शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

नागपूर ‘सायबर क्राईम’च्या आकडेवारीत ‘व्हायरस’?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2019 10:03 IST

साधारणत: माहिती अधिकारांतर्गत नेमकी, ठोस व मुद्देसूद आकडेवारी मिळणे अपेक्षित आहे. मात्र नागपूर पोलिसांनी ‘सायबर क्राईम’अंतर्गत एकाच वर्षात दाखल गुन्ह्यांची दोन माहिती अधिकारात वेगवेगळी माहिती देण्याचा प्रताप केला आहे.

ठळक मुद्देएकाच वर्षात दाखल गुन्ह्यांची वेगवेगळी माहिती नेमका आकडा तरी किती ?

योगेश पांडे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : साधारणत: माहिती अधिकारांतर्गत नेमकी, ठोस व मुद्देसूद आकडेवारी मिळणे अपेक्षित आहे. मात्र नागपूर पोलिसांनी ‘सायबर क्राईम’अंतर्गत एकाच वर्षात दाखल गुन्ह्यांची दोन माहिती अधिकारात वेगवेगळी माहिती देण्याचा प्रताप केला आहे. २०१५ सालाच्या आकडेवारीत हा घोळ झाला असून या वर्षात ‘सायबर क्राईम’ व ‘आयटी अ‍ॅक्ट’ अंतर्गत नेमके किती गुन्हे दाखल झाले याबाबत संभ्रम निर्माण होत आहे. २०१७ मधील माहितीच्या तुलनेत २०१९ मध्ये मिळालेल्या आकडेवारीत गुन्ह्यांची संख्या घटली असल्याने ‘सायबर क्राईम’च्या आकडेवारीत ‘व्हायरस’ तर शिरला नाही ना असा प्रश्न उपस्थित होत आहे.उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी २०१७ व २०१९ साली माहिती अधिकारांतर्गत नागपूर पोलिसांकडे माहिती मागविली होती. यात नागपुरात ‘सायबर क्राईम’ व ‘आयटी अ‍ॅक्ट’अंतर्गत किती गुन्हे दाखल झाले, तसेच किती आरोपींना अटक झाली, किती आर्थिक नुकसान झाले इत्यादी प्रश्न त्यांनी विचारले होते. पोलीस विभागाकडून नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार जानेवारी २०१५ ते २८ फेब्रुवारी २०१९ या कालावधीत नागपूर शहरात ‘सायबर क्राईम’ व ‘आयटी अ‍ॅक्ट’नुसार ३७८ गुन्हे दाखल झाले. यातील १०७ गुन्हे उघडकीस आले व १२३ आरोपींना अटक झाली. मात्र या आकडेवारीवर बारीक नजर टाकली असता २०१५ साली ७१ गुन्हे दाखल झाले होते व ३५ आरोपींना अटक झाली होती. मात्र २०१७ मधील माहिती अधिकारातून प्राप्त माहितीसमवेत चाचपणी केली असता आकडेवारीतील घोळ समोर आला. त्या आकडेवारीनुसार २०१५ साली ‘सायबर क्राईम’ व ‘आयटी अ‍ॅक्ट’नुसार ९८ गुन्हे दाखल झाले होते व २८ आरोपींना अटक झाली होती. या दोन्ही आकड्यांमध्ये तफावत आहे. २०१७ मधील माहितीनुसार २०१५ सालामध्ये ९८ गुन्हे दाखल झाले होते तर २०१९ मधील माहितीत ही संख्या ७१ वर कशी आली. तसेच जर जुन्या माहितीनुसार २०१५ मध्ये २८ आरोपींना अटक झाली होती, तर नव्या माहितीत आरोपींची संख्या अचानक कशी काय वाढली, हे प्रश्न उपस्थित होत आहेत.वर्षभरात दाखल गुन्ह्यांत ३३ टक्क्यांची वाढदरम्यान, गेल्या ५ वर्षांमध्ये उपराजधानीत इंटरनेटचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. ‘कॅशलेस’च्या युगात आता ‘ई-सेवा’ थेट मोबाईलपर्यंत येऊन पोहोचल्या आहेत. युवापिढीसाठी तर इंटरनेट दैनंदिन जीवनातील अविभाज्य घटक आहे. परंतु ‘ई-क्रांती’सोबतच ‘सायबर क्राईम’च्या प्रकरणांमध्येदेखील वाढ होत आहे. गेल्या ५ वर्षांमध्ये नागपुरात ‘सायबर क्राईम’ किंवा ‘आयटी अ‍ॅक्ट’अंतर्गत दाखल गुन्ह्यांमध्ये वाढ दिसून येत आहे. २०१७ च्या तुलनेत २०१८ मध्ये ३३ टक्क्यांची वाढ दिसून आली. या कालावधीत ‘सायबर’ गुन्ह्यांमुळे ९ कोटी ६९ लाख ३३ हजार ७०२ रुपयांचे आर्थिक नुकसान झाले.

टॅग्स :cyber crimeसायबर क्राइम