शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
5
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
6
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
7
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
8
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
9
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
10
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
11
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
12
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
13
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
14
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
15
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
16
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
17
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
18
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
19
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
20
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ

नागपूकर श्रोत्यांचा शाहीद रफी यांना तुफान प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2017 16:12 IST

लोकमत सखी मंच आणि हार्मोनी इव्हेंटने ‘अंदाज-ए-रफी’ हा विशेष कार्यक्रम आयोजित केला आणि या कार्यक्रमात स्वत: मोहम्मद रफी यांचे चिरंजीव शाहीद रफी यांनी गीत, संवादातून आपल्या लाडक्या वडिलांच्या अनेक न ऐकलेल्या कथा श्रोत्यांना सांगितल्या.

ठळक मुद्देगीत, संवादातून उलगडत गेला ‘अंदाज-ए-रफी’लोकमत सखी मंच आणि हार्मोनी इव्हेंटचे आयोजन

आॅनलाईन लोकमतनागपूर : मोहम्मद रफी. भारतीय संगीतसृष्टीच्या प्रवासातील असा मैलाचा दगड ज्याच्या पुढचा टप्पा कधी कुणाला गाठताच आला नाही. अशा या महान अन् आख्यायिका ठरलेल्या गायकाला आजच्या पिढीने केवळ ऐकलेय. ते कसे दिसायचे, कसे गायचे हे या पिढीला कळावे यासाठी लोकमत सखी मंच आणि हार्मोनी इव्हेंटने ‘अंदाज-ए-रफी’ हा विशेष कार्यक्रम आयोजित केला आणि या कार्यक्रमात स्वत: मोहम्मद रफी यांचे चिरंजीव शाहीद रफी यांनी गीत, संवादातून आपल्या लाडक्या वडिलांच्या अनेक न ऐकलेल्या कथा श्रोत्यांना सांगितल्या. बुधवारी डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात सादर झालेल्या या कार्यक्रमाला नागपूरकर श्रोत्यांनी तूफान गर्दी केली होती.या कार्यक्रमाचा प्रारंभ प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर, संगीततज्ज्ञ अकील अहमद, श्रद्धा महिला सहकारी संस्थेच्या अध्यक्ष सोनाली हिवरकर, त्यांच्या सहकारी त्रिवेणी वैद्य, महदीबागचे प्रमुख अमीर मलक आणि हार्मोनी इव्हेंटचे संचालक राजेश समर्थ यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने झाला. संजय पोटदुखे यांनी ओ दुनिया के रखवाले...या रफी साहेबांच्या गीताने कार्यक्रमाची सुरुवात केली. आसमा से आया फरिश्ता...हे गीत गात गिनीज बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आपले नाव समाविष्ट करणारे सुनील वाघमारे मंचावर आले. अखेर तो क्षण आला जेव्हा शाहीद रफी यांच्या नावाची घोषणा झाली. मोहम्मद रफी यांचा मुलगा नेमका कसा दिसतो, कसा गातो, याची उत्सुकता शिगेला पोहोचली असताना प्रेक्षकांमधून एक गोड आवाज निनादायला लागला. बडी दूर से आये हैं....गात शाहीद रफी यांनी थेट श्रोत्यांमधून एन्ट्री घेतली आणि त्यांची एक झलक टिपण्यासाठी शेकडो मोबाईल कॅमेरे एकाच वेळी पुढे सरसावले. यानंतर सलग चार गाणे सादर करीत शाहीद यांनी श्रोत्यांना अक्षरश: वेड लावले. बार बार देखो..., गुलाबी आँखें..., आज कल तेरे मेरे प्यार के चर्चे...या त्यांच्या गीतांवर श्रोत्यांनी मनसोक्त फेर धरला. चाँद मेरा दिल..., दर्दे दिल दर्दे जिगर...बने चाहे दुश्मन...ही गाणीही त्यांनी अतिशय तन्मयतेने सादर केली. त्यांना सारेगामा फेम आकांक्षा नगरकर हिने सुरेल साथ दिली. प्रसिद्ध पार्श्वगायक एम. ए. कादर, झीनत कादर यांनीही आवारा हुवा बादल...सारखे गाणे गात रफी साहेबांच्या सोनेरी काळाची आठवण करून दिली.या सर्व गायकांना की-बोर्डवर पवन मानवटकर, राजा राठोड, गिटार- प्रकाश चव्हाण, बेस गिटार- रॉबिन विलियम, ड्रम-अशोक ठवरे, आॅक्टोपॅड- नंदू गोहणे, ढोलक- बालू यादव, तबला- अशोक तोकलवार, तुंबा कांगो- राजेश धामणकर तर तालवाद्यावर उज्ज्वला गोकर्ण यांनी सुरेल सहसंगत केली. या कार्यक्रमाची संकल्पना-निवेदन राजेश समर्थ यांचे होते. उद्घाटनीय सत्राचे संचालन सखी मंचच्या संयोजिका नेहा जोशी यांनी केले. 

फकिराने दिली प्रेरणाया कार्यक्रमात श्रोते आणि शाहीद यांच्यात मनमोकळा संवाद रंंगला. रफी साहेबांना गाण्याची प्रेरणा कुठून मिळाली, या प्रश्नावर शाहीद म्हणाले, बाबा लहान असताना पंजाबमधल्या घरासमोरून एक फकीर रोज गात जायचा. बाबा त्याच्या मागे जायचे व त्याला ऐेकत राहायचे. एक दिवस त्याने बाबांना गायला सांगितले तेव्हा त्यांनी त्या फकिराचेच गाणे गायले. ते इतके अप्रतिम झाले की त्या फकिराने बाबांना तू मोठा गायक होशील असा आशीर्वाद दिला आणि बाबा खरंच मोठे गायक झाल्याचे शाहीद यांनी सांगितले. याशिवाय शाहीद यांनी रफी साहेबांची आवडती गाणी, त्यांच्या आयुष्यातील चढउतार, त्यांचा मित्रपरिवार, त्यांची जीवनाकडे बघण्याची दृष्टी अशा विविध पैलूंवर रंजक प्रकाश टाकला. गच्च भरलेले सभागृहही रफी साहेबांच्या या आठवणींमध्ये हरखून गेले.

टॅग्स :cultureसांस्कृतिक