शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
2
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
3
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
4
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
5
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
6
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
7
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
8
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
9
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
10
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
11
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
12
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
13
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
14
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय
15
अ‍ॅमेझॉनवर १६ जूनला अवघ्या १६ रुपयांना स्मार्टवॉच वाटली जाणार; कुपन कोड अन् वेळ लक्षात ठेवा...
16
"जर इस्त्रायलची साथ दिली तर..."; संतापलेल्या इराणचा पाश्चात्य देशांना मोठा इशारा
17
ऐन पेरणीत शेतकरी कुटुंबांवर संकट! वीज कोसळून दोन सख्ख्या भावांसह चार शेतकऱ्यांचा मृत्यू
18
अहमदाबाद प्लेन क्रॅशसंदर्भात बाबा रामदेव यांना वेगळाच संशय, स्पष्टच बोलले! केली मोठी मागणी
19
Maharashtra Rain Alert: कोकणाला रेड अलर्ट! मुंबई-ठाण्यासह 'या' जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा
20
Tarot Card: कष्ट करावे लागतील, तडकाफडकी कोणतेही निर्णय घेऊ नका; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!

नागपुरी संत्र्याची विदेशवारी अडचणीत; कतार एअरवेजचा कार्गो घेण्यास नकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2023 08:00 IST

Nagpur News संत्र्यासाठी नागपूर जगभरात प्रसिद्ध असले तरी निर्यातदारांना विमानाद्वारे विदेशात संत्री पाठविण्यात अडचणी येत आहेत. नागपुरातील सुविधांचा अभाव यासाठी कारणीभूत आहे.

वसीम कुरैशी

नागपूर : संत्र्यासाठी नागपूर जगभरात प्रसिद्ध असले तरी निर्यातदारांना विमानाद्वारे विदेशात संत्री पाठविण्यात अडचणी येत आहेत. नागपुरातील सुविधांचा अभाव यासाठी कारणीभूत आहे. पाच गावे विस्थापित करून साकारण्यात आलेल्या मिहान प्रकल्पात अद्याप कार्गो फ्लाईट सुरू झालेली नाही. एवढेच नव्हे, तर शेड्यूल्ड विदेशी उड्डाणांपैकी कतर एअरवेज कार्गो नेण्यास मनाई करीत आहे. त्यामुळे नागपुरी संत्रा विमानाद्वारे परदेशी बाजारपेठेत पोहोचविणे कठीण झाले आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर नुकतेच कंत्राट मिळालेली कार्गो हॅण्डलिंग कंपनी राहुल रोडवेजच्या कागदपत्रांमध्ये काही त्रुटी आढळल्यामुळे कतर एअरवेजने त्यांच्यासोबत सध्या करार केलेला नाही. फक्त एअर अरेबियज्द्वारे भिवापुरी मिरचीसह काही कृषी उत्पादने शारजाह येथे पाठविली जातात. हा मालदेखील नागपुरातून कोणताही एक्सपोर्टर बुक करीत नाही, तर थेट मुंबईतून बुक केला जात आहे.

संत्रा निर्यातीसाठी येथे योग्य पॅकिंगची व्यवस्था व प्रोसेसिंग युनिट असावे. ही लवकर खराब होणारी वस्तू असल्यामुळे ती विमानाद्वारे थेट पोहोचविणे आवश्यक आहे. यात विलंब झाला, तर नुकसान होऊ शकते. संत्रा लवकर खराब होऊ नये म्हणून शेतकऱ्यांनाही आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा लागेल.

- आनंद डोंगरे, अध्यक्ष, नागपूर फ्रूट डीलर्स असोसिएशन, कळमना

एअर कार्गो आवश्यक

- मिहान-सेझ मधून निर्यात वाढविण्यासाठी एअर कार्गो आवश्यक आहे. एअरपोर्टपासून मिहानला जोडणाऱ्या टॅक्सी-वे ला ऑपरेशन एरियामध्ये समाविष्ट करावे लागेल. विमानांना ट्रकद्वारे न ओढता त्यांची पाॅवर टॅक्सिंग व्हायला हवी. मिहान-सेझपर्यंत थेट कार्गो फ्लाइट पोहोचली तर निर्यात वाढेल.

- मनोहर भोजवानी, अध्यक्ष, मिहान इंडस्ट्रीज असाेसिएशन

 

कतर एअरवेजची कार्गो हॅण्डलिंग कंपनीबत चर्चा सुरू आहे. लवकरच दोघांमध्ये करार होईल.आखाती देशात जातोय हापूस- एअर इंडिया एक्स्प्रेस मुंबई-शारजाह फ्लाइटने दररोज ३ ते ४ टन कार्गो नेला जात आहे. या कार्गो शिपमेंटमध्ये नाशिक व बारामतीहून आलेल्या भाज्या, फळे असतात. याशिवाय रत्नागिरीहून आणलेल्या हापुस आंब्यांची निर्यात केली जात आहे.

- आबिद रूही, वरिष्ठ विमानतळ संचालक

टॅग्स :businessव्यवसाय