शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
2
ट्रम्प यांनी दंड थोपटले! अमेरिकेच्या तीन युद्ध नौका व्हेनेझुएलाच्या दिशेने रवाना; ४००० सैन्यही सज्ज
3
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
4
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
5
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
6
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
7
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
8
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
9
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!
10
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
11
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
12
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
13
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?
14
ऑनलाइन गेमिंगवर बंदी येण्यापूर्वी झुनझुनवालांची 'या' कंपनीतून एक्झिट; निखिल कामत, मधुसूदन केला यांना अजूनही विश्वास?
15
वाहतूक नियम मोडल्याचे चलन येताच फाईन भरा, ७५ टक्क्यांपर्यंत सूट मिळणार; महाराष्ट्रात विचार सुरु...
16
"पावसाळी अधिवेशनात लोकसभेत केवळ ३७ तास चर्चा, संसदेचा खर्च खासदारांकडून वसूल करा’’, नाराज खासदाराने केली मागणी
17
"बाळासाहेब थोरातांच्या केसालाही धक्का लावण्याची गोडसेच्या औलादीमध्ये धमक नाही", हर्षवर्धन सपकाळ यांनी ठणकावले
18
घरात काय चाललंय ते कळेना! पाक दिग्गज टीम इंडियात डोकावत श्रेयस अय्यरवर बोलला, म्हणे...
19
'का ग कुठे गेली होती?', सुनेत्रा पवारांबद्दलचा प्रश्न ऐकून अजित पवारांनी पत्रकार परिषदेतच जोडले हात
20
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा

नागपूर होणार स्मार्ट अन् सुरक्षित

By admin | Updated: October 19, 2015 02:45 IST

स्मार्ट सिटीची संकल्पना राबविताना शहरातील सुंदर इमारती, गुळगुळीत रस्ते, पिण्याचे पाणी, आदी सुविधांसोबतच घनकचरा व्यवस्थापन, सांडपाण्याचा पुनर्वापर आदी

