शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

आंतरराष्ट्रीय मेडिकल हब होण्याची नागपुरात क्षमता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2017 01:42 IST

आरोग्यसेवेच्या क्षेत्रात इतर देशांच्या तुलनेत भारतात स्वस्त दरात उपचार होतात. त्यामुळे या क्षेत्रात प्रगतीच्या अनेक संधी आहेत.

ठळक मुद्देमुख्यमंत्री : ‘इंडो-यूके इन्स्टिट्यूट आॅफ हेल्थ मेडिसिटी’च्या कोनशिलेचे अनावरण

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आरोग्यसेवेच्या क्षेत्रात इतर देशांच्या तुलनेत भारतात स्वस्त दरात उपचार होतात. त्यामुळे या क्षेत्रात प्रगतीच्या अनेक संधी आहेत. नागपूरचे भौगोलिक स्थान लक्षात घेता, या शहरात आंतरराष्ट्रीय मेडिकल हब होण्याची पूर्ण क्षमता आहे. विशेष म्हणजे येत्या काळात येथे ‘मेडिकल टुरिझम’ वाढीस लागले, असा विश्वास राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. देशातील पहिल्या ‘इंडो-यूके इन्स्टिट्यूट आॅफ हेल्थ मेडिसिटी’च्या कोनशिलेचे रविवारी अनावरण करण्यात आले. यावेळी ते मुख्य अतिथी म्हणून बोलत होते.वर्धा मार्गावरील एका हॉटेलमध्ये झालेल्या या कार्यक्रमाला खा.अजय संचेती, खा.कृपाल तुमाने, आ.सुधाकर कोहळे, आ.सुधाकर देशमुख, आ.आशिष देशमुख, आ.प्रकाश गजभिये, महापौर नंदा जिचकार, ‘एमएडीसी’चे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक सुरेश काकाणी, विभागीय आयुक्त अनुपकुमार, ‘इंडो-यूके इन्स्टिट्यूट आॅफ हेल्थ मेडिसिटी’चे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.अजय राजन गुप्ता, ब्रिटिश उच्चायुक्तामधील व्यापार, वित्त विभागाच्या उपसंचालिका जेन ग्रेडी, ईआन वॉटसन, मार्क हिचमॅन प्रामुख्याने उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागील वर्षी यासंदर्भात ब्रिटनच्या पंतप्रधानांसोबत करार केला होता. त्याअंतर्गत देशात ११ ‘मेडिसिटी’ स्थापन होणार आहेत. यातील पहिल्या ‘मेडिसिटी’च्या स्थापनेचा मान नागपूरला मिळाला आहे. नागपूर ही व्याघ्र राजधानी आहे. अशास्थितीत येथे उपचार घ्यायला येणाºया विदेशी रुग्णांना नैसर्गिक पर्यटनाचादेखील आनंद घेता येईल. २०१९ पर्यंत ‘मेडिसिटी’चा पहिला टप्पा पूर्ण होईल, असे यावेळी मुख्यमंत्री म्हणाले. या प्रकल्पाच्या माध्यमातून ब्रिटनमधील तज्ज्ञ, संशोधक नागपुरात येतील. यामुळे येथील आरोग्यसेवेचा दर्जा सुधारण्यास मदत होईल शिवाय दोन्ही देशांमधील संबंध आणखी मजबूत होतील, असे प्रतिपादन जेन ग्रेडी यांनी केले. डॉ.अजय राजन गुप्ता यांना प्रास्ताविक केले. यावेळी दीपक डागा यांनी प्रकल्पाचे सादरीकरण केले.दोन लाख लोकांना रोजगार मिळणार‘मिहान-सेझ’मधील १५२.७२ एकर जमिनीवर उभा होणारा ‘इंडो-युके इन्स्टिट्यूट आॅफ हेल्थ मेडिसिटी’चा प्रकल्प तीन टप्प्यांत पूर्ण होणार असून याला सात ते नऊ वर्षे लागतील. पूर्ण प्रकल्पात इस्पितळ, महाविद्यालय, हॉटेल, रिटेल इत्यादींचा समावेश आहे. पहिला टप्पा २०१९ पर्यंत पूर्ण होईल व केवळ इस्पितळाच्या माध्यमातून सुमारे तीन हजार रोजगार निर्माण होणार आहेत. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे दोन लाख लोकांना रोजगार मिळेल, असा दावा डॉ.अजय राजन गुप्ता यांनी कार्यक्रमानंतर झालेल्या पत्रपरिषदेत केला.