शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
2
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
3
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
4
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
5
जातनिहाय जनगणनेला RSS ने दीड वर्षांअगोदरच केरळमधून दाखविला होता हिरवा झेंडा
6
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
7
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
8
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
11
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
12
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
13
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
14
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
15
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
16
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
17
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
18
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
19
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
20
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत

स्वयंचलित मीटर वाचनात नागपूरची आघाडी

By admin | Updated: April 11, 2017 02:20 IST

आपण वापरलेल्या विजेचे अचूक व वेळेत बिल मिळावे, अशी वीज ग्राहकांची अपेक्षा असते.

महावितरण : वीज बिलात अचूकता नागपूर : आपण वापरलेल्या विजेचे अचूक व वेळेत बिल मिळावे, अशी वीज ग्राहकांची अपेक्षा असते. ही बाब लक्षात घेऊन महावितरणने सुरुवातीपासूनच अद्ययावत पद्धतीचे अचूक मीटर रीडिंग व्हावे, यासाठी आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित नवनवीन प्रयोगांची अंमलबजावणी केली आहे. यापैकी सर्वाधिक नवीन तंत्रज्ञान असलेल्या स्वयंचलित मीटर वाचन (एएमआर) तंत्रज्ञानाचा वापर करण्यात नागपूर परिक्षेत्राने राज्यात आघाडी घेतली आहे. महावितरणने राज्यातील उच्च दाब ग्राहकांसाठी स्वयंचलित मीटर वाचनाद्वारे (एएमआर) बिलिंग यंत्रणा सुरू केली आहे. त्यामुळे ग्राहकांच्या वीज बिलात अचूकता आली आहे. महावितरणच्या नागपूर परिक्षेत्रात नागपूर, अकोला, अमरावती, चंद्रपूर आणि गोंदिया या पाच परिमंडलाचा समावेश असून, ही पाचही परिमंडल मिळून एकूण २५५१ उच्च दाब ग्राहक आहेत. यापैकी मार्च २०१७ च्या वीज वापरापोटी २,१९५ ग्राहकांकडील मीटरचे वाचन स्वयंचलित झाले असून हे प्रमाण तब्बल ८६ टक्के आहे, तर त्याखालोखाल औरंगाबाद परिक्षेत्रातील प्रमाण ७६.८ टक्के, कल्याण परिक्षेत्रात ७५.१ टक्के तर पुणे परिक्षेत्रात हे प्रमाण ७४.९ टक्के आहे. महावितरणच्या नागपूर परिक्षेत्राचे प्रादेशिक संचालक प्रसाद रेशमे यांनी २ आॅक्टोबर २०१६ रोजी आपल्या पदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर आधुनिकीकरण आणि अचूकता यावर विशेष भर दिला आणि त्यामुळेच नागपूर परिक्षेत्राने राज्यात स्वयंचलित मीटर वाचन यंत्रणेच्या वापरात राज्यात आघाडी घेतली आहे. याशिवाय नागपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता रफीक शेख, चंद्रपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता दिलीप घुगल, गोंदिया परिमंडलाचे मुख्य अभियंता जिजोबा पारधी, अमरावती परिमंडलाचे मुख्य अभियंता सुहास रंगारी आणि अकोला परिमंडलाचे वर्तमान मुख्य अभियंता अरविंद भादीकर व पूर्वीचे प्रभारी मुख्य अभियंता दिलीप दोडके यांनी त्यांच्या परिमंडलातील अधीक्षक अभियंते आणि चाचणी मंडलाचे अधीक्षक अभियंता बंडू वासनिक यांच्यासह सर्वांनी प्रयत्न केले.(प्रतिनिधी)बिलिंगमध्येही नागपूर परिक्षेत्र पुढे महावितरणच्या नागपूर परिक्षेत्रातील उच्च दाब ग्राहकाकडील मीटरचे वाचन दर महिन्याच्या शेवटच्या दिवशी होऊन पुढील पाच दिवसात त्यांचे बिलिंग होऊन ते ग्राहकांच्या ई-मेलवर मिळायलाच हवे यावर काटेकोरपणे अंमलबजावणी सुरू असल्याने ३१ मार्च रोजी मीटर वाचन करून ५ एप्रिलपर्यंत सर्व ग्राहकांना त्यांचे वीज देयक ई-मेल च्या माध्यमातून पाठविण्यात आले आहेत. त्यानुसार मार्च महिन्याच्या बिलिंगमध्ये नागपूर परिक्षेत्राने सर्व २५५१ ग्राहकांचे बिंलिंग यशस्वीरीत्या करीत राज्यात आघाडी घेतली आहे. नागपूरपाठोपाठ पुणे परिक्षेत्राने ९९.८९ टक्के, औरंगाबाद परिक्षेत्राने ९९.३८ तर कल्याण परिक्षेत्राने ९८.९७ टक्के ग्राहकांचे बिलिंग केले आहे.