देवेंद्र फडणवीस : रिंगरोड काँक्रिटीकरणाचा शुभारंभ व जलकुंभाचे लोकार्पणनागपूर : स्मार्ट सिटीची संकल्पना राबविताना शहरातील सुंदर इमारती, गुळगुळीत रस्ते, पिण्याचे पाणी, आदी सुविधांसोबतच घनकचरा व्यवस्थापन, सांडपाण्याचा पुनर्वापर आदी संवर्धनाच्या उत्कृ ष्ट योजनांमुळे शहराला सुंदरपण येते. या सर्व सुविधा उपलब्ध करून शहराला देशातील सर्वोत्तम स्मार्ट व सुरक्षित शहर बनविणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी दिली. महापालिकेच्या भांडेवाडी येथील मलनिस्सारण केंद्रातील क्षमतावाढ प्रकल्पाचे भूमिपूजन, नालंदानगर व ओंकारनगर येथील जलकुंभाचे लोकार्पण तसेच रिंगरोड काँक्रिटीकरणाचा शुभारंभ फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला. यानिमित्त ओंकारनगर चौक येथे आयोजित मुख्य कार्यक्रमात ते बोलत होते. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महापौर प्रवीण दटके , खासदार कृ पाल तुमाने, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अपर मुख्य सचिव आनंद कुलकर्णी, उपमहापौर मुन्ना पोकुलवार, आमदार सुधाकर देशमुख, कृष्णा खोपडे, अनिल सोले, सुधाकर कोहळे, डॉ. मिलिंद माने, स्थायी समितीचे अध्यक्ष रमेश सिंगारे, महापालिकेतील सत्तापक्ष नेते दयाशंकर तिवारी, महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर, नासुप्रचे सभापती श्याम वर्धने, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव पी.जी.गणवीर, समिती सभापती संदीप जोशी, सुनील अग्रवाल आदी उपस्थित होते. मुख्यमंत्री म्हणाले, लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपच्या आमदारांनी रिंगरोडरील अपघात टाळण्यासाठी आंदोलन केले होेते. परंतु त्यानंतर साधी दुरुस्तीही झाली नव्हती. केंद्रात व राज्यात भाजपचे सरकार सत्तेत आल्यानंतर महाराष्ट्र, विदर्भ व नागपुरात मोठ्या प्रमाणात विकास कामे सुरू झाली. आता हा रिंगरोड सिमेंट कॉक्रिटचा होत आहे. मुख्यमंत्र्यांच्या गटाने स्वच्छ भारतासाठी शिफारशी केल्या आहेत. त्यात पिण्याच्या पाण्याचा उद्योगासाठी वापर न करता ५० किलोमीटर परिसरात सांडपाणी उपलब्ध असल्यास ते उद्योगांनी वापरायचे आहे. भांडेवाडी मलनिस्सारण केंद्राची क्षमता १०० दशलक्ष लिटर वरून २०० दशलक्ष लिटर करण्यात येणार आहे. महाराष्ट्रात मुंबई, पुण्यानंतर सांडपाण्यावर प्रक्रिया करणारे नागपूर शहर ठरणार आहे. शहरात ३०० कोटीचे सिमेंट रस्ते होत आहे. यामुळे शहरातील अंतर्गत रस्ते चांगले होतील. शहरालगतच्या भागात आरक्षणाचा प्रश्न आहे. या भागातील नागरिकांना मूलभूत सुविधा उपलब्ध करण्यासाठी रिझर्व्हेशन मुक्त करण्याचे अधिकार आयुक्तांना देण्यात आले आहे. निवासी भागात महापालिका व नासुप्रने सुविधा उपलब्ध करण्याचे निर्देश फडणवीस यांनी यावेळी दिले. सात हजार कोटीच्या प्रकल्पांना मंजुरीनागपूर शहराची स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. मलनिस्सारण केंद्र, शहरातील रिंगरोड सिमेंट क ाँक्रिटचा होत आहे. शहरातील उड्डाण पूल, शहराबाहेरील रिंगरोड अशा विविध सात हजार कोटींच्या प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली आहे. तसेच ८६०० कोटींचा मेट्रो रेल्वे प्रकल्प तीन वर्षात पूर्ण करण्याची ग्वाही नितीन गडकरी यांनी दिली. हिंगणा टी- पॉर्इंट -जयताळा-प्रतापनगर-छत्रपती चौक-मानेवाडा चौक- दिघोरी चौक-आॅटोमोटीव्ह चौक-कळमना-मानकापूरपर्यंत २५.२० कि .मी.चे कॉंिक्रटीकरण तसेच मानकापूर ते दाभा दरम्यानच्या ७.१० कि.मी.रस्त्याचे चौपदरीकरण व डांबरीकरण केले जाणार आहे. अंतर्गत रिंगरोडच्या क ाँक्रिटीकरणाच्या कामावर २९२ कोटी ७२ लाखांचा खर्च केला जाणार आहे. हे काम दोन वर्षात पूर्ण केले जाणार आहे. मार्गावरील चौकांची कामे करण्यात येतील. त्यामुळे शहराच्या सौंदर्यीकरणात भर पडण्यासोबतच लोकांची सुविधा होईल. शहराबाहेरील रिंगरोडसाठी १२७२ कोटीचा निधी मंजूर करण्यात आला आहे. रिंगरोडच्या कामासाठी नदीतील गाळ वापरण्याची सूचना त्यांनी केली.मुख्यमंत्र्यांनी नागपूरला स्मार्ट सिटी करण्याची घोषणा केली आहे. ४५०० कोटीचा आराखडा तयार केला आहे. स्मार्ट सिटीसाठी नागरिक ांनी सूचना पाठवाव्या. शहरातील विद्युत वाहिनी भूमिगत करण्यात येणार आहे. शहरात एलईडी पथदिवे लावण्यावर १२० कोटीचा केला जाणार आहे. रिंगरोडला जोडणाऱ्या रस्त्यावरील अपघात टाळण्यासाठी अंतर्गत रस्त्यांच्या कामासाठी ३५० कोटीची गरज असल्याचे चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.एलबीटी रद्द झाल्यामुळे महापालिकेची आर्थिक स्थिती बिकट आहे. गेल्या १५ वर्षात राज्यातील काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरकारने महापालिकेला निधी दिला नाही. राज्य सरकारने महापालिकेला आर्थिक मदत करावी अशी मागणी प्रवीण दटके यांनी केली. आनंद कुलकर्णी यांनी मान्यवरांचे स्वागत करून प्रास्ताविक केले. सुधाकर कोहळे यांनी सूत्र संचालनासोबतच विकास कामाची माहिती दिली. आभार रमेश सिंगारे यांनी मानले.यावेळी महापालिकेतील नासुप्रचे विश्वस्त भूषण सिंगणे, गटनेते गौतम पाटील, राजू नागुलवार, शिक्षण समितीचे सभापती गोपाल बोहरे, अविनाश ठाकरे,सुधीर राऊ त, झोन सभापती, नगरसेवक व भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्यने उपस्थित होते.(प्रतिनिधी)