शहरं
Join us  
Trending Stories
1
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
2
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
3
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
4
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
5
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
6
Sangli Crime: ‘व्हाईट हाऊस हॉटेल’च्या बारमध्ये मित्रानेच चिरला गळा, तरुणाचा जागेवरच मृत्यू
7
एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल
8
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
9
‘चाचा पीएमओ है हमारे’, एअरपोर्ट ऑथोरिटीत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली बंटी-बबलीकडून ७ लाखांचा गंडा
10
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
11
Maoist Leader: ‘देवजी’च्या महासचिवपदी निवडीचा दावा सपशेल खोटा, आत्मसमर्पण करणाऱ्या 'चंद्राण्णा'वर साधला निशाणा
12
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
13
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
14
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
15
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
16
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
17
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
18
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
19
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा
20
Bihar Election: नितीश कुमारी की, तेजस्वी यादव, बिहारमध्ये कोणाचे सरकार येणार? फलोदी सट्टा बाजाराचा कौल काय?

नागपूर विद्यापीठ : परीक्षांबाबत आता संभ्रम आणखी वाढीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2020 23:46 IST

विद्यापीठ अनुदान आयोगाने अंतिम वर्षाच्या परीक्षांबाबत दिशानिर्देश जारी केल्यानंतर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठामध्ये आणखी संभ्रम वाढला आहे.

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : विद्यापीठ अनुदान आयोगाने अंतिम वर्षाच्या परीक्षांबाबत दिशानिर्देश जारी केल्यानंतर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठामध्ये आणखी संभ्रम वाढला आहे. विद्यापीठ वर्तुळातील अनेकांनी परीक्षा घेण्याचे स्वागत केले असले तरी प्रशासनाचे संपूर्ण लक्ष राज्य शासनाकडे लागले आहे. राज्य शासनातर्फे मात्र मंगळवारी परीक्षा नकोच अशी भूमिका घेण्यात आली आहे. त्यामुळे विद्यापीठ अनुदान आयोगाच्या निर्देशांबाबत शासन कोणता ठोस निर्णय घेते यावर विद्यापीठाच्या परीक्षांचे भवितव्य अवलंबून राहणार आहे.‘कोरोना’मुळे नागपूर विद्यापीठाच्या परीक्षा स्थगित करण्यात आल्या. राज्य शासनाने अंतिम वर्षाच्या परीक्षा न घेता अगोदरच्या सत्रांच्या कामगिरीच्या आधारे मूल्यमापन करण्याचा निर्णय घेतला. सोमवारी विद्यापीठ अनुदान आयोगाने दिशानिर्देश जारी करुन सप्टेंबरमध्ये अंतिम वर्षाच्या परीक्षा घ्याव्यात, अशा सूचना केल्या तर उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी मंगळवारी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्र्यांना पत्र पाठवून परीक्षा घेणे योग्य ठरणार नसल्याची भूमिका मांडली.या सर्व घटनाक्रमामुळे नागपूर विद्यापीठ वर्तुळात संभ्रम निर्माण झाला आहे. विद्यार्थ्यांकडून शिक्षकांना विचारणा करण्यात येत आहे, तर शिक्षकांकडून विद्यापीठाकडे अंगुलीनिर्देश करण्यात येत आहे. विद्यापीठ स्वायत्त संस्था असली तरी परीक्षांसंदर्भात विद्यापीठाकडून राज्य शासनाच्या निर्देशांचे पालन करण्यात येणार आहे. त्यामुळे गोंधळ आणखी वाढीस लागला आहे.सध्या ‘वेट अ‍ॅन्ड वॉच’ची भूमिकाविद्यापीठ अनुदान आयोगाचे दिशानिर्देश जारी झाले असले तरी राज्य शासनाकडून विद्यापीठाला अद्याप कुठलेही निर्देश आलेले नाहीत. परीक्षा घ्यायच्या की नाही यासंदर्भात प्रशासनाने ‘वेट अ‍ॅन्ड वॉच’चीच भूमिका घेतली आहे. राज्य शासनाच्या निर्देशांनंतर पुढील पावले उचलण्यात येतील, असे प्रतिपादन प्रभारी कुलसचिव डॉ. नीरज खटी यांनी केले.परीक्षा घेण्याची तयारी, पण...जर परीक्षा घेण्याचा निर्णय झाला तर विद्यापीठाची परीक्षेची तयारी असेल. परंतु त्यासाठी मोठ्या आव्हानांचादेखील सामना करावा लागेल. अनेक विद्यार्थी गावांकडे गेले आहेत. बस व रेल्वे सेवा सुरू होत नाही तोपर्यंत ते परतू शकणार नाहीत. शिवाय नागपूर विद्यापीठाचा पसारा मोठा आहे. त्यामुळे परीक्षा केंद्रांवर ‘फिजिकल डिस्टन्सिंग’ ठेवणे कठीण होईल. पर्यायाने परीक्षा केंद्र वाढवावी लागतील. त्यासाठी महाविद्यालयांना तयार करणे हे जिकीरीचे काम असेल. शिवाय परीक्षा झाल्या तर निकालांना विलंब होईल व त्यामुळे पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशप्रक्रिया आॅक्टोबरनंतरच राबवावी लागेल, अशी माहिती सूत्रांनी दिली.

टॅग्स :Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur Universityराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठexamपरीक्षा