शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
2
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
3
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
4
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
5
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
6
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
7
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
8
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
9
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
10
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
11
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
12
आता वेटिंगची चिंता नको; 'वंदे भारत'ला जोडणार चार डबे! ३१२ अतिरिक्त प्रवासी प्रवास करणार
13
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
14
एमबीबीएसच्या कट ऑफमध्ये घट; खुल्या प्रवर्गाची गुणवत्ता यादी ५०९ पर्यंत घसरली
15
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
16
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
17
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
18
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
19
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 
20
हेल्थ-लाईफ इन्शुरन्स, दैनंदिन वापराच्या गोष्टी होणार स्वस्त; या गोष्टी महागणार, दिवाळीनंतर GST मध्ये मोठा बदल

नागपूरकर तरुणांनी पादाक्रांत केले ३३ किल्ले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2019 23:00 IST

सह्याद्रीच्या अंगाखांद्यावर, कडे कपाऱ्यात अनेक गड आजही ताठ मानेने आपल्या पूर्वजांच्या स्मृती जपत उभे आहेत. राकट अशा सह्याद्रीतील अफाट, बेलाग गडकोट म्हणजे इथल्या जाज्वल्य इतिहासाचे अतुट नाते सांगणारे अनमोल रत्न होत. महाराष्ट्राच्या डोंगरदऱ्यात दडलेल्या गडकोटांच्या या इतिहासाला गवसणी घालण्याचा प्रयत्न करीत नागपूरच्या दोन तरुणांनी ३३ किल्ले पादाक्रांत करण्याची कामगिरी बजावली.

ठळक मुद्देमोटरसायकलने ३६०० किमी प्रवास : लेणी, वाडे, पुरातन मंदिरांनाही भेटी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सह्याद्रीच्या अंगाखांद्यावर, कडे कपाऱ्यात अनेक गड आजही ताठ मानेने आपल्या पूर्वजांच्या स्मृती जपत उभे आहेत. राकट अशा सह्याद्रीतील अफाट, बेलाग गडकोट म्हणजे इथल्या जाज्वल्य इतिहासाचे अतुट नाते सांगणारे अनमोल रत्न होत. महाराष्ट्राच्या डोंगरदऱ्यात दडलेल्या गडकोटांच्या या इतिहासाला गवसणी घालण्याचा प्रयत्न करीत नागपूरच्या दोन तरुणांनी ३३ किल्ले पादाक्रांत करण्याची कामगिरी बजावली.किल्लेप्रेमी विशाल देवकर आणि अभिषेक सावरकर अशी या दोन तरुणांची नावे. विशाल हा दुर्गप्रेमी म्हणून प्रसिद्ध असून शिवरायांचा इतिहासाची साक्ष देणाऱ्या किल्ल्यांची निर्मिती करणे हा त्याचा छंद आहे. हे दुर्गप्रेम त्याला स्वस्थ बसू देत नाही. या निर्मितीसाठी त्याने गडकिल्ल्यांना भेटी दिल्या आहेत. यावेळी मात्र मोठे आव्हान त्याने स्वीकारले. विशाल व त्याचा मित्र अभिषेक मोटरसायकलवर स्वार होऊन २४ मार्च रोजी नागपूरहून या गडकोटांच्या भेटीसाठी निघाले. या १३ दिवसात तब्बल ३६०० किलोमीटरचा प्रवास करीत या दोघांनी ३३ किल्ले व प्रेरणास्थळे पालथी घातली. जिजाऊंचे जन्मस्थळ असलेले सिंदखेड राजा, देवगिरीचा किल्ला, सर्वाधिक उंचीवर असलेला साल्हेरचा किल्ला असे अनेक गडकोट पादाक्र ांत केले. याशिवाय त्यांनी अनेक लेणी, ऐतिहासिक वाडे, पुरातन मंदिरे अशा स्थळांनाही भेटी दिल्या. नागपुरातून सुरू झालेला प्रवास बुलडाणा, जळगाव, औरंगाबाद, नाशिक, पुणे असा होत पुन्हा नागपूरला पूर्ण झाला. या मोहिमेत या साहसी दुर्गप्रेमींचे अनेक ठिकाणी स्वागत व सत्कार झाले.नागपुरात सुखरूप पोहचल्यानंतर शिवराज्याभिषेक सोहळा समितीच्यावतीने महाल येथे विशाल व अभिषेक यांचा सत्कार करण्यात आला. विशाल म्हणाला, या मोहिमेदरम्यान अनेक अनुभव घेता आले. विविध गावात आणि पाड्यावर रात्रीचा मुक्काम केला. पर्यटनामुळे स्थानिकांना रोजगार मिळतो पण पर्यटकांमुळे या ऐतिहासिक गडकोटांचे नुकसानही होत असल्याची खंत त्याने अधोरेखित केली. महाराष्ट्रातील विविध भागात राहणाºया लोकांचे जीवन या मोहिमेतून अनुभवता आल्याचे मनोगत त्याने व्यक्त केले.

टॅग्स :Fortगडnagpurनागपूर