शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
3
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
4
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
5
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
6
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
7
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
8
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
9
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
10
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
11
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
12
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
13
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
14
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
15
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
16
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
17
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
18
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
19
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
20
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार

नागपूर, वर्धा, बुलडाणा जिल्हा बँका सरकार ताब्यात घेणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2018 10:30 IST

पूर्वी आर्थिक डबघाईस आलेल्या महाराष्ट्रातील नागपूर, वर्धा आणि बुलडाणा जिल्हा सहकारी बँका शासन ताब्यात घेण्याच्या तयारीत आहे. शासनाने प्रक्रिया सुरू केली असून, तिन्ही बँका महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत विलीन होणार असल्याची माहिती आहे.

ठळक मुद्दे शेतकऱ्यांना कर्जवाटप नाही

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पूर्वी आर्थिक डबघाईस आलेल्या महाराष्ट्रातील नागपूर, वर्धा आणि बुलडाणा जिल्हा सहकारी बँका शासन ताब्यात घेण्याच्या तयारीत आहे. शासनाने प्रक्रिया सुरू केली असून, तिन्ही बँका महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत विलीन होणार असल्याची माहिती आहे. शेतकऱ्यांना कर्ज न दिल्यामुळे सरकार कारवाई करीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.शेतकऱ्यांना कर्जवाटप करण्यासाठी राज्यात जिल्हा बँकांची स्थापना करण्यात आली. पण मूळ उद्देश लयास जाऊन बँकेने सामान्यांना कर्ज न देता आमदार आणि कोट्यधिशांना कर्जवाटप केले. बुलडाणा आणि वर्धा जिल्हा बँकेने राजकारण्यांना कर्जवाटप केले. नागपूर जिल्हा बँकेत आमदार सुनील केदार यांचा १५२ कोटी रुपयांचा घोटाळा उजेडात आला होता.शेतकऱ्यांना कर्जवाटप न झाल्यामुळे बँका ५ ते ७ टक्के कर्जवाटपाचे उद्दिष्ट पूर्ण करू शकल्या नाहीत. या बँका निधीच्या अभावामुळे शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा करू शकल्या नाहीत. त्यामुळे तिन्ही बँकांना महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने ताब्यात घेऊन त्याचे पुनरुज्जीवन करण्याची प्रक्रिया आता सुरू झाल्याचे सूत्रांनी सांगितले. पूर्वी महाराष्ट्र राज्य सहकारी बँकसुद्धा डबघाईस आली होती. पण या बँकेवर प्रशासकाची नेमणूक झाल्यानंतर बँकेची आर्थिक स्थिती सुधारली. यावर्षी बँकेने लाभांशचे वाटप केले आहे. तिन्ही बँकांवर प्रशासकाची नेमणूक झाल्यानंतर राष्ट्रीयीकृत बँकांना शेतकऱ्यांना कर्जवाटप करण्यास सांगितले होते. पण त्यांचीही भूमिका नकारात्मक आहे. त्यामुळे सरकारने सकारात्मक पाऊल उचलत विलीनीकरणाचा निर्णय घेतल्याचे सूत्रांनी सांगितले.

नागपूर, वर्धा आणि बुलडाणा बँकेला महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत विलीन करण्याचा शासनाचा विचार आहे. सहकार विभागाची प्रक्रिया सुरू आहे.-प्रवीण वानखेडे,सहनिबंधक, सहकार विभाग.

टॅग्स :bankबँक