शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये सीझफायर; पुतीन यांनी दिली मंजुरी, ३२ तासांसाठी...
2
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
3
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
4
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
5
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
6
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
7
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
8
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
9
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
10
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
11
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
12
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
13
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
14
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
15
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
16
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
17
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
18
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
19
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
20
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर होणार स्मार्ट अन् सुरक्षित

By admin | Updated: October 19, 2015 02:45 IST

स्मार्ट सिटीची संकल्पना राबविताना शहरातील सुंदर इमारती, गुळगुळीत रस्ते, पिण्याचे पाणी, आदी सुविधांसोबतच घनकचरा व्यवस्थापन, सांडपाण्याचा पुनर्वापर आदी

देवेंद्र फडणवीस : रिंगरोड काँक्रिटीकरणाचा शुभारंभ व जलकुंभाचे लोकार्पणनागपूर : स्मार्ट सिटीची संकल्पना राबविताना शहरातील सुंदर इमारती, गुळगुळीत रस्ते, पिण्याचे पाणी, आदी सुविधांसोबतच घनकचरा व्यवस्थापन, सांडपाण्याचा पुनर्वापर आदी संवर्धनाच्या उत्कृ ष्ट योजनांमुळे शहराला सुंदरपण येते. या सर्व सुविधा उपलब्ध करून शहराला देशातील सर्वोत्तम स्मार्ट व सुरक्षित शहर बनविणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी दिली. महापालिकेच्या भांडेवाडी येथील मलनिस्सारण केंद्रातील क्षमतावाढ प्रकल्पाचे भूमिपूजन, नालंदानगर व ओंकारनगर येथील जलकुंभाचे लोकार्पण तसेच रिंगरोड काँक्रिटीकरणाचा शुभारंभ फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला. यानिमित्त ओंकारनगर चौक येथे आयोजित मुख्य कार्यक्रमात ते बोलत होते. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महापौर प्रवीण दटके , खासदार कृ पाल तुमाने, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अपर मुख्य सचिव आनंद कुलकर्णी, उपमहापौर मुन्ना पोकुलवार, आमदार सुधाकर देशमुख, कृष्णा खोपडे, अनिल सोले, सुधाकर कोहळे, डॉ. मिलिंद माने, स्थायी समितीचे अध्यक्ष रमेश सिंगारे, महापालिकेतील सत्तापक्ष नेते दयाशंकर तिवारी, महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर, नासुप्रचे सभापती श्याम वर्धने, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव पी.जी.