शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
4
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
5
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
6
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
7
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
8
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
9
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
10
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
11
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
13
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
14
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
15
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
16
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
17
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
18
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
19
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
20
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स

नागपूर हिवाळी अधिवेशन ; २५२३ लक्षवेधी दाखल; ३५ मोर्चे व १८ धरणे मंडपांसाठी आले अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2017 11:30 IST

विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन ११ डिसेंबरपासून नागपुरात सुरू होत आहे. विधिमंडळ सचिवालयाने आपल्या कामकाजास सुरुवात केली आहे.

ठळक मुद्देअधिवेशन वादळी होण्याची चिन्हेअधिवेशनाच्या कालावधीवर २० डिसेंबरला निर्णय

आॅनलाईन लोकमतनागपूर : विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन ११ डिसेंबरपासून नागपुरात सुरू होत आहे. विधिमंडळ सचिवालयाने आपल्या कामकाजास सुरुवात केली आहे. राज्यभरातील आमदारांकडून येणाऱ्या लक्षवेधी, तारांकित प्रश्न, अर्धा तास चर्चेचे प्रस्ताव स्वीकारले जात आहे. आजवर विधानसभा व विधान परिषदेसाठी एकूण २५२३ लक्षवेधी दाखल झाल्या आहेत. आमदारांची सक्रियता पाहता अधिवेशन वादळी होण्याची चिन्हे आहेत.विधानसभेसाठी १७९० लक्षवेधी, ९६७५ तारांकित प्रश्न, १८६ अर्धा तास चर्चेचे प्रस्ताव व ४०१ अशासकीय प्रस्ताव स्वीकारण्यात आल्याची माहिती विधिमंडळ सचिवालयाचे सहसचिव अशोक मोहिते यांनी लोकमतशी बोलताना दिली. विधान परिषदेसाठी ७३३ लक्षवेधी, २९१६ तारांकित प्रश्न, १६३ अशासकीय प्रस्ताव प्राप्त झाले आहेत. यावर्षी हिवाळी अधिवेशनात तीन नवे विधेयक व १२ अध्यादेश सादर केले जातील. विधानसभेत प्रलंबित असलेले एक विधेयक व विधान परिषदेत प्रलंबित ५ विधेयक देखील सादर होतील.सूत्रांंच्या मते अधिवेशन वाढविण्याचा निर्णय झाला तरी फक्त एक दिवस वाढविले जाईल. २३ डिसेंबर रोजी अधिवेशनाचे सूप वाजेल. २४ डिसेंबर रविवार व २५ डिसेंबर रोजी ख्रिसमसची सुटी येत आहे. हिवाळी अधिवेशनासाठी तयारी जोरात सुरू आहे. देखभाल दुरुस्तीची कामे अंतिम टप्प्यात आहेत.विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनावर मोर्चे काढून, धरणे देऊन आपल्या मागण्या, प्रश्न सरकार दरबारी पोहचविण्यासाठी आंदोलक सज्ज झाले आहेत. आजवर राजकीय, सामाजिक व शैक्षणिक अशा ३५ संघटनांनी पोलिसांकडे मोर्चाची परवानगी मागितली आहे. पटवर्धन मैदानावर धरणे देण्यासाठी १८ संघटनांनी विशेष शाखेकडे अर्ज केले आहेत.साधारणत: अधिवेशनाला सुरुवात झाल्यानंतर चार-पाच दिवसांनी मोर्चांची संख्या वाढते. या काळात मोर्चासाठी अधिक परवानग्या मागितल्या जातात. गेल्या आठवड्यापर्यंत मेट्रो रेलच्या बांधकामामुळे पटवर्धन मैदानावर साहित्य पडलेले होते. मैदानावर खड्डे पडले होते. त्यामुळे यावेळी आंदोलकांना जागा कुठे मिळणार असा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र, प्रशासनाने वेळीच सतर्कता दाखवत मैदान रिकामे करण्याचे निर्देश मेट्रो रेल्वेला दिले. सोमवारी ४ डिसेंबर रोजी मेट्रोने मैदानाचा उत्तरेकडील भाग समतल केला. आता शनिवारपासून येथे आंदोलकांचे पेंडाल लागण्यास सुरुवात होईल. मेट्रो रेल्वेच्या बांधकामामुळे सीताबर्डी आनंद टॉकीज रस्ता मोर्चांसाठी बंद करण्यात आला आहे. यामुळे गणेशपेठकडून येणारे मोर्चे धंतोली पोलीस ठाण्यासमोरून यशवंत स्टेडियम व मुंजे चौक मार्गे मोर्चा पॉर्इंटपर्यंत पोोहचतील. मात्र, मॉरिस कॉलेज टी-पॉर्इंटवर प्री-आयएएस कोचिंग सेंटरच्या समोरील जागेवर मेट्रोचे बांधकाम सुरू असल्यामुळे जागा शिल्लक राहिलेली नाही. यामुळे आता पोलिसांना येथे तंबू लावण्यासाठीही जागा मिळणे कठीण झाले आहे. याची दखल घेत आता टेकडी लाईन मार्गाला लागून असलेल्या जमिनीवर तंबू उभारण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.शहर पोलीस विभागाने वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली स्वतंत्र अधिवेशन सेल तयार केला आहे. मोर्चे व धरणे आंदोलनाची परवानगी देण्यापासून ते बंदोबस्ताची व्यवस्था सांभाळण्यापर्यंतच्या कामासाठी वेगवेगळी चमू तयार करण्यात आली आहे.कालावधी वाढीवर २० रोजी निर्णयविधीमंडळाच्या अधिवेशनाचा कार्यकाळ ११ ते २२ डिसेंबरपर्यंत निश्चित करण्यात आला आहे. २० डिसेंबर रोजी कामगार सल्लागार समितीची बैठक होईल. तीत अधिवेशनाचा कालावधी आणखी वाढवायचा का यावर निर्णय घेतला जाईल.

टॅग्स :Governmentसरकार