शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

नागपूर विद्यापीठ : २० मेशिवाय परीक्षा अशक्यच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2020 00:09 IST

साधारणत: २० मेनंतरच परीक्षांचे आयोजन करता येणार आहे. त्यामुळे आता राज्य शासनाने नेमलेली समिती नेमका काय अहवाल सादर करते, याकडे संपूर्ण विद्यापीठ वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

ठळक मुद्दे‘लॉकडाऊन’ उठले तरी लगेच आयोजन होणे नाही

 लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : ‘कोरोना’मुळे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या ३० एप्रिलपर्यंतच्या उन्हाळी परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. देशात ३ मेपर्यंत ‘लॉकडाऊन’ कायम राहणार आहे. त्यानंतर स्थिती सुरळीत झाली व ‘लॉकडाऊन’ हटला तरी विद्यापीठाला लगेच परीक्षा घेणे शक्य होणार नाही. साधारणत: २० मेनंतरच परीक्षांचे आयोजन करता येणार आहे. त्यामुळे आता राज्य शासनाने नेमलेली समिती नेमका काय अहवाल सादर करते, याकडे संपूर्ण विद्यापीठ वर्तुळाचे लक्ष लागले आहे.‘कोरोना’संदर्भात राज्य शासनाच्या निर्देशानंतर नागपूर विद्यापीठाने सर्वात प्रथम ३१ मार्चपर्यंतच्या सर्व परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला होता. ३ एप्रिलपासून तर विद्यापीठाचा परीक्षांचा सर्वात मोठा टप्पा सुरू होणार होता. २८ मार्च रोजी विद्यापीठाने त्या परीक्षादेखील पुढे ढकलण्याचे निर्देश जारी केले. ‘लॉकडाऊन’ १४ एप्रिलपर्यंत राहील व त्यानंतर स्थिती सामान्य होईल असा अंदाज होता, परंतु तसे होऊ शकले नाही. महाराष्ट्र शासनाच्या १३ एप्रिल रोजीच्या पत्रानुसार विद्यापीठाने ३० एप्रिलपर्यंतच्या परीक्षादेखील पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. विद्यापीठाने आतापर्यंत साधारणत: ७०० हून अधिक परीक्षा पुढे ढकलल्या असून, यात पावणेचार लाखाहून अधिक विद्यार्थी सहभागी होणार होते. आतापर्यंत जवळपास ८० टक्के परीक्षा पुढे ढकलल्या गेल्या आहेत.जर ३ मेनंतर ‘लॉकडाऊन’ उठले तरी विद्यापीठाला लगेच परीक्षा घेणे शक्य होणार नाही. सर्व परीक्षांचे परत नियोजन करणे, पुढे ढकलल्या गेलेल्या व नियमित परीक्षांच्या वेळेचे गणित जमविणे, बाहेरगावी गेलेल्या विद्यार्थ्यांना शहरात परत येण्यासाठी वेळ देणे, परीक्षा केंद्रांवर आवश्यक सोयी करणे, यावर विद्यापीठाला भर द्यावा लागणार आहे. हे सर्व करण्यासाठी कमीतकमी दोन आठवड्याचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे परीक्षा या २० मेनंतरच होऊ शकतील, अशी माहिती सूत्रांनी दिली.‘अकॅडेमिक कॅलेंडर’ कोलमडणारचविद्यापीठाच्या ‘अकॅडेमिक कॅलेंडर’नुसार शैक्षणिक सत्राला १५ जूनपासून सुरुवात होते, तर जुलैमध्ये प्रथम वर्षाच्या नवीन प्रवेशांना सुरुवात होते. मात्र निकाल उशिरा लागले तर प्रवेशप्रक्रियादेखील लांबेल. अशास्थितीत त्याचा फटका हिवाळी परीक्षांना बसू शकतो. त्यामुळे संपूर्ण ‘अकॅडेमिक कॅलेंडर’ कोलमडण्याची स्थिती निर्माण झाली आहे.समितीच्या अहवालाकडे लक्षराज्यातील विद्यापीठांच्या परीक्षांचा कालावधी निश्चित करण्यासाठी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी राज्यातील चार विद्यापीठांच्या कुलगुरूंची समिती स्थापन केली आहे. या समितीच्या अहवालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ऑनलाईन परीक्षा घ्याव्या की केवळ अंतिम वर्षाच्याच परीक्षा घ्याव्यात, यासंदर्भात ही समिती शिफारस करणार आहे. दरम्यान, सरकारच्या निर्देशांचे आम्ही पालन करू. अद्याप सरकारने ‘ऑनलाईन’ परीक्षांबाबत काहीही सांगितले नसल्याने आम्ही त्याची तयारी सुरू केलेली नाही. जसे निर्देश मिळतील त्या दिशेने पावले उचलू, असे परीक्षा व मूल्यमापन संचालक डॉ. प्रफुल्ल साबळे यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur Universityराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठexamपरीक्षा