हार्दिक रायलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मानवी संस्कृती प्रत्येक शतकासह विकसित झाली आहे आणि अलीकडच्या काळात सर्वात जास्त अपेक्षित असलेले वर्ष २०२० आहे. नवीन शतकामध्ये तंत्रज्ञानाची ओळख करुन अशा प्रकारे कधीही न पाहिलेली आणि अपेक्षित नसलेली मानवजात क्रांती घडवून आणली. डेस्कटॉप, लॅपटॉप, सेलफोन आणि बरेच काहींमुळे लोकांच्या घरात कृत्रिम बुद्धिमत्ता आणली गेली. नवक्रांतीची ही लाट वैद्यकीय आणि अन्य क्षेत्रातही आली. तंत्रज्ञान ही सभ्यतेची प्रमुख आवश्यकता बनली असून त्यामुळे शक्यतांच्या आयामाची दारेदेखील उघडली.राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनानिमित्त लोकमतने विविध क्षेत्रातील तज्ज्ञांशी बातचित केली. तंत्रज्ञान तुमच्या व्यवसायाचा भाग कसा बनला आणि पुढे काय होऊ शकते, यावर विचारणा केली.पोलीस विभागाला मोठी मदतपोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय म्हणाले, तंत्रज्ञानामुळे विभागाला मोठी मदत झाली असून आमचे काम अधिक सोपे झाले आहे. डेटा व्यवस्थापन हे डोकेदुखीचे काम खूपच कमी झाले आहे. मोबाईल अप्लिकेशन, वेबसाईट्स आणि सोशल मीडियाच्या वापरामुळे विभागाला समाजात पोहोचण्यास मदत झाली आहे. माहिती सामायिकरण हे पूर्वीच्या तुलनेत खूप सोपे काम झाले आहे. तंत्रज्ञानाने गुन्हेगारी शोधण्यात तसेच फॉरेन्सिक सायन्समध्येही मोठी मदत झाली. तंत्रज्ञानामुळे समाजातील हालचालींवर लक्ष ठेवता येते. आॅनलाईन तक्रारीमुळे लोकांना पोलीस स्टेशनमध्ये यावे लागत नाही.ऑर्थोस्कोपीच्या शस्त्रक्रिया सुलभगुडघा आणि खांदा सर्जन डॉ. नावेद अहमद म्हणाले, नागपूर येथील आर्थोस्कोपी तज्ज्ञांनी तंत्रज्ञानाद्वारे वैद्यकीय क्षेत्रात बरीच प्रगती केली आहे. फातिमा ही एक प्रोफेशनल बॉडीबिल्डर लिगामेंट शस्त्रक्रिया करून अवघ्या तीन महिन्यात आपल्या जिममध्ये परतली. तिने याचे श्रेय आर्थोस्कोपी शस्त्रक्रियेला दिले. या प्रक्रियेमध्ये सांध्याची शस्त्रक्रिया की-होल चिराद्वारे दुर्बिणीद्वारे केली जाते. या नवीन तंत्रज्ञानाने अनेक शस्त्रक्रिया प्रक्रियेचा दृष्टिकोन बदलला आहे. परिणामस्वरूप लांब चिरा, भयानक रक्तस्त्राव, सांधे कडक होणे, अनेक दिवसांपर्यंत वेदना आणि रुग्णालयात दीर्घकाळ राहाण्याचे दिवस गेले आहेत. आर्थोस्कोपीद्वारे संक्रमणाचे दर कमी झाले असून सुलभ पुनर्वसन आणि बरे होण्याचे प्रमाण वाढले आहे. तांत्रिक प्रगतीमुळे आम्ही चांगले करण्याचा प्रयत्न करतो.पर्यावरण संवर्धनासाठी उपयुक्तनॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स अकॅडमीचे संचालक मनीष रंजन म्हणाले, तंत्रज्ञानाने रणनीती बनवण्याची यंत्रणा आणि बुद्धिमत्ता यंत्रणेत बदल घडविला आहे. समतोल तंत्रज्ञानावर जोर देताना नीरीचे मु्ख्य वैज्ञानिक, विज्ञान सचिव आणि हवामान टिकाव व कौशल्य विकास केंद्राचे प्रमुख डॉ. जे. एस. पांडे म्हणाले, पर्यावरण अनुकूल, ऊर्जा-कार्यक्षम आणि तंत्रज्ञानाच्या विकासाने विविध औद्योगिक, व्यावसायिक आणि निवासी उपक्रमांचा पर्यावरणीय परिणाम कमी करता येतो. औद्योगिक पर्यावरणशास्त्र आणि पर्यावरणीय अभियांत्रिकीच्या योग्य तत्त्वांचे पालन केले पाहिजे. आवश्यक नियामक कार्यपद्धती आणि अंमलबजावणीची धोरणे योग्य वेळी, योग्य हेतूने आणि योग्य ठिकाणी असल्याचे निश्चित केले पाहिजे. विज्ञान आणि अभियांत्रिकीला मानवी जीवशास्त्र आणि सामाजिक, सांस्कृतिक वातावरणासह समाकलित करणाऱ्या ‘मानव संसाधन विकास तंत्रज्ञान’चा अविभाज्य भाग समजू शकतो.