शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
3
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
4
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
5
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
6
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
7
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
8
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
9
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
10
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
11
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
12
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
13
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
14
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
15
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
16
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
17
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
18
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
19
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
20
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...

नागपूर जि.प. काढणार आशा स्वयंसेविकांचा विमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2018 10:24 IST

गावोगावी घरोघरी फिरणाऱ्या आशा स्वयंसेविकेवर येणाऱ्या आपत्कालीन परिस्थितीवर मात करण्यासाठी जिल्हा परिषदेने त्यांचा वैयक्तिक विमा काढण्याचा निर्णय घेतला आहे.

ठळक मुद्दे१६०० आशा स्वयंसेविका

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ग्रामीण भागातील आरोग्य सेवेचा कणा असलेल्या आशा स्वयंसेविका सुविधेच्या बाबतीत उपेक्षित आहे. ग्रामीण भागातील महिला व बालकांच्या आरोग्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे. गावोगावी घरोघरी फिरणाऱ्या आशा स्वयंसेविके वर येणाऱ्या आपत्कालीन परिस्थितीवर मात करण्यासाठी जिल्हा परिषदेने त्यांचा वैयक्तिक विमा काढण्याचा निर्णय घेतला आहे.जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात जवळपास १६०० आशा स्वयंसेविका आहे. आशा स्वयंसेविकेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील जनतेला शासनामार्फत देण्यात येणाऱ्या सर्व प्रकारच्या आरोग्यविषयक सेवा पोहचविण्याचे काम करतात. खेड्यापाड्यात घरोघरी जाऊन महिला, बालकांना आरोग्य केंद्राशी जोडतात. गरोदर माता व बालकांच्या बाबतीत विशेष काळजी घेतात. शासनातर्फे आरोग्यविषयक राबविण्यात येणाऱ्या योजना घरोघरी त्यांच्यामार्फत पोहचतात. कधी महामंडळाच्या बसने, कधी पायी त्या काम करतात. दुर्गम, आदिवासी भागातील आरोग्य खऱ्या अर्थाने त्यांच्यामुळे टिकवून आहे. कुपोषणाच्या समस्येवर आशास्वयंसेविकेचे काम महत्त्वपूर्ण आहे. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने आशा स्वयंसेविकेच्या कार्याची दखल घेत, गेल्यावर्षी त्यांचा अपघात विमा काढला होता. जिल्हा परिषदेने राबविलेल्या योजनेच्या धर्तीवर केंद्र सरकारने संपूर्ण देशभरात ही योजना लागू केली. यावर्षी जिल्हा परिषदेने अपघाताबरोबरच नैसर्गिक मृत्यू झाल्यासही विम्याचा लाभ मिळवून देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी प्रत्येक आशा स्वयंसेविकेचा ३३० रुपयांचा विमा काढण्यात येणार आहे. यासंदर्भातील निर्णय आरोग्य समितीच्या बैठकीत घेण्यात आला. विम्याच्या रक्कमेची तरतूद सेसफंडातून करण्यात येणार असल्याचे आरोग्य सभापती शरद डोणेकर यांनी सांगितले.

टॅग्स :Governmentसरकार