शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
2
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
3
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
4
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
5
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
6
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
7
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
8
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
9
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
10
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
11
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
12
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
13
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
14
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
15
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
16
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
17
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
18
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...
19
निर्वस्त्र करुन मारहाण, एक्स गर्लफ्रेंडसोबत संबंध; मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीने संपवले आयुष्य
20
मोहम्मद सिराजचा मोठा पराक्रम, गोलंदाज असूनही मोडला धोनीचा रेकॉर्ड!

‘नंदग्राम’ दहा वर्षांपासून कागदावरच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:06 IST

गोठे व जनावरांच्या त्रासातून मुक्तता होईना : अर्थसंकल्पात नंदग्रामसाठी तरतूद नाही लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : स्मार्ट सिटीकडे वाटचाल ...

गोठे व जनावरांच्या त्रासातून मुक्तता होईना : अर्थसंकल्पात नंदग्रामसाठी तरतूद नाही

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : स्मार्ट सिटीकडे वाटचाल सुरू असलेल्या उपराजधानीतील जनावरांच्या गोठ्यामुळे नागरिक त्रस्त आहेत. यातून त्यांची मुक्तता व्हावी, मोकाट जनावरांच्या त्रासातून सुटका व्हावी, यासाठी दहा वर्षांपूर्वी महापालिका प्रशासनाने गुजरातच्या धर्तीवर भांडेवाडीलगतच्या वाठोडा परिसरात ४४.०६ एकर परिसरात ३९.१२ कोटीचा ‘नंदग्राम’ प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेतला होता. परंतु अजूनही हा प्रकल्प कागदावरच आहे. विशेष म्हणजे शहर विकासाचा दावा करणाऱ्या मनपा अर्थसंकल्पात यासाठी कोणतीही तरतूद करण्यात आलेली नाही.

नागपूर शहरात १०४६ गोठे आहेत. यात ४५७ अधिकृत तर ५८९ अनधिकृत आहेत. वर्दळीच्या व निवासी भागातील गोठ्यामुळे आजूबाजूच्या नागरिकांना त्रास होतो. आरोग्यालाही धोका निर्माण झाला आहे.

अनेक गोपालक आपली जनावरे मोकाट सोडतात. यामुळे अपघात होतात. याचा विचार करता शहरातील जनावरांचे गोठे शहराबाहेर स्थलांतरित करण्यासाठी नंदग्राम प्रकल्पाची संकल्पना मांडण्यात आली होती. सुरुवातीला गोरेवाडा परिसरातील २० हेक्टर खासगी जागेत हा प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र मनपाची आर्थिक परिस्थिती विचारात घेता, हा प्रकल्प राबविणे शक्य नसल्याने वाठोडा परिसरातील मनपाच्या जागेवर हा प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. येथे प्रत्येकी १० जनावरांसाठी ४६८ शेड उभारले जाणार आहेत. यात ४,६८० जनावरांची व्यवस्था केली जाणार आहे. सोबतचा गुरांचा दवाखाना, पाणीपुरवठा, दूध साठविण्यासाठी शीतगृह, चराईक्षेत्र, गोपालकांच्या निवासाची सुविधा अशा बाबींचा या प्रकल्पात समावेश आहे.

......

नियमाचे उल्लंघन होत असल्याच्या तक्रारी

जनावरांच्या गोठ्यांना परवानगी देण्याचे अधिकार पशुसंवर्धन विभागाला आहेत. परवानगी घेतलेले ४५७ गोठे असून, विना परवानगी ५८९ गोठे आहेत. दाट वस्तीतील गोठ्यांमुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. अशा गोपालकांकडून महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नियमांचे तसेच महाराष्ट्र किपिंग अँड मुव्हमेंट ऑफ कॅट इन अर्बन एरिया (नियंत्रण) अधिनियम, १९७६ चे पालन केले जात नसल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत.

....

अनधिकृत गोठ्यांवर नियंत्रण कुणाचे?

सर्व्हनुसार शहरात १५ हजार जनावरे आहेत. १०६५ पैकी ५८९ गोठे अनधिकृत आहेत. अनेक गोपालक आपली जनावरे मोकाट सोडतात. यामुळे परिसरातील नागरिकांना त्रास होतो, सोबतच अपघात होतात. यात अनेकांचा बळी गेला आहे. यावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी कुणाची, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

....

नंदग्राम लवकरच कार्यान्वित होईल

नंदग्राम हा मनपाचा ड्रीम प्रोजेक्ट आहे. या प्रकल्पामुळे नागरिकांची गुरांच्या त्रासातून मुक्तता होईल. आर्थिक मदतीसाठी हा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविला आहे. हा प्रकल्प लवकरच कार्यान्वित होणार आहे. जनावरे पाळण्याला परवानगी देण्याचे अधिकार पशुसंवर्धन विभागाला आहे. मात्र रस्त्यावर फिरणाऱ्या जनावरांना आळा घालण्याची जबाबदारी मनपाची आहे. ती पार पाडली जाते.

डॉ. गजेंद्र महल्ले,पशुचिकित्सा अधिकारी मनपा

...

असा आहे नंदग्राम आराखडा

- ४४.०६ एकर परिसरात ३९.१२ कोटींचा प्रकल्प

- एका छताखाली ४,६८० जनावरे

- मनपा ४६० शेड उभारणार

- प्रत्येक शेडमध्ये १० जनावरांची व्यवस्था

- गोरक्षकाचे निवास व चरण्यासाठी २ एकरचे मैदान

- गोपालकासाठी राहण्याची व्यवस्था

- जनावरांना चरण्यासाठी तीन मोकळी मैदाने

- जनावरांवर उपचारांसाठी पशुवैद्यकीय अधिकारी