गणवीर, समिती सभापती संदीप जोशी, सुनील अग्रवाल आदी उपस्थित होते. मुख्यमंत्री म्हणाले, लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपच्या आमदारांनी रिंगरोडरील अपघात टाळण्यासाठी आंदोलन केले होेते. परंतु त्यानंतर साधी दुरुस्तीही झाली नव्हती. केंद्रात व राज्यात भाजपचे सरकार सत्तेत आल्यानंतर महाराष्ट्र, विदर्भ व नागपुरात मोठ्या प्रमाणात विकास कामे सुरू झाली. आता हा रिंगरोड सिमेंट कॉक्रिटचा होत आहे. मुख्यमंत्र्यांच्या गटाने स्वच्छ भारतासाठी शिफारशी केल्या आहेत. त्यात पिण्याच्या पाण्याचा उद्योगासाठी वापर न करता ५० किलोमीटर परिसरात सांडपाणी उपलब्ध असल्यास ते उद्योगांनी वापरायचे आहे. भांडेवाडी मलनिस्सारण केंद्राची क्षमता १०० दशलक्ष लिटर वरून २०० दशलक्ष लिटर करण्यात येणार आहे. महाराष्ट्रात मुंबई, पुण्यानंतर सांडपाण्यावर प्रक्रिया करणारे नागपूर शहर ठरणार आहे. शहरात ३०० कोटीचे सिमेंट रस्ते होत आहे. यामुळे शहरातील अंतर्गत रस्ते चांगले होतील. शहरालगतच्या भागात आरक्षणाचा प्रश्न आहे. या भागातील नागरिकांना मूलभूत सुविधा उपलब्ध करण्यासाठी रिझर्व्हेशन मुक्त करण्याचे अधिकार आयुक्तांना देण्यात आले आहे. निवासी भागात महापालिका व नासुप्रने सुविधा उपलब्ध करण्याचे निर्देश फडणवीस यांनी यावेळी दिले. सात हजार कोटीच्या प्रकल्पांना मंजुरीनागपूर शहराची स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. मलनिस्सारण केंद्र, शहरातील रिंगरोड सिमेंट क ाँक्रिटचा होत आहे. शहरातील उड्डाण पूल, शहराबाहेरील रिंगरोड अशा विविध सात हजार कोटींच्या प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली आहे. तसेच ८६०० कोटींचा मेट्रो रेल्वे प्रकल्प तीन वर्षात पूर्ण करण्याची ग्वाही नितीन गडकरी यांनी दिली. हिंगणा टी- पॉर्इंट -जयताळा-प्रतापनगर-छत्रपती चौक-मानेवाडा चौक- दिघोरी चौक-आॅटोमोटीव्ह चौक-कळमना-मानकापूरपर्यंत २५.२० कि .मी.चे कॉंिक्रटीकरण तसेच मानकापूर ते दाभा दरम्यानच्या ७.१० कि.मी.रस्त्याचे चौपदरीकरण व डांबरीकरण केले जाणार आहे. अंतर्गत रिंगरोडच्या क ाँक्रिटीकरणाच्या कामावर २९२ कोटी ७२ लाखांचा खर्च केला जाणार आहे. हे काम दोन वर्षात पूर्ण केले जाणार आहे. मार्गावरील चौकांची कामे करण्यात येतील. त्यामुळे शहराच्या सौंदर्यीकरणात भर पडण्यासोबतच लोकांची सुविधा होईल. शहराबाहेरील रिंगरोडसाठी १२७२ कोटीचा निधी मंजूर करण्यात आला आहे. रिंगरोडच्या कामासाठी नदीतील गाळ वापरण्याची सूचना त्यांनी केली.मुख्यमंत्र्यांनी नागपूरला स्मार्ट सिटी करण्याची घोषणा केली आहे. ४५०० कोटीचा आराखडा तयार केला आहे. स्मार्ट सिटीसाठी नागरिक ांनी सूचना पाठवाव्या. शहरातील विद्युत वाहिनी भूमिगत करण्यात येणार आहे. शहरात एलईडी पथदिवे लावण्यावर १२० कोटीचा केला जाणार आहे. रिंगरोडला जोडणाऱ्या रस्त्यावरील अपघात टाळण्यासाठी अंतर्गत रस्त्यांच्या कामासाठी ३५० कोटीची गरज असल्याचे चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.एलबीटी रद्द झाल्यामुळे महापालिकेची आर्थिक स्थिती बिकट आहे. गेल्या १५ वर्षात राज्यातील काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरकारने महापालिकेला निधी दिला नाही. राज्य सरकारने महापालिकेला आर्थिक मदत करावी अशी मागणी प्रवीण दटके यांनी केली. आनंद कुलकर्णी यांनी मान्यवरांचे स्वागत करून प्रास्ताविक केले. सुधाकर कोहळे यांनी सूत्र संचालनासोबतच विकास कामाची माहिती दिली. आभार रमेश सिंगारे यांनी मानले.यावेळी महापालिकेतील नासुप्रचे विश्वस्त भूषण सिंगणे, गटनेते गौतम पाटील, राजू नागुलवार, शिक्षण समितीचे सभापती गोपाल बोहरे, अविनाश ठाकरे,सुधीर राऊ त, झोन सभापती, नगरसेवक व भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्यने उपस्थित होते.(प्रतिनिधी)