शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Alert: मुंबईत रेड अलर्ट; तीन ते चार तासात 'अतिमुसळधार' कोसळणार, शाळांना सुट्टी जाहीर
2
मुंबईत शाळांना सुट्टी जाहीर, पाणी साचल्याने अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प; ४८ तासांसाठी रेड अलर्ट जारी
3
आभाळ फाटले! मुखेड तालुक्यातील सहा गावांत पाणी शिरले; बेपत्ता १२ जणांचा शोध सुरु
4
‘मत चोरी’चा वाद वाढला, विरोधक मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात महाभियोग प्रस्ताव आणण्याच्या तयारीत 
5
२ लाख रुपयांवर मिळेल ३०,९०८ रुपये निश्चित व्याज! सरकारी बँक 'या' ग्राहकांना देतेय सर्वाधिक परतावा
6
श्रावणातला शेवटचा आठवडा; 'या' दिशेला लावा बेलाचे झाड, घरात धन, समृद्धी, पैसा येईल अपार
7
"सिनेमाच्या नावाखाली अभिनेते मजा..." कमी वयाच्या अभिनेत्रींसोबत काम करण्यावर आर माधवनचं भाष्य
8
सतर्क राहा: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात १८-१९ ऑगस्टला मुसळधार पाऊस; कुठे-कुठे 'रेड अलर्ट'?
9
अहिल्यानगरमध्ये फर्निचरच्या दुकानात अग्नितांडव; अख्खं कुटुंब संपलं, दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा मृत्यू
10
भाडे देऊन लाखोंचे नुकसान की EMI देऊन घर खरेदी करावे? ५० लाखांच्या घराचं आर्थिक गणित समजून घ्या
11
फ्लॉप शोचा सिलसिला संपेना! अन् म्हणे; सलमानचा पाक संघ आशिया कपमध्ये टीम इंडियासमोर हिट ठरेल
12
Apple नं ट्रम्प आणि चीनला दाखवला ठेंगा; भारतात आणखी एका प्रकल्पातून सुरू केलं iPhone चं उत्पादन
13
Home Remedy: महागडी हेअर ट्रीटमेंट सोडा, ५० रुपयांत लांबसडक, घनदाट, काळेभोर केस मिळवा 
14
जन्माष्टमीच्या मिरवणुकीतील रथ विजेच्या तारांना चिकटला, शॉक लागून ५ जणांचा मृत्यू, केंद्रीय मंत्र्यांचा सुरक्षा रक्षकही जखमी 
15
'सिटी ऑफ ड्रीम्स'नंतर प्रिया बापटचा पुन्हा 'तो' सीन, अभिनेत्री सुरवीन चावलासोबत लिपलॉक
16
दरमहा १२,५०० रुपये गुंतवा आणि ४० लाख रुपये मिळवा! पोस्ट ऑफिसची ही योजना देते करमुक्त परतावा
17
शेतकऱ्यांवर चिनी संकट! महत्त्वाच्या खनिजांवरील निर्यात कमी, रोखला खतांचाही पुरवठा
18
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
19
'महाभारत'ची कुंती 'बिग बॉस'मध्ये येणार! 'हत्यारे की बहन' म्हणून बोलवायचे लोक, कोण आहे ती?
20
दुचाकीला धडक देऊन ट्रक ड्रायव्हर पळाला, पण AIने केली कमाल, पोलिसांनी ३६ तासांत पकडला

हिरवळीत नागपूर माघारले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:08 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : नागपूर शहराचा एके काळी हिरवळीच्या बाबतीत देशातील टॉप १० शहरात समावेश होता, परंतु मागील ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : नागपूर शहराचा एके काळी हिरवळीच्या बाबतीत देशातील टॉप १० शहरात समावेश होता, परंतु मागील काही वर्षांत शहरातील परिस्थिती बदलली आहे. राज्य सरकारच्या ‘माझी वसुंधरा’ अभियानात नागपूर २८व्या क्रमांकावर घसरले आहे. गेल्या काही वर्षांत शहरात वृक्षतोड मोठ्या प्रमाणात झाली आहे. यामुळे १,५०० गुणापैकी फक्त १३० गुण मिळाले आहे.

अभियानात ३९५ शहरी स्थानिक स्वराज्य संस्था, ३०४ पंचायत समित्यांनी सहभाग घेतला. ऑक्टोबरमध्ये या अभियानाला सुरुवात झाली. ५ जूनला याचा निकाल जाहीर करण्यात आला. यात १,१२७ गुणासह ठाणे पहिल्या क्रमांकावर आहे. नवीन मुंबईला ९७६ तर ग्रेटर मुंबईला ९५० गुण मिळाले. पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी या अभियानाची घोषणा केली होती. पर्यावरण संवर्धनाला प्रोत्साहन मिळावे व उपाययोजना कराव्यात, यासाठी हा पुरस्कार देण्यात आला. पाणीबचतीसाठी ४०० गुण, पृथ्वीसाठी ६००, हवा १००, ऊर्जा १०० तर संवर्धन यासाठी ३०० गुण गृहीत धरण्यात आले होते. वृक्षारोपण, घनकचरा व्यवस्थापन, सार्वजनिक वाहतूक, रेन वॉटर हार्वेस्टिंग या घटकांचाही विचार करण्यात आला. त्यानुसार, राज्यातर्फे एकूण गुण घोषित करण्यात आले. वर्गवारीनुसार किती गुण मिळाले. याची माहिती मिळाली नाही. मनपा यात का माघारली, अशी विचारणा वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे केली असता, क्रमांकात सुधारणा करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात येईल, असे सांगण्यात आले.