शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढील २४ तासांसाठी पावसाचा रेडअलर्ट, हवामान खात्याचा इशारा
2
आता खामेनेईचा खात्मा करणारच..: हॉस्पिटलवरील हल्ल्यानंतर इस्त्रायलचे खुले चॅलेंज
3
इराणच्या हल्ल्यात इस्त्रायली एअर डिफेन्स फेल; मित्राची झाली आठवण, भारताला आला कॉल, आता...
4
जगाला हादरवणारी बातमी! इराणने इस्रायलचा शेअर बाजार उडवला; तुमच्या गुंतवणुकीवर काय परिणाम होणार?
5
Rain Update: रायगडमधील तीन नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी, तीन पर्यटन ठिकाणी जाण्यास बंदी
6
...तर अमेरिका किम जोंग उन यांच्या देशावर अणुबॉम्ब टाकेल; यांनी केला मोठा दावा
7
₹८,००० कोटींची गुंतवणूक... अंबानींनी केली Coca-Cola आणि Pepsi ला टक्कर देण्याची तयारी; काय आहे प्लान?
8
मुंबई, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यासह पुणे घाट, सातारा घाट परिसरात 24 तासांसाठी ऑरेंज अलर्ट
9
धक्कादायक! "लग्न ठरल्यानंतर सोनम दिवसातून फक्त..."; राजा रघुवंशीच्या मित्राचा मोठा खुलासा
10
बसच्या तिकिटामुळे हत्या उघडकीस आली! पाच वर्षाचे रिलेशन, लग्नाची इच्छा, घडलं वेगळंच
11
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर: १० राशी मालामाल, इच्छापूर्ती काळ; अचानक पैसे मिळतील, चांगले घडेल!
12
Video: इलॉन मस्क यांना मोठा धक्का; प्रक्षेपणादरम्यान SpaceX च्या स्टारशिप रॉकेटमध्ये स्फोट
13
Air India Plane Crash: 'असं वाटलं पाकिस्ताननेच मिसाईल हल्ला केला, चार मित्र गमावले'; अपघातातून वाचलेल्या केशवने सांगितला थरार
14
ठाकरेंसोबत रात्रीतून खेळ झाला! काल मातोश्रीवर आलेले 'ते' दोन नेते आज शिंदेंच्या शिवसेनेत
15
लीड्स टेस्टपूर्वीच टीम इंडियाला मोठा झटका, 259 धावा करणाऱ्या 'या' क्रिकेटरला दुखापत! नेमकं काय घडलं? आता कशी असेल प्लेइंग 11?
16
Ashadhi Ekadashi 2025: संत नामदेवांनी पांडुरंगाच्या आरतीत उल्लेखलेली 'राही' नेमकी कोण?
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राहुल गांधी यांना वाढदिवसानिमित्त दिल्या खास शुभेच्छा, म्हणाले...
18
Shree Swami Samarth: एक पैशाचा खर्च नाही, ‘हा’ उपाय एकदा करून पाहा; स्वामी कायम पाठीशी असतील, अशक्यही शक्य होईल!
19
चालत्या रिक्षात अचानक झाला स्फोट; आगीत महिला प्रवासी जिवंत जळाली, ५ जण जखमी
20
Air India Plane Crash Insurance Claim : अहमदाबाद विमान अपघात: Air India ४,०८० कोटी रुपयांचा 'इन्श्युरन्स क्लेम' करणार, इतिहासातील सर्वाधिक आकडा ठरणार?

राष्ट्रीयकृत बँकांची पीककर्जाला ना !

By admin | Updated: June 11, 2015 03:03 IST

आजवर शेतकऱ्यांना मान्सूनपूर्वी म्हणजे एप्रिल- मे महिन्यात पीक कर्जाचा पुरवठा व्हायचा. या कर्जातून शेतकरी पेरणीची तयारी करायचे.

