये झाले. आता कर्ज थकीत आहे म्हणून सहकारी बँक शेतकऱ्याला एनओसी देत नाही. सहकारी बँकेची एनओसी नाही म्हणून राष्ट्रीयकृत बँक कर्ज देण्यास तयार नाही, अशा प्रशासकीय चक्रात शेतकरी अडकला असल्याचे शिंदे यांनी सांगितले.या वेळी वेदप्रकाश आर्य, सतीश शिंदे, दिनेश ठाकरे, बाळासाहेब ठाकरे, संतोष डफरे, अण्णाजी दाढे, वसंतराव पानतावने, वसंतराव गावंडे, भगसिंग पडहेरिया आदी शेतकरी उपस्थित होते. (प्रतिनिधी)शपथपत्राची अट जाचक सहकारी बँकेत कर्ज परत करणाऱ्या शेतकऱ्याला तालुक्याच्या ठिकाणी जाऊन नोंदणीकृत शपथपत्र तयार करणे आवश्यक आहे. शेतीच्या सातबारावर जेवढ्या व्यक्तींची नावे असतील त्या सर्वांनाच शपथपत्र देणे आवश्यक आहे. यापैकी एकादी व्यक्ती शपथपत्र करण्यास तयार नसेल तर त्याला कर्ज मिळणार नाही, अशी अट घालण्यात आली आहे. या अटीमुळे ५० टक्के शेतकरी अर्ज भरूनही कर्ज घेण्यापासून वंचित आहेत. शेतकऱ्यांना त्वरित कर्ज मिळाले नाही तर शेतकरी पुन्हा सावकारी पाशात अडकेल व नागपूर जिल्ह्यातही आत्महत्यांचे सत्र सुरू होईल, असा धोका त्यांनी वर्तविला. शेतकऱ्यांच्या या प्रश्नासाठी शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ शनिवारी किंवा रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. विम्याचा हप्ता न भरणाऱ्या बँकांवर गुन्हे दाखल करा पीक विमा योजनेंतर्गत ७ हजार २०० रुपयांचा हप्ता बँकेकडे भरला जातो. यातील ३६०० रुपये केंद्र व राज्य सरकार भरते तर ३६०० रुपये शेतकऱ्यांच्या कर्जातून कपात केले जातात. पीक विम्याच्या हप्त्यापोटी बँक आॅफ इंडियाकडे जमा झालेले ८ कोटी, स्टेट बँक आॅफ इंडियाने ७ कोटी १ लाख व युनियन बँकेने २ कोटी १० लाख रुपये विमा कंपनीकडे भरलेच नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना हेक्टरी ६० हजार रुपयांच्या नुकसान भरपाईपासून वंचित रहावे लागले. याची दखल घेत राज्य सरकारने संबंधित बँकांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करावा व शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईची रक्कम वसूल करावी, अशी मागणी शिंदे यांनी केली.