शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

हिरवळीत नागपूर माघारले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:08 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : नागपूर शहराचा एके काळी हिरवळीच्या बाबतीत देशातील टॉप १० शहरात समावेश होता, परंतु मागील ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : नागपूर शहराचा एके काळी हिरवळीच्या बाबतीत देशातील टॉप १० शहरात समावेश होता, परंतु मागील काही वर्षांत शहरातील परिस्थिती बदलली आहे. राज्य सरकारच्या ‘माझी वसुंधरा’ अभियानात नागपूर २८व्या क्रमांकावर घसरले आहे. गेल्या काही वर्षांत शहरात वृक्षतोड मोठ्या प्रमाणात झाली आहे. यामुळे १,५०० गुणापैकी फक्त १३० गुण मिळाले आहे.

अभियानात ३९५ शहरी स्थानिक स्वराज्य संस्था, ३०४ पंचायत समित्यांनी सहभाग घेतला. ऑक्टोबरमध्ये या अभियानाला सुरुवात झाली. ५ जूनला याचा निकाल जाहीर करण्यात आला. यात १,१२७ गुणासह ठाणे पहिल्या क्रमांकावर आहे. नवीन मुंबईला ९७६ तर ग्रेटर मुंबईला ९५० गुण मिळाले. पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी या अभियानाची घोषणा केली होती. पर्यावरण संवर्धनाला प्रोत्साहन मिळावे व उपाययोजना कराव्यात, यासाठी हा पुरस्कार देण्यात आला. पाणीबचतीसाठी ४०० गुण, पृथ्वीसाठी ६००, हवा १००, ऊर्जा १०० तर संवर्धन यासाठी ३०० गुण गृहीत धरण्यात आले होते. वृक्षारोपण, घनकचरा व्यवस्थापन, सार्वजनिक वाहतूक, रेन वॉटर हार्वेस्टिंग या घटकांचाही विचार करण्यात आला. त्यानुसार, राज्यातर्फे एकूण गुण घोषित करण्यात आले. वर्गवारीनुसार किती गुण मिळाले. याची माहिती मिळाली नाही. मनपा यात का माघारली, अशी विचारणा वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे केली असता, क्रमांकात सुधारणा करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात येईल, असे सांगण्यात आले.