शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
2
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
3
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
4
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
5
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
6
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
7
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
8
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
9
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
10
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
11
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
12
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
13
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
14
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
15
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
16
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
17
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
18
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
19
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
20
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!

नानांचा गडकरींना सवाल, वयाच्या साठीनंतर ड्रायव्हिंगमधून निवृत्ती का नको ?

By योगेश पांडे | Updated: January 7, 2024 21:17 IST

नाना पाटेकरांच्या भरधाव प्रश्नांवर गडकरींची संयमित उत्तरांची ‘ड्रायव्हिंग’

योगेश पांडे 

नागपूर : राजकीय व सिने क्षेत्रातील परखड भाष्य करणारे व खडेबोल सुनावणारे दोन व्यक्तिमत्त्व म्हणजे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व नाना पाटेकर. रस्ते सुरक्षेच्या मुद्द्यांवर दोघेही संवेदनशील असून या विषयावर नागपुरात झालेल्या मुलाखतीचा कार्यक्रम चांगलाच रंगला. नाना पाटेकरांच्या भरधाव प्रश्नांवर गडकरींनी संयमित उत्तरे देत सुरक्षित ‘ड्रायव्हिंग’ केली. विशेष म्हणजे वयाच्या साठीनंतर ड्रायव्हिंगमधून निवृत्ती का नको हा नानांचा सवाल एका नवीन चर्चेला सुरुवात करणारा ठरला. 

नागपुरात रविवारी ‘न्यूज १८- लोकमत’तर्फे वनामती सभागृहात आयोजित रस्ते सुरक्षा मोहिम कार्यक्रमादरम्यान अभिनेते नाना पाटेकर यांनी त्यांची मुलाखत घेतली. यावेळी ते बोलत होते. यावेळी नाना पाटेकर यांनी ज्येष्ठ नागरिकांच्या ड्रायव्हिंगचा मुद्दा मांडला. वयाच्या साठीनंतर शरीर थकते व डोळेदेखील हवी तशी साथ देत नाहीत. अशा स्थितीत त्यांना ड्रायव्हिंगमधून निवृत्ती का नको किंवा एखादी चाचणी आवश्यक का नको असा सवाल नाना पाटेकर यांनी केला. ६५ वर्षे वयानंतर लोकांनीच स्वतः ठरवायला हवे की आपले वय झाले आहे, आता आपण गाडी चालवणार नाही. लोकांनी आपल्या सुरक्षेचा निर्णय स्वतःच घ्यावा, असे गडकरी म्हणाले. मी स्वत: गाडी चालविणार नाही अशी घोषणा नाना पाटेकर यांनी यावेळी केली.

देशातील ३६०० ब्लॅक स्पॉट्स शोधले

 देशातील रस्ते चांगले होत असताना त्यावरील अपघातांमध्ये होणारे मृत्यू हा निश्चितच चिंतेचा विषय आहे. अपघात होण्यामागची कारणे शोधून त्यावर आम्ही उपाययोजना करतोय. रोड इंजिनियरिंगमध्ये असलेल्या त्रुटी सुधारण्याचे काम सुरू झाले आहे. त्यासाठी ३६०० ब्लॅक स्पॉट्स शोधून काढले आहेत. नागपूर जिल्ह्यातील ब्लॅक स्पॉट्सदेखील शोधण्यात आले असून ते लवकरच सुधारण्यात येतील, असे प्रतिपादन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी केले. 

देशात वाहतुकीचे नियम कडक केले व दंडदेखील वाढवला. अगदी कठोर कायदेदेखील केले. मात्र तरीदेखील अपघात थांबलेले नाहीत. रस्ते चांगले झाले म्हणून अपघात होत आहेत, अशी टीका काही लोक करतात. मात्र प्रत्यक्षात प्रशासन, जनता या सगळ्यांनी मिळून यासाठी पुढाकार घ्यायची गरज आहे. नागरिकांमध्ये वाहतूकीच्या नियमांबाबत संवेदनशीलता निर्माण झाली पाहिजे. त्यासाठी शालेय विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे धडे मिळाले पाहिजे. त्यासाठी शाळा, महाविद्यालय, स्वयंसेवी संस्था यांनी प्रयत्न करायला पाहिजेत, असे गडकरी म्हणाले.

मानवी वर्तन बदलल्याशिवाय प्रश्न सुटणार नाही

देशात रस्ते अपघातांत १ लाख ६८ हजार मृत्यू होतात. मृत्यू होणाऱ्यांमध्ये १८ ते ३४ वर्षे वयोगटाच्या तरुणांचे ६५ टक्के प्रमाण आहे. ही अत्यंत वेदनादायी बाब आहे. एखाद्या कुटुंबातील तरुणाचा मृत्यू झाला की त्याच्या कुटुंबाचे मोठे नुकसान होत असते, अशी वेदना गडकरी यांनी बोलून दाखविली. लोकांना कायद्याची भीती नाही आणि कायद्याबद्दल सन्मानही नाही. समाजाने यात सुधारणा केली तर अपघात नक्कीच कमी होती. मानवी वर्तन बदलल्याशिवाय हा प्रश्न सुटणार नाही, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

महामार्गांसाठी बस कोड तयार

देशात चारचाकींमध्ये सहा एअरबॅग्स अनिवार्य केल्या आहेत. ट्रकच्या कॅबिनमध्ये एअरकंडीशन अनिवार्य करण्यात आले आहे. समृद्धी महामार्गावरील घटनेनंतर बस कोड तयार केला आहे. जर्मनी, इंग्लंडप्रमाणेच आंतरराष्ट्रीय दर्जाच्या व्हॉल्वो बसेस लवकरच भारतातही बघायला मिळतील, अशी माहिती गडकरी यांनी दिली.

चार वर्षांत नागपुरातील सर्व रस्ते कॉंक्रीटचे करणार

यावेळी गडकरी यांनी नागपुरातील कॉंक्रीटचे रस्ते पुढील अनेक वर्षे टिकतील असा दावा केला. शहरात व्हाईट कॉक्रिंटने तयार करण्यात येणारे रस्ते मजबूत आहेत. येत्या चार वर्षांत इतर सर्व महत्त्वाचे रस्तेदेखील कॉंक्रीटचे करणार असे त्यांनी सांगितले.