शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis on Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava : राज ठाकरेंचे आभार, बाळासाहेबांचे आशीर्वाद आज मलाच मिळत असतील- देवेंद्र फडणवीस
2
PNB घोटाळ्यातील फरार आरोपी नीरव मोदीचा भाऊ नेहल मोदी अटकेत, अमेरिकेत आवळळ्या मुसक्या   
3
Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava Marathi : "अडवाणी ख्रिश्चन मिशनरी स्कूलमध्ये शिकले, त्यांच्या हिंदुत्वावर शंका घेऊ का?"; राज ठाकरेंनी यादीच वाचली...
4
धक्कादायक! दुधात थुंकायचा आणि तेच लोकांना द्यायचा; किळसवाणा प्रकार CCTV मध्ये कैद
5
इंग्लंडनं २४ चेंडूत गमावल्या ९ विकेट्स! टीम इंडियानं अखेरच्या षटकात हातात आलेली मॅच घालवली
6
Post Office ची जबरदस्त स्कीम, केवळ व्याजातूनच होईल ₹८२,००० ची कमाई; एकरकमी गुंतवणूक करावी लागणार
7
"हिंदुत्व ही कोणत्याही भाषेची मक्तेदारी नाही, आम्ही मराठी बोलणारे तुमच्यापेक्षा…’’, उद्धव ठाकरेंनी भाजपाला सुनावले
8
Ashadhi Ekadashi 2025: आषाढीला करा तुळशीचे 'हे' उपाय आणि पूजन, ते ठरेल इच्छापूर्तीचे साधन!
9
राज ठाकरेंचं कौतुक, उद्धव ठाकरेंवर टीका, विजय सभेवर शिंदे गटाची प्रतिक्रिया, केलं असं भाकित
10
Raj Thackeray Udddhav Thackeray Family Photo : संपूर्ण ठाकरे कुटुंब एकाच व्यासपीठावर एकत्र... खास पोज देत काढला 'फॅमिली फोटो'
11
Viral Video : धबधब्यावर करत होते धमाल, अवघ्या ५ सेकंदात निसर्गानं दाखवली कमाल! व्हिडीओ व्हायरल
12
रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; एकाचा मृत्यू, २६ जण जखमी
13
"मुंबईत सत्तेत असताना मराठी माणसाला हद्दपार केलं आणि आता सत्ता मिळवण्यासाठी पुन्हा..."
14
भारताच्या शत्रूसोबत अजरबैजानची १७ हजार कोटींची डील, काय आहे त्यांचा प्लान?
15
"आमच्यासारख्या गावठीवर त्याने...", अखेर शरद उपाध्ये-निलेश साबळे वादावर CHYDचा कलाकार बोलला, काय म्हणाला?
16
राज ठाकरेंजवळ आदित्य, उद्धव ठाकरेंजवळ अमित, सुप्रिया सुळेंनी एकत्र आणलं; पाहा Video
17
Ashadhi Ekadashi 2025: एकादशी व्रताचे पालन म्हणजे थेट विष्णुकृपा; आषाढीपासून होते सुरुवात!
18
Uddhav Thackeray pats Raj Thackeray Video : कौतुकाची थाप..!! राज ठाकरे यांच्या भाषणानंतर उद्धव ठाकरे यांच्या कृतीने मराठी माणूस सुखावला...
19
"निवडणुकीत हरणार म्हणून कुटुंब "तहात" जिंकण्याचा प्रयत्न"; भाजपाचा पलटवार
20
"३० वर्ष झाली तरी मराठी माणसासारखी..."; सुशील केडियांनी राज ठाकरेंची जाहीर माफी मागितली

नागपूर होणार स्मार्ट अन् सुरक्षित

By admin | Updated: October 19, 2015 02:45 IST

स्मार्ट सिटीची संकल्पना राबविताना शहरातील सुंदर इमारती, गुळगुळीत रस्ते, पिण्याचे पाणी, आदी सुविधांसोबतच घनकचरा व्यवस्थापन, सांडपाण्याचा पुनर्वापर आदी

