शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी नवीन संकट? अमेरिकेसह सात देश करत आहेत मोठी तयारी; रशियासोबत कनेक्शन
2
आता चीनला जाण्यासाठी भारतातून मिळणार थेट विमान सेवा; प्रवाशांचा वेळ अन् पैसा वाचणार
3
युक्रेन युद्धानंतर पुतिन पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येणार, अनेक करारांवर स्वाक्षऱ्या होणार
4
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
5
चार आरोपींवर १९ वर्षांनंतर झाले आरोप निश्चित मालेगाव बॉम्बस्फोट; विशेष न्यायालयांत सुनावणी
6
राशीभविष्य २ ऑक्टोबर २०२५: आज कामात यश मिळून आर्थिक लाभ होतील, नशिबाची साथ मिळेल
7
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
8
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
9
आज गाजणार मेळावे! वाचा महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या सभांचे वेळापत्रक आणि प्रमुख मुद्दे
10
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
11
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
12
५७ केंद्रीय विद्यालयांना केंद्राने दिली मंजुरी; महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांचा यादीत समावेश
13
रा. स्व. संघाने शिकवली फक्त शिस्त आणि सेवा! मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितली संघ शाखेतील प्रार्थनेची शक्ती
14
संघ शताब्दी आणि राज्यघटना; शताब्दीच्या उंबरठ्यावर रा.स्व.संघ आणि 'अमृतमहोत्सवी' संविधान!
15
अनुकंपाच्या तब्बल ५,१८७ उमेदवारांना मिळणार नियुक्तिपत्रे; एकाच दिवशी १० हजार जण नोकरीत हाेणार रुजू
16
ट्रम्प यांच्या योजनेला हमास मान्यता देईना; इस्रायलने गाझावर केलेल्या हल्ल्यात १६ जण ठार
17
शताब्दी वर्षात संघाचे ध्येय: 'राष्ट्रसेवेत' समाजाचा सहभाग! स्वयंसेवकांचे कुटुंब कसे बनले संघाच्या कार्याचे केंद्र?
18
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
19
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
20
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम

नागपूर विद्यापीठ : परीक्षा रद्द करण्याबाबतचा संभ्रम कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2020 20:32 IST

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील विद्यापीठांमधील अंतिम वर्षातील अंतिम सत्राच्या परीक्षा रद्द करण्यात येतील, अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली होती. मात्र अद्यापही शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागातर्फे यासंदर्भात कुठलेही लेखी निर्देश आलेले नाहीत.

ठळक मुद्देराज्य शासनाकडून अद्यापही लेखी आदेश नाहीत

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील विद्यापीठांमधील अंतिम वर्षातील अंतिम सत्राच्या परीक्षा रद्द करण्यात येतील, अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली होती. मात्र अद्यापही शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागातर्फे यासंदर्भात कुठलेही लेखी निर्देश आलेले नाहीत. शिवाय राज्यपाल कार्यालयाकडूनदेखील काहीही सांगण्यात आलेले नाही. अशा स्थितीत परीक्षा रद्द करायच्या की जुलै महिन्यात परीक्षा घेण्यासाठीची तयारी कायम राखावी हा प्रश्न विद्यापीठ प्रशासनासमोर निर्माण झाला आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात दररोज निर्देशांची प्रतीक्षा करण्यात येत आहे.राज्यातील विद्यापीठांच्या परीक्षा कशा घ्याव्यात यासंदर्भात राज्य सरकारने कुलगुरूंची समिती स्थापन केली होती. त्या समितीने दिलेल्या शिफारशींनुसार सरकारने ८ मे रोजी परिपत्रक काढले. त्या परिपत्रकात विद्यापीठाने अंतिम वर्षाच्या परीक्षा घ्याव्या, असे नमूद केले होते. परिपत्रकाच्या अनुषंगाने नागपूर आणि अमरावती विद्यापीठाने परीक्षा घेण्यासंदर्भात तयारी केली आहे. या परीक्षा कॉलेजस्तरावर असाव्या की विद्यापीठाने घ्याव्या याबाबत जूनच्या अखेरच्या आठवड्यात उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत आढावा बैठक घेणार होते. मात्र त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी परीक्षा रद्द करण्याची घोषणा केली. ८ मेच्या निर्देशानंतर विद्यापीठाला परीक्षांबाबत इतर कुठलेही निर्देश राज्य शासनाकडून आलेले नाहीत. केवळ नागपूरच नव्हे तर इतर कुठल्याही विद्यापीठाला असे निर्देश प्राप्त झालेले नाहीत. दरम्यान, सरकारने परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला असला तरी त्यावर राज्यपालांनी आक्षेप घेतला आहे. अशा स्थितीत विद्यापीठ प्रशासनासमोर संभ्रम निर्माण झाला आहे.बॅकलॉग विद्यार्थ्यांचे काय होणार ?याशिवाय मागील सत्रांचे विषय बॅक असलेल्या विद्यार्थ्यांचे काय करायचे हादेखील विद्यापीठासमोर मोठा प्रश्न आहे. अशा विद्यार्थ्यांची संख्या हजारोंनी आहे. या विद्यार्थ्यांना अगोदरच्या सत्रांच्या आधारावर श्रेणी देऊन उत्तीर्ण केले तर ते नियमांचे उल्लंघन ठरेल. यासंदर्भात परीक्षा व मूल्यमापन संचालक डॉ. प्रफुल्ल साबळे यांना विचारणा केली असता राज्य शासनाकडून नागपूर विद्यापीठाला कुठलेही अधिकृत लेखी निर्देश आलेले नाहीत. त्यामुळे तोपर्यंत काहीच बोलणे किंवा अंदाज बांधणे शक्य होणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur Universityराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठexamपरीक्षा