शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

नक्षलविरोधी मोहिमेत सुरक्षा यंत्रणांची ताकद होणार राष्ट्रीय महामार्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 04:07 IST

फहिम खान नागपूर : महाराष्ट्र आणि छत्तीसगडच्या नक्षल प्रभावित परिसरांना जोडणारा राष्ट्रीय महामार्ग पर्यटनासोबतच सुरक्षेच्या दृष्टीकोणातून भविष्यात फायद्याचा ठरू ...

फहिम खान

नागपूर : महाराष्ट्र आणि छत्तीसगडच्या नक्षल प्रभावित परिसरांना जोडणारा राष्ट्रीय महामार्ग पर्यटनासोबतच सुरक्षेच्या दृष्टीकोणातून भविष्यात फायद्याचा ठरू शकतो. नक्षलविरोधी अभियानाशी निगडित अधिकारी यावर खुलेआम बोलत नाहीत; परंतु हा मार्ग पूर्ण झाल्यानंतर या परिसरात वाहतूक वाढल्यामुळे नक्षलवाद्यांचा या परिसरातील प्रभाव कमी होणार आहे. आजही अबुझमाड परिसरात नक्षलवाद्यांचे एकछत्री राज्य सुरू आहे. अबुझमाड दक्षिण छत्तीसगडच्या बस्तर परिसरातील नारायणपूर जिल्ह्यात आहे.

छत्तीसगडमधील अबुझमाड जगातील सर्वात रहस्यमय स्थानांपैकी एक मानण्यात येते. जवळपास ४४०० वर्ग किलोमीटर परिसरातील अबुझमाडचे जंगल, पर्वत, दाट घाटांमधील अपरिचित २३७ गावांचे भू-सर्वेक्षण कधीच होऊ शकले नाही. मुगलांपासून इंग्रजांपर्यंत हे सर्वेक्षण करण्याचा प्रयत्न केला; परंतु त्यांना यश येऊ शकले नाही. हजारो वर्षांपासून या रहस्यमय परिसरात सुरक्षा दल, सरकारी मशीन प्रवेश करू शकल्या नाही. छत्तीसगडच्या अबुझमाडला नक्षलवाद्यांचा गड समजला जातो. आतापर्यंत महाराष्ट्र, छत्तीसगड पोलीसच नव्हे तर अर्ध सैनिक दलांनी अबुझमाडबाबत अनेक संयुक्त अभियान राबविले; परंतु आतापर्यंत त्यात अधिक यश मिळाले नाही. मात्र, गडचिरोली पोलीस नक्षलवाद्यांच्या या गडात अधिक खोलवर जाण्यात यशस्वी झाले आहेत; परंतु मोठ्या घटना घडवून आणल्यानंतर नक्षलवादी अबुझमाडच्या दाट जंगलात आणि रहस्यमय पहाडांमध्ये लपले असल्याचे आजपर्यंत दिसून आले आहे.

............

सीमेकडील भागात वाढणार आऊटपोस्ट

अबुझमाड परिसरात सुरक्षा यंत्रणांसोबत नक्षलवाद्यांची चकमक होते; परंतु वेळेवर सुरक्षा यंत्रणांना मदत मिळत नसल्यामुळे अनेकदा अभियानात मोठे नुकसान सहन करावे लागते. परंतु राष्ट्रीय महामार्ग तयार झाल्यानंतर सुरक्षा यंत्रणांना अभियानादरम्यान अतिरिक्त मदत पोहोचविण्याचा पर्याय उपलब्ध होणार आहे. महाराष्ट्रात सध्या गडचिरोली पोलिसांची अखेरची चौकी लाहेरीमध्ये आहे. त्यांनाही महामार्ग तयार झाल्यानंतर दोन्ही राज्यांच्या सीमेवर पोलिसांची संख्या वाढविण्याची संधी मिळणार आहे. दुसरीकडे छत्तीसगडमध्येही सीमेकडील भागात नव्या आऊटपोस्ट तयार केल्या जाऊ शकतात.

वाहतूक वाढल्यास तरुणांची दिशाभूल करू शकणार नाहीत नक्षलवादी

‘ज्या परिसरात बाहेरील नागरिकांची मदत पोहोचू शकत नाही, तेथील स्थानिक तरुणांची नक्षलवादी दिशाभूल करतात, असा आजवरचा अनुभव आहे. परंतु या भागात वाहतूक वाढल्यास तेथील तरुण बाहेरील जगाशी जोडले जातील. त्यांना रोजगाराच्या संधी मिळाल्यास त्यांची दिशाभूल करणे शक्य होणार नाही. या राष्ट्रीय महामार्गाशी हा परिसर बाहेरील जगाशी जोडला गेल्यानंतर नक्षलविरोधी अभियान आणि शासनाच्या लोकोपयोगी योजनांना गती मिळेल.’

-संदीप पाटील, पोलीस उपमहानिरीक्षक, गडचिरोली

............