शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

नागपूर विद्यापीठ : परीक्षा रद्द करण्याबाबतचा संभ्रम कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2020 20:32 IST

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील विद्यापीठांमधील अंतिम वर्षातील अंतिम सत्राच्या परीक्षा रद्द करण्यात येतील, अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली होती. मात्र अद्यापही शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागातर्फे यासंदर्भात कुठलेही लेखी निर्देश आलेले नाहीत.

ठळक मुद्देराज्य शासनाकडून अद्यापही लेखी आदेश नाहीत

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील विद्यापीठांमधील अंतिम वर्षातील अंतिम सत्राच्या परीक्षा रद्द करण्यात येतील, अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली होती. मात्र अद्यापही शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागातर्फे यासंदर्भात कुठलेही लेखी निर्देश आलेले नाहीत. शिवाय राज्यपाल कार्यालयाकडूनदेखील काहीही सांगण्यात आलेले नाही. अशा स्थितीत परीक्षा रद्द करायच्या की जुलै महिन्यात परीक्षा घेण्यासाठीची तयारी कायम राखावी हा प्रश्न विद्यापीठ प्रशासनासमोर निर्माण झाला आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात दररोज निर्देशांची प्रतीक्षा करण्यात येत आहे.राज्यातील विद्यापीठांच्या परीक्षा कशा घ्याव्यात यासंदर्भात राज्य सरकारने कुलगुरूंची समिती स्थापन केली होती. त्या समितीने दिलेल्या शिफारशींनुसार सरकारने ८ मे रोजी परिपत्रक काढले. त्या परिपत्रकात विद्यापीठाने अंतिम वर्षाच्या परीक्षा घ्याव्या, असे नमूद केले होते. परिपत्रकाच्या अनुषंगाने नागपूर आणि अमरावती विद्यापीठाने परीक्षा घेण्यासंदर्भात तयारी केली आहे. या परीक्षा कॉलेजस्तरावर असाव्या की विद्यापीठाने घ्याव्या याबाबत जूनच्या अखेरच्या आठवड्यात उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत आढावा बैठक घेणार होते. मात्र त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी परीक्षा रद्द करण्याची घोषणा केली. ८ मेच्या निर्देशानंतर विद्यापीठाला परीक्षांबाबत इतर कुठलेही निर्देश राज्य शासनाकडून आलेले नाहीत. केवळ नागपूरच नव्हे तर इतर कुठल्याही विद्यापीठाला असे निर्देश प्राप्त झालेले नाहीत. दरम्यान, सरकारने परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला असला तरी त्यावर राज्यपालांनी आक्षेप घेतला आहे. अशा स्थितीत विद्यापीठ प्रशासनासमोर संभ्रम निर्माण झाला आहे.बॅकलॉग विद्यार्थ्यांचे काय होणार ?याशिवाय मागील सत्रांचे विषय बॅक असलेल्या विद्यार्थ्यांचे काय करायचे हादेखील विद्यापीठासमोर मोठा प्रश्न आहे. अशा विद्यार्थ्यांची संख्या हजारोंनी आहे. या विद्यार्थ्यांना अगोदरच्या सत्रांच्या आधारावर श्रेणी देऊन उत्तीर्ण केले तर ते नियमांचे उल्लंघन ठरेल. यासंदर्भात परीक्षा व मूल्यमापन संचालक डॉ. प्रफुल्ल साबळे यांना विचारणा केली असता राज्य शासनाकडून नागपूर विद्यापीठाला कुठलेही अधिकृत लेखी निर्देश आलेले नाहीत. त्यामुळे तोपर्यंत काहीच बोलणे किंवा अंदाज बांधणे शक्य होणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur Universityराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठexamपरीक्षा