शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

नागपूर विद्यापीठ; ‘लॉकडाऊन’ उठल्यावरदेखील लगेच परीक्षा नाहीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2020 11:04 IST

सर्व कुलगुरूंची राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यासमवेत ‘व्हिडीओ कॉन्फरन्सिंग’द्वारे बैठक झाली. ‘लॉकडाऊन’ उठल्यावरदेखील लगेच परीक्षा घेणे शक्य होणार नाही. त्यामुळे मे महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यानंतरच परीक्षा घेणे योग्य ठरेल, अशी भूमिका अनेक कुलगुरूंनी मांडली.

ठळक मुद्देकुलगुरूंची राज्यपालांसमवेत ‘ऑनलाईन’ बैठक विद्यापीठाकडून विविध पर्यायांचा अभ्यास सुरू

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ‘कोरोना’मुळे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठासह राज्यभरातील सर्वच विद्यापीठांच्या उन्हाळी परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. सध्याची परिस्थिती लक्षात घेता यासंदर्भात काय करावे याबाबत सर्व कुलगुरूंची राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यासमवेत ‘व्हिडीओ कॉन्फरन्सिंग’द्वारे बैठक झाली. ‘लॉकडाऊन’ उठल्यावरदेखील लगेच परीक्षा घेणे शक्य होणार नाही. त्यामुळे मे महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यानंतरच परीक्षा घेणे योग्य ठरेल, अशी भूमिका अनेक कुलगुरूंनी मांडली. यासंदर्भात चार कुलगुरूंची समिती तयार केली असून परीक्षांचे नियोजन कसे करावे याबाबत ही समिती अहवाल देणार आहे.नागपूर विद्यापीठसह सर्वच विद्यापीठांच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. १४ एप्रिल रोजी ‘लॉकडाऊन’ उठल्यावर तातडीने परीक्षा घेणे शक्य होणार नाही. परीक्षेची तयारी, नवीन वेळापत्रक, अगोदरच्या परीक्षांचे वेळापत्रक, मूल्यांकन यासह विविध गोष्टींचे नियोजन करावे लागणार आहे. जर १४ एप्रिलनंतर आठवड्याभरात किंवा दोन आठवड्यात हे सर्व करण्याचा प्रयत्न केला तर प्रचंड गोंधळ होऊ शकतो. शिवाय बहुतांश विद्यापीठांत कर्मचारी व अधिकाऱ्यांची कमतरता आहे. अशा स्थितीत हे करणे जिकीराचे काम होईल. त्यामुळे जर १४ एप्रिल रोजी ‘लॉकडाऊन’ उठला तर १५ मेच्या आसपास परीक्षा घेता येतील, अशी भूमिका नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.सिद्धार्थविनायक काणे यांनी मांडली. नागपूर विद्यापीठाकडून परीक्षा कशा घ्यावा यासंदर्भात तीन वेगवेगळ््या पर्यायांवर विचार सुरू आहे. या पर्यायांची योजना सरकारकडे पाठविण्यात येणार आहे.राज्यपालांनी सर्व कुलगुरूंची बाजू ऐकून घेतली. त्यानंतर ‘लॉकडाऊन’चा कालावधी कधी संपेल व त्यानंतर संबंधित समितीच्या अहवाल यांच्यावर बरेच काही विसंबून असेल असे स्पष्ट केले. या समितीत ‘एसएनडीटी’, मुंबई, पुणे व कोल्हापूर विद्यापीठांच्या कुलगुरूंचा समावेश आहे.हिवाळी-उन्हाळी परीक्षा एकत्र ?जर ‘लॉकडाऊन’चा कालावधी वाढला तर उन्हाळी परीक्षा उशीरा होतील. त्यामुळे पुढील शैक्षणिक सत्राला फटका बसेल. त्यामुळे उन्हाळी व हिवाळी परीक्षा एकत्र घेण्यावर विचार होईल का यावरदेखील चर्चा झाली. काही कुलगुरूंनी ही संकल्पना उचलून धरली.

 

टॅग्स :Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur Universityराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