शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
5
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
6
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
7
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
8
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
9
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
10
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
11
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
12
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
13
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
14
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
15
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
16
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
17
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
18
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
19
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
20
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
Daily Top 2Weekly Top 5

नंदा जिचकार नव्या महापौर

By admin | Updated: March 2, 2017 02:20 IST

नागपूरच्या नव्या महापौर नंदा जिचकार तर उपमहापौर दीपराज पार्डीकर हे असतील.

मनपाचे कारभारी ठरले रविवारी विशेष सभेत निवड काँग्रेस,बसपाही लढणार नागपूर: नागपूरच्या नव्या महापौर नंदा जिचकार तर उपमहापौर दीपराज पार्डीकर हे असतील. स्थायी समितीच्या अध्यक्षपदी संदीप जाधव तर सत्तापक्षनेते म्हणून संदीप जोशी जबाबदारी पार पाडतील. भाजपचे निरीक्षक व प्रभारी आ. अनिल सोले यांनी बुधवारी महापालिका मुख्यालयाच्या प्रांगणात आयोजित भाजप नगरसेवकांच्या बैठकीत यासंबंधीची घोषणा केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या संमतीने ही निवड करण्यात आली आहे. रविवारी महापालिकेची विशेष सभा आहे. तीत महापौर-उपमहापौर पदासाठी निवडणूक होईल. अल्पमतात असलेल्या काँग्रेस व बसपानेही निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेसतर्फे महापौर पदासाठी स्नेहा विवेक निक ोसे यांनी तर उपमहापौर पदासाठी नितीश ग्वालबंशी यांनी उमेदवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. बसपातर्फे महापौर पदासाठी वंदना चांदेकर यांनी तर उपमहापौर पदसाठी नरेंद्र वालदे यांनी बुधवारी उमेदवारी अर्ज दाखल केले. राष्ट्रवादीने तटस्थ भूमिका घेतली तर शिवसेना मात्र संभ्रमात आहे. भाजपाच्या बाजूने एकतर्फी संख्याबळ असल्यामुळे भाजपचा विजय निश्चित असून निवडणूक ही औपचारिकता ठरणार आहे. निवडणुकीनंतर लगेच विजयी महापौर व उपमहापौर पदभार स्वीकारतील. भाजपाने गेल्या दहा वर्षात अडचणीवर मात करून लोकांचा विश्वास संपादन केला. पारदर्शी व विकासात्मक कारभारामुळे लोकांनी निवडणुकीत पुन्हा विश्वास दर्शविला. येणाऱ्या दिवसात नागपूर शहर विकासाच्या बाबतीत नंबर वन होईल, अशी ग्वाही आ. अनिल सोले यांनी दिली. यावेळी मावळते महापौर प्रवीण दटके, भाजपचे शहर अध्यक्ष आ. सुधाकर कोहळे, सुधाकर देशमुख, कृष्णा खोपडे, विकास कुंभारे, सत्तापक्ष नेते दयाशंकर तिवारी, नंदा जिचकार, संदीप जोशी, संदीप जाधव, माजी महापौर माया इवनाते व जयप्रकाश गुप्ता यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या मार्गदर्शनात गेल्या वर्षभरात आमदार, पक्षाचे पदाधिकारी, महापालिकेतील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली. यामुळे निवडणुकीत महापालिके च्या इतिहासात भाजपला विक्रमी १०८ जागांवर विजय मिळाला. महापालिकेत गेल्या दहा वर्षापासून भाजपची सत्ता आहे. लोकांना दिलेली आश्वासने पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. पारदर्शक कारभार व विकासावर मतदारांनी विश्वास ठेवला. या विश्वासाला तडा जाणार नाही. दिलेली आश्वासने पूर्ण करू, अशी ग्वाही सुधाकर कोहळे यांनी दिली. (प्रतिनिधी)