देवेंद्र फडणवीस : रिंगरोड काँक्रिटीकरणाचा शुभारंभ व जलकुंभाचे लोकार्पणनागपूर : स्मार्ट सिटीची संकल्पना राबविताना शहरातील सुंदर इमारती, गुळगुळीत रस्ते, पिण्याचे पाणी, आदी सुविधांसोबतच घनकचरा व्यवस्थापन, सांडपाण्याचा पुनर्वापर आदी संवर्धनाच्या उत्कृ ष्ट योजनांमुळे शहराला सुंदरपण येते. या सर्व सुविधा उपलब्ध करून शहराला देशातील सर्वोत्तम स्मार्ट व सुरक्षित शहर बनविणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी दिली. महापालिकेच्या भांडेवाडी येथील मलनिस्सारण केंद्रातील क्षमतावाढ प्रकल्पाचे भूमिपूजन, नालंदानगर व ओंकारनगर येथील जलकुंभाचे लोकार्पण तसेच रिंगरोड काँक्रिटीकरणाचा शुभारंभ फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला. यानिमित्त ओंकारनगर चौक येथे आयोजित मुख्य कार्यक्रमात ते बोलत होते. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महापौर प्रवीण दटके , खासदार कृ पाल तुमाने, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अपर मुख्य सचिव आनंद कुलकर्णी, उपमहापौर मुन्ना पोकुलवार, आमदार सुधाकर देशमुख, कृष्णा खोपडे, अनिल सोले, सुधाकर कोहळे, डॉ. मिलिंद माने, स्थायी समितीचे अध्यक्ष रमेश सिंगारे, महापालिकेतील सत्तापक्ष नेते दयाशंकर तिवारी, महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर, नासुप्रचे सभापती श्याम वर्धने, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव पी.जी.गणवीर, समिती सभापती संदीप जोशी, सुनील अग्रवाल आदी उपस्थित होते. मुख्यमंत्री म्हणाले, लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपच्या आमदारांनी रिंगरोडरील अपघात टाळण्यासाठी आंदोलन केले होेते. परंतु त्यानंतर साधी दुरुस्तीही झाली नव्हती. केंद्रात व राज्यात भाजपचे सरकार सत्तेत आल्यानंतर महाराष्ट्र, विदर्भ व नागपुरात मोठ्या प्रमाणात विकास कामे सुरू झाली. आता हा रिंगरोड सिमेंट कॉक्रिटचा होत आहे. मुख्यमंत्र्यांच्या गटाने स्वच्छ भारतासाठी शिफारशी केल्या आहेत. त्यात पिण्याच्या पाण्याचा उद्योगासाठी वापर न करता ५० किलोमीटर परिसरात सांडपाणी उपलब्ध असल्यास ते उद्योगांनी वापरायचे आहे. भांडेवाडी मलनिस्सारण केंद्राची क्षमता १०० दशलक्ष लिटर वरून २०० दशलक्ष लिटर करण्यात येणार आहे. महाराष्ट्रात मुंबई, पुण्यानंतर सांडपाण्यावर प्रक्रिया करणारे नागपूर शहर ठरणार आहे. शहरात ३०० कोटीचे सिमेंट रस्ते होत आहे. यामुळे शहरातील अंतर्गत रस्ते चांगले होतील. शहरालगतच्या भागात आरक्षणाचा प्रश्न आहे. या भागातील नागरिकांना मूलभूत सुविधा उपलब्ध करण्यासाठी रिझर्व्हेशन मुक्त करण्याचे अधिकार आयुक्तांना देण्यात आले आहे. निवासी भागात महापालिका व नासुप्रने सुविधा उपलब्ध करण्याचे निर्देश फडणवीस यांनी यावेळी दिले. सात हजार कोटीच्या प्रकल्पांना मंजुरीनागपूर शहराची स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. मलनिस्सारण केंद्र, शहरातील रिंगरोड सिमेंट क ाँक्रिटचा होत आहे. शहरातील उड्डाण पूल, शहराबाहेरील रिंगरोड अशा विविध सात हजार कोटींच्या प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली आहे. तसेच ८६०० कोटींचा मेट्रो रेल्वे प्रकल्प तीन वर्षात पूर्ण करण्याची ग्वाही नितीन गडकरी यांनी दिली. हिंगणा टी- पॉर्इंट -जयताळा-प्रतापनगर-छत्रपती चौक-मानेवाडा चौक- दिघोरी चौक-आॅटोमोटीव्ह चौक-कळमना-मानकापूरपर्यंत २५.२० कि .मी.चे कॉंिक्रटीकरण तसेच मानकापूर ते दाभा दरम्यानच्या ७.१० कि.मी.रस्त्याचे चौपदरीकरण व डांबरीकरण केले जाणार आहे. अंतर्गत रिंगरोडच्या क ाँक्रिटीकरणाच्या कामावर २९२ कोटी ७२ लाखांचा खर्च केला जाणार आहे. हे काम दोन वर्षात पूर्ण केले जाणार आहे. मार्गावरील चौकांची कामे करण्यात येतील. त्यामुळे शहराच्या सौंदर्यीकरणात भर पडण्यासोबतच लोकांची सुविधा होईल. शहराबाहेरील रिंगरोडसाठी १२७२ कोटीचा निधी मंजूर करण्यात आला आहे. रिंगरोडच्या कामासाठी नदीतील गाळ वापरण्याची सूचना त्यांनी केली.मुख्यमंत्र्यांनी नागपूरला स्मार्ट सिटी करण्याची घोषणा केली आहे. ४५०० कोटीचा आराखडा तयार केला आहे. स्मार्ट सिटीसाठी नागरिक ांनी सूचना पाठवाव्या. शहरातील विद्युत वाहिनी भूमिगत करण्यात येणार आहे. शहरात एलईडी पथदिवे लावण्यावर १२० कोटीचा केला जाणार आहे. रिंगरोडला जोडणाऱ्या रस्त्यावरील अपघात टाळण्यासाठी अंतर्गत रस्त्यांच्या कामासाठी ३५० कोटीची गरज असल्याचे चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.एलबीटी रद्द झाल्यामुळे महापालिकेची आर्थिक स्थिती बिकट आहे. गेल्या १५ वर्षात राज्यातील काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरकारने महापालिकेला निधी दिला नाही. राज्य सरकारने महापालिकेला आर्थिक मदत करावी अशी मागणी प्रवीण दटके यांनी केली. आनंद कुलकर्णी यांनी मान्यवरांचे स्वागत करून प्रास्ताविक केले. सुधाकर कोहळे यांनी सूत्र संचालनासोबतच विकास कामाची माहिती दिली. आभार रमेश सिंगारे यांनी मानले.यावेळी महापालिकेतील नासुप्रचे विश्वस्त भूषण सिंगणे, गटनेते गौतम पाटील, राजू नागुलवार, शिक्षण समितीचे सभापती गोपाल बोहरे, अविनाश ठाकरे,सुधीर राऊ त, झोन सभापती, नगरसेवक व भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्यने उपस्थित होते.(प्रतिनिधी)