शहरं
Join us  
Trending Stories
1
बिटींग रिट्रीट सेरेमनी आजपासून सुरु होणार; पण भारत ना हस्तांदोलन करणार, ना गेट उघडणार...
2
छगन भुजबळ मंत्रिमंडळात परतताच मनोज जरांगे संतापले; अजित पवारांना दिला सूचक इशारा
3
अजित पवार आले, पुष्पगुच्छ दिला अन हात जोडले; छगन भुजबळ अखेर मंत्री झाले, शपथ घेतली 
4
“एका भ्रष्ट मंत्र्याच्या जागी दुसरा भ्रष्ट मंत्री, जनता अशीच भरडली जाणार, असा काय नाईलाज आहे”
5
'आकाशाशी नातं जडलेला' तारा निखळला; ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांचे निधन
6
Corona Virus : कोरोना रिटर्न्स! JN.1 व्हेरिएंटचा कहर; 'ही' लक्षणं दिसताच व्हा सावध, 'या' लोकांना सर्वाधिक धोका
7
'ऑपरेशन सिंदूर' सिनेमावरून अक्षय कुमार आणि विकी कौशलमध्ये भांडणं?
8
ट्रम्प यांचा सल्ला कुक यांनी धुडकावला! अ‍ॅपलचा भारतावरच विश्वास; इतक्या कोटींची केली गुंतवणूक
9
शेख हसीना यांच्याविरूद्ध बांगलादेश सरकारची नवी खेळी! आधी पक्षावर बंदी, त्यातच आता...
10
कोरोना पुन्हा डोकं वर काढतोय! महाराष्ट्र दुसऱ्या स्थानावर, देशांत सर्वाधिक रुग्णसंख्या कुठे?
11
संपूर्ण पाकिस्तान आमच्या रेंजमध्ये, लपायलाही जागा उरणार नाही; भारतीय सैन्याने दिला इशारा
12
लग्नानंतर ६ महिन्यांतील फक्त २१ दिवस एकत्र होते विरुष्का, अनुष्काचा खुलासा, म्हणाली...
13
OMG! रोहित शर्माने त्याची लँबॉर्गिनी उरुस ड्रीम ११ विजेत्याला गिफ्ट देऊन टाकली; रिक्षाने परतला घरी...
14
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी दूतावासात केक घेऊन जाणारा 'तो' डिलिव्हरी बॉय ज्योती मल्होत्रासोबतही दिसला!
15
ज्योती मल्होत्रासोबत जोडलं पुरीच्या युट्यूबरचं नाव; ओडिशाचे मंत्री म्हणतात, "कठोर कारवाई..."
16
शेअर बाजारात संथ सुरुवात! आयटी आणि मेटलमध्ये तेजी, तर ऑटो आणि बँकिंगमध्ये घसरण
17
“...तर विजय शाह यांची पक्षातून कायमची हकालपट्टी केली असती”; मित्रपक्षाचा भाजपाला घरचा अहेर
18
'रेडिएशन'मधील त्रुटींमुळे अमेरिकेने भारताचे ५ कोटी रुपयांचे आंबे केले नष्ट; काय असते प्रक्रिया?
19
केवळ योगायोग, की...? दोन लागोपाठ अपयशांनी इस्रोने चिंतन आणि आत्मपरीक्षण करण्याची गरज
20
फ्रान्सचा बांगलादेशला झटका; मॅक्रो यांनी युनूस यांच्यासोबत द्विपक्षीय बैठकीस दिला नकार

नक्षलविरोधी मोहिमेत सुरक्षा यंत्रणांची ताकद होणार राष्ट्रीय महामार्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 04:07 IST

फहिम खान नागपूर : महाराष्ट्र आणि छत्तीसगडच्या नक्षल प्रभावित परिसरांना जोडणारा राष्ट्रीय महामार्ग पर्यटनासोबतच सुरक्षेच्या दृष्टीकोणातून भविष्यात फायद्याचा ठरू ...