नागपूर : आजवर शेतकऱ्यांना मान्सूनपूर्वी म्हणजे एप्रिल- मे महिन्यात पीक कर्जाचा पुरवठा व्हायचा. या कर्जातून शेतकरी पेरणीची तयारी करायचे. या वेळी मात्र, शेतकऱ्यांना जिल्हा बँक किंवा राष्ट्रीयकृत बँकेमार्फत कुठलाही कर्जपुरवठा झालेला नाही. राष्ट्रीयकृत बँकेने कर्जपुरवठा न केल्यास गुन्हे दाखल करू, असे जिल्हाधिकाऱ्यांचे इशारे वृत्तपत्रात प्रकाशित होत आहे. मात्र, प्रत्यक्षात शेतकऱ्यांना कर्ज मिळेनासे झाले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री, पालकमंत्री व सहकार खात्यातील अधिकाऱ्यांनी यात हस्तक्षेप करावा. प्रत्यक्ष बँकेच्या कर्ज प्रकरणांची पडताळणी करावी व शेतकऱ्यांना त्वरित कर्ज उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी माजी आ. सुनील शिंदे यांनी पत्रकार परिषदेत केली. शिंदे म्हणाले, ‘अर्ज करा, कर्ज घ्या, असे जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केले आहे. प्रत्यक्षात राष्ट्रीयकृत बँकेचे प्रत्येक शाखेत एक हजारावर शेतकऱ्यांचे अर्ज प्रलंबित आहेत.कर्जवितरणासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी तालुका स्तरावर तहसीलदार, सह निबंधक, राष्ट्रीयकृत बँकेचे प्रतिनिधी, सेवा सहकारी सोसायटीचे सचिव यांची समिती नेमली आहे. कर्जासाठी सचिवाने एनओसी द्यायची आहे. मात्र, या समितीची नियमित बैठक होत नाही. तालुका स्तरावर तर बँकांवर कुणाचेही नियंत्रण नाही. त्यामुळे एक टक्का शेतकऱ्यांनाही कर्ज मिळालेले नाही. याची दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी तालुकास्तरीय समित्यांमध्ये शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींचा समावेश करावा व स्वत: आढावा घ्यावा, अशी मागणी शिंदे यांनी केली. २०१३ ते २०१५ या तीन वर्षात कर्जाचे फेररुपांतर करण्यात आले. पण शेतकऱ्यांना कर्जपुरवठा करण्यात आला नाही. त्यामुळे ज्या शेतकऱ्यावर एक लाख रुपयांचे कर्ज होते ते वाढून १ लाख ३६ हजार रुपये झाले. आता कर्ज थकीत आहे म्हणून सहकारी बँक शेतकऱ्याला एनओसी देत नाही. सहकारी बँकेची एनओसी नाही म्हणून राष्ट्रीयकृत बँक कर्ज देण्यास तयार नाही, अशा प्रशासकीय चक्रात शेतकरी अडकला असल्याचे शिंदे यांनी सांगितले.या वेळी वेदप्रकाश आर्य, सतीश शिंदे, दिनेश ठाकरे, बाळासाहेब ठाकरे, संतोष डफरे, अण्णाजी दाढे, वसंतराव पानतावने, वसंतराव गावंडे, भगसिंग पडहेरिया आदी शेतकरी उपस्थित होते. (प्रतिनिधी)शपथपत्राची अट जाचक सहकारी बँकेत कर्ज परत करणाऱ्या शेतकऱ्याला तालुक्याच्या ठिकाणी जाऊन नोंदणीकृत शपथपत्र तयार करणे आवश्यक आहे. शेतीच्या सातबारावर जेवढ्या व्यक्तींची नावे असतील त्या सर्वांनाच शपथपत्र देणे आवश्यक आहे. यापैकी एकादी व्यक्ती शपथपत्र करण्यास तयार नसेल तर त्याला कर्ज मिळणार नाही, अशी अट घालण्यात आली आहे. या अटीमुळे ५० टक्के शेतकरी अर्ज भरूनही कर्ज घेण्यापासून वंचित आहेत. शेतकऱ्यांना त्वरित कर्ज मिळाले नाही तर शेतकरी पुन्हा सावकारी पाशात अडकेल व नागपूर जिल्ह्यातही आत्महत्यांचे सत्र सुरू होईल, असा धोका त्यांनी वर्तविला. शेतकऱ्यांच्या या प्रश्नासाठी शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ शनिवारी किंवा रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. विम्याचा हप्ता न भरणाऱ्या बँकांवर गुन्हे दाखल करा पीक विमा योजनेंतर्गत ७ हजार २०० रुपयांचा हप्ता बँकेकडे भरला जातो. यातील ३६०० रुपये केंद्र व राज्य सरकार भरते तर ३६०० रुपये शेतकऱ्यांच्या कर्जातून कपात केले जातात. पीक विम्याच्या हप्त्यापोटी बँक आॅफ इंडियाकडे जमा झालेले ८ कोटी, स्टेट बँक आॅफ इंडियाने ७ कोटी १ लाख व युनियन बँकेने २ कोटी १० लाख रुपये विमा कंपनीकडे भरलेच नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना हेक्टरी ६० हजार रुपयांच्या नुकसान भरपाईपासून वंचित रहावे लागले. याची दखल घेत राज्य सरकारने संबंधित बँकांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करावा व शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईची रक्कम वसूल करावी, अशी मागणी शिंदे यांनी केली.