शहरं
Join us  
Trending Stories
1
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
2
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
3
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
4
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
5
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
8
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
9
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
10
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
11
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
12
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
13
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
14
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
15
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
16
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
17
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
18
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
19
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
20
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू

राष्ट्रनिर्माण जुनी गोष्ट, राष्ट्राच्या पुनर्निर्माणासाठी सज्ज व्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 04:07 IST

- अभाविपच्या ६६ व्या राष्ट्रीय अधिवेशनाचे उद्घाटन लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : कुशल नेतृत्वामुळे भारताच्या पतनाचा कालखंड संपला आहे ...

- अभाविपच्या ६६ व्या राष्ट्रीय अधिवेशनाचे उद्घाटन

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : कुशल नेतृत्वामुळे भारताच्या पतनाचा कालखंड संपला आहे आणि उत्थानाच्या कालखंडास सुरुवात झाली आहे. राष्ट्रनिर्माणाच्या पलिकडे जाऊन आता राष्ट्राच्या पुनर्निर्माणाचा बिगुल वाजवायचा आहे, असे आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह भैयाजी उपाख्य सुरेश जोशी यांनी आज येथे केले. रेशीमबागेतील डॉ. हेडगेवार स्मृती भवन परिसरातील महर्षी व्यास सभागृहात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या ६६ व्या राष्ट्रीय अधिवेशनाचे उद्घाटन करताना ते उपस्थित तरुणांना मार्गदर्शन करत होते. व्यासपीठावर परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. छगन पटेल, राष्ट्रीय महामंत्री निधी त्रिपाठी, अधिवेशनाचे स्वागताध्यक्ष डॉ. संजीव चौधरी, उपाध्यक्ष रितू चाणेकर, विदर्भ प्रदेश अध्यक्ष प्रा. योगेश येणारकर, विदर्भ प्रांत मंत्री रवी दांडगे उपस्थित होते.

महाभारतात महात्मा विदुरांना आदेश देण्याचा अधिकार नव्हता. मात्र, त्यांनी आपला सत्य बोलण्याचा अधिकार कधीही सोडला नाही. लोकतंत्राच्या रक्षणासाठी सर्वसामान्यांनी सत्य बोलण्याच्या अधिकारात कधीही खंड पडू देऊ नये. महात्मा विदुराच्या भूमिकेत सर्वसामान्यांनी कायम राहावे, असे आवाहन भैयाजी जोशी यांनी केले. गेल्या ७० वर्षात भारताने पाच युद्धे लढली आणि त्यातील चार युद्धात जय मिळवला. एका युद्धात राजकीय उदासीनतेमुळे विजयापासून परावृत्त राहिलो. त्या चुकांतून आता शिकणे गरजेचे आहे. वर्तमानात भारताचा जो सन्मान वाढतो आहे, तो कुशल नेतृत्वामुळे आणि हे नेतृत्व सर्वसामान्यांचा सन्मान ठेवणारे आहे. या धोरणाला बल देण्यासाठी आत्मनिर्भर भारताचा नारा बुलंद करावा लागेल. त्यासाठी आपल्या अंत:करणात निर्माण झालेल्या हीनग्रंथीचा नायनाट करावा लागेल. ती वेळ आता आली आहे आणि येथून पुन्हा आपण जगाला शस्त्रदाता नव्हे तर शास्त्रदाता असल्याची जाणिव करवून द्यावी लागेल, असे जोशी यावेळी म्हणाले. संचालन रवी दांडगे यांनी केले तर आभार प्रा. योगेश येणारकर यांनी मानले.

भगवद्गीतेचे आचरण अभाविप करत आहे - छगन पटेल

कोरोना संक्रमणात बलाढ्य राष्ट्र अधोगतीला आले. मात्र, भारताने याही काळात दिशा देण्याचे काम केले. आयुर्वेदाने या महामारीतून बाहेर पडण्याचे मार्ग दिले. शिक्षणाचे भारतीयीकरण व्हावे, स्वदेशीचा अंतर्भाव असावा आणि विद्यार्थ्यांना शिक्षणाचे दडपण वाटू नये, अशी मागणी सातत्याने केली. त्याचा परिणाम नव्या शिक्षणधोरण २०२० मध्ये दिसून येत आहे. अ.भा. वि.प.ने आपल्या कार्यकर्तृत्त्वातून श्रीमद्भगवद्गीतेचे आचरण दाखवले असल्याचे राष्ट्रीय अध्यक्ष छगन पटेल यावेळी म्हणाले.

..........