फहिम खान

नागपूर : महाराष्ट्र आणि छत्तीसगडच्या नक्षल प्रभावित परिसरांना जोडणारा राष्ट्रीय महामार्ग पर्यटनासोबतच सुरक्षेच्या दृष्टीकोणातून भविष्यात फायद्याचा ठरू शकतो. नक्षलविरोधी अभियानाशी निगडित अधिकारी यावर खुलेआम बोलत नाहीत; परंतु हा मार्ग पूर्ण झाल्यानंतर या परिसरात वाहतूक वाढल्यामुळे नक्षलवाद्यांचा या परिसरातील प्रभाव कमी होणार आहे. आजही अबुझमाड परिसरात नक्षलवाद्यांचे एकछत्री राज्य सुरू आहे. अबुझमाड दक्षिण छत्तीसगडच्या बस्तर परिसरातील नारायणपूर जिल्ह्यात आहे.

छत्तीसगडमधील अबुझमाड जगातील सर्वात रहस्यमय स्थानांपैकी एक मानण्यात येते. जवळपास ४४०० वर्ग किलोमीटर परिसरातील अबुझमाडचे जंगल, पर्वत, दाट घाटांमधील अपरिचित २३७ गावांचे भू-सर्वेक्षण कधीच होऊ शकले नाही. मुगलांपासून इंग्रजांपर्यंत हे सर्वेक्षण करण्याचा प्रयत्न केला; परंतु त्यांना यश येऊ शकले नाही. हजारो वर्षांपासून या रहस्यमय परिसरात सुरक्षा दल, सरकारी मशीन प्रवेश करू शकल्या नाही. छत्तीसगडच्या अबुझमाडला नक्षलवाद्यांचा गड समजला जातो. आतापर्यंत महाराष्ट्र, छत्तीसगड पोलीसच नव्हे तर अर्ध सैनिक दलांनी अबुझमाडबाबत अनेक संयुक्त अभियान राबविले; परंतु आतापर्यंत त्यात अधिक यश मिळाले नाही. मात्र, गडचिरोली पोलीस नक्षलवाद्यांच्या या गडात अधिक खोलवर जाण्यात यशस्वी झाले आहेत; परंतु मोठ्या घटना घडवून आणल्यानंतर नक्षलवादी अबुझमाडच्या दाट जंगलात आणि रहस्यमय पहाडांमध्ये लपले असल्याचे आजपर्यंत दिसून आले आहे.

............

सीमेकडील भागात वाढणार आऊटपोस्ट

अबुझमाड परिसरात सुरक्षा यंत्रणांसोबत नक्षलवाद्यांची चकमक होते; परंतु वेळेवर सुरक्षा यंत्रणांना मदत मिळत नसल्यामुळे अनेकदा अभियानात मोठे नुकसान सहन करावे लागते. परंतु राष्ट्रीय महामार्ग तयार झाल्यानंतर सुरक्षा यंत्रणांना अभियानादरम्यान अतिरिक्त मदत पोहोचविण्याचा पर्याय उपलब्ध होणार आहे. महाराष्ट्रात सध्या गडचिरोली पोलिसांची अखेरची चौकी लाहेरीमध्ये आहे. त्यांनाही महामार्ग तयार झाल्यानंतर दोन्ही राज्यांच्या सीमेवर पोलिसांची संख्या वाढविण्याची संधी मिळणार आहे. दुसरीकडे छत्तीसगडमध्येही सीमेकडील भागात नव्या आऊटपोस्ट तयार केल्या जाऊ शकतात.

वाहतूक वाढल्यास तरुणांची दिशाभूल करू शकणार नाहीत नक्षलवादी

‘ज्या परिसरात बाहेरील नागरिकांची मदत पोहोचू शकत नाही, तेथील स्थानिक तरुणांची नक्षलवादी दिशाभूल करतात, असा आजवरचा अनुभव आहे. परंतु या भागात वाहतूक वाढल्यास तेथील तरुण बाहेरील जगाशी जोडले जातील. त्यांना रोजगाराच्या संधी मिळाल्यास त्यांची दिशाभूल करणे शक्य होणार नाही. या राष्ट्रीय महामार्गाशी हा परिसर बाहेरील जगाशी जोडला गेल्यानंतर नक्षलविरोधी अभियान आणि शासनाच्या लोकोपयोगी योजनांना गती मिळेल.’

-संदीप पाटील, पोलीस उपमहानिरीक्षक, गडचिरोली

............