शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
2
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
3
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
4
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
5
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
6
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
7
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
8
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
9
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
10
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
11
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
12
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
13
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
14
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
15
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
16
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
17
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
18
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
19
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
20
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रनिर्माण जुनी गोष्ट, राष्ट्राच्या पुनर्निर्माणासाठी सज्ज व्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 04:07 IST

- अभाविपच्या ६६ व्या राष्ट्रीय अधिवेशनाचे उद्घाटन लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : कुशल नेतृत्वामुळे भारताच्या पतनाचा कालखंड संपला आहे ...

- अभाविपच्या ६६ व्या राष्ट्रीय अधिवेशनाचे उद्घाटन

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : कुशल नेतृत्वामुळे भारताच्या पतनाचा कालखंड संपला आहे आणि उत्थानाच्या कालखंडास सुरुवात झाली आहे. राष्ट्रनिर्माणाच्या पलिकडे जाऊन आता राष्ट्राच्या पुनर्निर्माणाचा बिगुल वाजवायचा आहे, असे आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह भैयाजी उपाख्य सुरेश जोशी यांनी आज येथे केले. रेशीमबागेतील डॉ. हेडगेवार स्मृती भवन परिसरातील महर्षी व्यास सभागृहात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या ६६ व्या राष्ट्रीय अधिवेशनाचे उद्घाटन करताना ते उपस्थित तरुणांना मार्गदर्शन करत होते. व्यासपीठावर परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. छगन पटेल, राष्ट्रीय महामंत्री निधी त्रिपाठी, अधिवेशनाचे स्वागताध्यक्ष डॉ. संजीव चौधरी, उपाध्यक्ष रितू चाणेकर, विदर्भ प्रदेश अध्यक्ष प्रा. योगेश येणारकर, विदर्भ प्रांत मंत्री रवी दांडगे उपस्थित होते.

महाभारतात महात्मा विदुरांना आदेश देण्याचा अधिकार नव्हता. मात्र, त्यांनी आपला सत्य बोलण्याचा अधिकार कधीही सोडला नाही. लोकतंत्राच्या रक्षणासाठी सर्वसामान्यांनी सत्य बोलण्याच्या अधिकारात कधीही खंड पडू देऊ नये. महात्मा विदुराच्या भूमिकेत सर्वसामान्यांनी कायम राहावे, असे आवाहन भैयाजी जोशी यांनी केले. गेल्या ७० वर्षात भारताने पाच युद्धे लढली आणि त्यातील चार युद्धात जय मिळवला. एका युद्धात राजकीय उदासीनतेमुळे विजयापासून परावृत्त राहिलो. त्या चुकांतून आता शिकणे गरजेचे आहे. वर्तमानात भारताचा जो सन्मान वाढतो आहे, तो कुशल नेतृत्वामुळे आणि हे नेतृत्व सर्वसामान्यांचा सन्मान ठेवणारे आहे. या धोरणाला बल देण्यासाठी आत्मनिर्भर भारताचा नारा बुलंद करावा लागेल. त्यासाठी आपल्या अंत:करणात निर्माण झालेल्या हीनग्रंथीचा नायनाट करावा लागेल. ती वेळ आता आली आहे आणि येथून पुन्हा आपण जगाला शस्त्रदाता नव्हे तर शास्त्रदाता असल्याची जाणिव करवून द्यावी लागेल, असे जोशी यावेळी म्हणाले. संचालन रवी दांडगे यांनी केले तर आभार प्रा. योगेश येणारकर यांनी मानले.

भगवद्गीतेचे आचरण अभाविप करत आहे - छगन पटेल

कोरोना संक्रमणात बलाढ्य राष्ट्र अधोगतीला आले. मात्र, भारताने याही काळात दिशा देण्याचे काम केले. आयुर्वेदाने या महामारीतून बाहेर पडण्याचे मार्ग दिले. शिक्षणाचे भारतीयीकरण व्हावे, स्वदेशीचा अंतर्भाव असावा आणि विद्यार्थ्यांना शिक्षणाचे दडपण वाटू नये, अशी मागणी सातत्याने केली. त्याचा परिणाम नव्या शिक्षणधोरण २०२० मध्ये दिसून येत आहे. अ.भा. वि.प.ने आपल्या कार्यकर्तृत्त्वातून श्रीमद्भगवद्गीतेचे आचरण दाखवले असल्याचे राष्ट्रीय अध्यक्ष छगन पटेल यावेळी म्हणाले.

..........