शहरं
Join us  
Trending Stories
1
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
2
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
3
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
4
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
5
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
6
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
7
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
8
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
9
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
10
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
11
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
12
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
13
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
14
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
15
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
16
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
17
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
18
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
19
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
20
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?

नागपूर ‘सायबर क्राईम’च्या आकडेवारीत ‘व्हायरस’?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2019 10:03 IST

साधारणत: माहिती अधिकारांतर्गत नेमकी, ठोस व मुद्देसूद आकडेवारी मिळणे अपेक्षित आहे. मात्र नागपूर पोलिसांनी ‘सायबर क्राईम’अंतर्गत एकाच वर्षात दाखल गुन्ह्यांची दोन माहिती अधिकारात वेगवेगळी माहिती देण्याचा प्रताप केला आहे.

ठळक मुद्देएकाच वर्षात दाखल गुन्ह्यांची वेगवेगळी माहिती नेमका आकडा तरी किती ?

योगेश पांडे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : साधारणत: माहिती अधिकारांतर्गत नेमकी, ठोस व मुद्देसूद आकडेवारी मिळणे अपेक्षित आहे. मात्र नागपूर पोलिसांनी ‘सायबर क्राईम’अंतर्गत एकाच वर्षात दाखल गुन्ह्यांची दोन माहिती अधिकारात वेगवेगळी माहिती देण्याचा प्रताप केला आहे. २०१५ सालाच्या आकडेवारीत हा घोळ झाला असून या वर्षात ‘सायबर क्राईम’ व ‘आयटी अ‍ॅक्ट’ अंतर्गत नेमके किती गुन्हे दाखल झाले याबाबत संभ्रम निर्माण होत आहे. २०१७ मधील माहितीच्या तुलनेत २०१९ मध्ये मिळालेल्या आकडेवारीत गुन्ह्यांची संख्या घटली असल्याने ‘सायबर क्राईम’च्या आकडेवारीत ‘व्हायरस’ तर शिरला नाही ना असा प्रश्न उपस्थित होत आहे.उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी २०१७ व २०१९ साली माहिती अधिकारांतर्गत नागपूर पोलिसांकडे माहिती मागविली होती. यात नागपुरात ‘सायबर क्राईम’ व ‘आयटी अ‍ॅक्ट’अंतर्गत किती गुन्हे दाखल झाले, तसेच किती आरोपींना अटक झाली, किती आर्थिक नुकसान झाले इत्यादी प्रश्न त्यांनी विचारले होते. पोलीस विभागाकडून नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार जानेवारी २०१५ ते २८ फेब्रुवारी २०१९ या कालावधीत नागपूर शहरात ‘सायबर क्राईम’ व ‘आयटी अ‍ॅक्ट’नुसार ३७८ गुन्हे दाखल झाले. यातील १०७ गुन्हे उघडकीस आले व १२३ आरोपींना अटक झाली. मात्र या आकडेवारीवर बारीक नजर टाकली असता २०१५ साली ७१ गुन्हे दाखल झाले होते व ३५ आरोपींना अटक झाली होती. मात्र २०१७ मधील माहिती अधिकारातून प्राप्त माहितीसमवेत चाचपणी केली असता आकडेवारीतील घोळ समोर आला. त्या आकडेवारीनुसार २०१५ साली ‘सायबर क्राईम’ व ‘आयटी अ‍ॅक्ट’नुसार ९८ गुन्हे दाखल झाले होते व २८ आरोपींना अटक झाली होती. या दोन्ही आकड्यांमध्ये तफावत आहे. २०१७ मधील माहितीनुसार २०१५ सालामध्ये ९८ गुन्हे दाखल झाले होते तर २०१९ मधील माहितीत ही संख्या ७१ वर कशी आली. तसेच जर जुन्या माहितीनुसार २०१५ मध्ये २८ आरोपींना अटक झाली होती, तर नव्या माहितीत आरोपींची संख्या अचानक कशी काय वाढली, हे प्रश्न उपस्थित होत आहेत.वर्षभरात दाखल गुन्ह्यांत ३३ टक्क्यांची वाढदरम्यान, गेल्या ५ वर्षांमध्ये उपराजधानीत इंटरनेटचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. ‘कॅशलेस’च्या युगात आता ‘ई-सेवा’ थेट मोबाईलपर्यंत येऊन पोहोचल्या आहेत. युवापिढीसाठी तर इंटरनेट दैनंदिन जीवनातील अविभाज्य घटक आहे. परंतु ‘ई-क्रांती’सोबतच ‘सायबर क्राईम’च्या प्रकरणांमध्येदेखील वाढ होत आहे. गेल्या ५ वर्षांमध्ये नागपुरात ‘सायबर क्राईम’ किंवा ‘आयटी अ‍ॅक्ट’अंतर्गत दाखल गुन्ह्यांमध्ये वाढ दिसून येत आहे. २०१७ च्या तुलनेत २०१८ मध्ये ३३ टक्क्यांची वाढ दिसून आली. या कालावधीत ‘सायबर’ गुन्ह्यांमुळे ९ कोटी ६९ लाख ३३ हजार ७०२ रुपयांचे आर्थिक नुकसान झाले.

टॅग्स :cyber crimeसायबर क्राइम