शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर विद्यापीठाच्या निकालांचा वेग वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2018 14:04 IST

काही वर्षांअगोदर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ लेटलतिफ निकालांसाठी प्रसिद्ध होते. मात्र विद्यापीठाने तंत्रज्ञानाचा उपयोग सुरू केल्यानंतर मागील तीन वर्षांत नागपूर विद्यापीठाच्या ‘निकाल एक्सप्रेस’ने चांगलाच वेग घेतला आहे.

ठळक मुद्देसरासरी १९ दिवसांच्या अगोदर लागताहेत निकालतीन वर्षांत स्थितीत आमूलाग्र बदल

योगेश पांडे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : काही वर्षांअगोदर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ लेटलतिफ निकालांसाठी प्रसिद्ध होते. मात्र विद्यापीठाने तंत्रज्ञानाचा उपयोग सुरू केल्यानंतर मागील तीन वर्षांत नागपूर विद्यापीठाच्या ‘निकाल एक्सप्रेस’ने चांगलाच वेग घेतला आहे. २०१५ च्या तुलनेत आता सरासरी १९ दिवसांच्या अगोदर निकाल जाहीर होत आहेत. २०२४ पर्यंत परीक्षा झाल्यानंतर ३१ दिवसांतच निकाल लावण्याचे ‘टार्गेट’ विद्यापीठाने समोर ठेवले आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.एकेकाळी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या संथ निकालांमुळे विद्यार्थ्यांचे मोर्चांवर मोर्चे यायचे. नागपूर विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षांचे निकाल साधारणत: आॅगस्ट, सप्टेंबरपर्यंत लागायचे. यामुळे विद्यार्थ्यांना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागायचा. २०१४ साली तर ४६ टक्के निकाल ४५ दिवस उलटून गेल्यानंतर लागले होते. २०१५ साली गैरव्यावसायिक अभ्यासक्रमांचे निकाल हे सरासरी ५०.८८ दिवस तर व्यावसायिक अभ्यासक्रमांचे निकाल ५०.४३ दिवसांनी जाहीर झाले होते. मात्र त्यानंतर परीक्षा विभागाने कात टाकण्यास सुरुवात केली. विद्यापीठातील बहुसंख्य परीक्षांचे मूल्यांकन ’आॅनलाईन’ करण्यात आले. शिवाय परीक्षा प्रणालीत अनेक सुधारणा करुन निकालांचा वेग कसा वाढविता येईल, याचा प्रयत्न करण्यात आला. त्यानंतर सातत्याने प्रत्येक वर्षी निकालांचा वेग वाढत गेला. २०१४ मध्ये अवघ्या २६ टक्के परीक्षांचे निकाल ३० दिवसांच्या आत जाहीर झाले होते. २०१५ मध्ये हाच आकडा ३४.५३ टक्के इतका होता. २०१६ मध्ये निकालांचा वेग वाढला व ५०.८३ टक्के परीक्षांचे निकाल ३० दिवसांच्या आत जाहीर करण्यात विद्यापीठाला यश आले. २०१७ मध्ये ७०.३२ टक्के निकाल ३० दिवसांच्या आत जाहीर झाले. २०१८ च्या उन्हाळी परीक्षात तर गैरव्यावसायिक अभ्यासक्रमांच्या परीक्षांचे निकाल सरासरी ३१.४३ दिवस तर व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या परीक्षांचे निकाल सरासरी ३१.२२ दिवसात जाहीर झाले.

२०१४ पर्यंत ३१ दिवसांचे ‘टार्गेट’४नागपूर विद्यापीठाच्या निकालांच्या ‘पॅटर्न’चा राज्यातील व राज्याबाहेरील विद्यापीठांनीदेखील अभ्यास केला. निकालांचा हा वेग कायम राहावाल यासाठी विद्यापीठाकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. विद्यापीठाच्या बृहत् आराखड्यात यासंदर्भात ‘टार्गेट’देखील ठरविण्यात आले आहेत. सर्व परीक्षांचे निकाल सरासरी ३१ दिवसांत जाहीर झाले पाहिजे, यावर विद्यापीठाचा भर राहणार आहे.

निकालांचा वेग वाढण्याची कारणे

  • ‘आॅनस्क्रीन’ मूल्यांकन
  • मूल्यांकनासाठी प्राध्यापकांना येणे अनिवार्य
  • महाविद्यालयांसमवेत समन्वय
  • तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त उपयोग करण्याचे धोरण
टॅग्स :Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur Universityराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