शहरं
Join us  
Trending Stories
1
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
2
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
3
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
4
काँग्रेसकडून भाजपाला मोठा धक्का, माजी मंत्र्याने केली घरवापसी, पद्माकर वळवी यांचा पक्षप्रवेश
5
Jolly LLB 3: अ‍ॅडव्होकेट जगदीश त्यागी बनून पुन्हा एकदा अरशद वारसी येतोय भेटीला, चाहत्यांची उत्सुकता शिगेला
6
Health: हाताच्या दोन बोटांवरून लक्षात येतं, शरीरात वाढलेलं कोलेस्ट्रॉल; त्वरित करा 'हे' उपाय 
7
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
8
'या' दिवशी ७ तासांसाठी बंद राहणार HDFC च्या बँकिंग सुविधा; पाहा कोणत्या सेवांचा लाभ घेता येणार नाही?
9
सकाळी बँकर, नंतर रॅपिडो रायडर! महिला प्रवाशाला आला थक्क करणारा अनुभव; म्हणाली, “प्रेरणादायी”
10
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
11
Donald Trump Tariff Russian Oil: "आता कोणताही सेकंडरी टॅरिफ नाही, २-३ आठवड्यानंतर विचार करू," अतिरिक्त शुल्कावरुन भारताला दिलासा मिळणार?
12
विराट-रोहित नव्हे MI कॅप्टन हार्दिक पांड्यामुळं IPL कॉमेंट्री पॅनलमधून 'गायब' झाला इरफान पठाण
13
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
14
SBI चा ग्राहकांना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
15
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
16
"लग्न टिकलं असतं तर मला आवडलं असतं...", अरबाज खानसोबतच्या घटस्फोटावर इतक्या वर्षांनी मलायकाचं भाष्य
17
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?
18
Gopal Kala 2025: कलियुगात टिकून राहायचे असेल तर कृष्णाच्या 'या' पाच गोष्टी आजपासून फॉलो करा!
19
'रामायण' हॉलिवूडपेक्षा कमी नाही...सनी देओलने दिली प्रतिक्रिया; हनुमानाच्या भूमिकेत दिसणार
20
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!

नागपूर विद्यापीठ : परीक्षांबाबत आता संभ्रम आणखी वाढीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2020 23:46 IST

विद्यापीठ अनुदान आयोगाने अंतिम वर्षाच्या परीक्षांबाबत दिशानिर्देश जारी केल्यानंतर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठामध्ये आणखी संभ्रम वाढला आहे.

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : विद्यापीठ अनुदान आयोगाने अंतिम वर्षाच्या परीक्षांबाबत दिशानिर्देश जारी केल्यानंतर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठामध्ये आणखी संभ्रम वाढला आहे. विद्यापीठ वर्तुळातील अनेकांनी परीक्षा घेण्याचे स्वागत केले असले तरी प्रशासनाचे संपूर्ण लक्ष राज्य शासनाकडे लागले आहे. राज्य शासनातर्फे मात्र मंगळवारी परीक्षा नकोच अशी भूमिका घेण्यात आली आहे. त्यामुळे विद्यापीठ अनुदान आयोगाच्या निर्देशांबाबत शासन कोणता ठोस निर्णय घेते यावर विद्यापीठाच्या परीक्षांचे भवितव्य अवलंबून राहणार आहे.‘कोरोना’मुळे नागपूर विद्यापीठाच्या परीक्षा स्थगित करण्यात आल्या. राज्य शासनाने अंतिम वर्षाच्या परीक्षा न घेता अगोदरच्या सत्रांच्या कामगिरीच्या आधारे मूल्यमापन करण्याचा निर्णय घेतला. सोमवारी विद्यापीठ अनुदान आयोगाने दिशानिर्देश जारी करुन सप्टेंबरमध्ये अंतिम वर्षाच्या परीक्षा घ्याव्यात, अशा सूचना केल्या तर उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी मंगळवारी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्र्यांना पत्र पाठवून परीक्षा घेणे योग्य ठरणार नसल्याची भूमिका मांडली.या सर्व घटनाक्रमामुळे नागपूर विद्यापीठ वर्तुळात संभ्रम निर्माण झाला आहे. विद्यार्थ्यांकडून शिक्षकांना विचारणा करण्यात येत आहे, तर शिक्षकांकडून विद्यापीठाकडे अंगुलीनिर्देश करण्यात येत आहे. विद्यापीठ स्वायत्त संस्था असली तरी परीक्षांसंदर्भात विद्यापीठाकडून राज्य शासनाच्या निर्देशांचे पालन करण्यात येणार आहे. त्यामुळे गोंधळ आणखी वाढीस लागला आहे.सध्या ‘वेट अ‍ॅन्ड वॉच’ची भूमिकाविद्यापीठ अनुदान आयोगाचे दिशानिर्देश जारी झाले असले तरी राज्य शासनाकडून विद्यापीठाला अद्याप कुठलेही निर्देश आलेले नाहीत. परीक्षा घ्यायच्या की नाही यासंदर्भात प्रशासनाने ‘वेट अ‍ॅन्ड वॉच’चीच भूमिका घेतली आहे. राज्य शासनाच्या निर्देशांनंतर पुढील पावले उचलण्यात येतील, असे प्रतिपादन प्रभारी कुलसचिव डॉ. नीरज खटी यांनी केले.परीक्षा घेण्याची तयारी, पण...जर परीक्षा घेण्याचा निर्णय झाला तर विद्यापीठाची परीक्षेची तयारी असेल. परंतु त्यासाठी मोठ्या आव्हानांचादेखील सामना करावा लागेल. अनेक विद्यार्थी गावांकडे गेले आहेत. बस व रेल्वे सेवा सुरू होत नाही तोपर्यंत ते परतू शकणार नाहीत. शिवाय नागपूर विद्यापीठाचा पसारा मोठा आहे. त्यामुळे परीक्षा केंद्रांवर ‘फिजिकल डिस्टन्सिंग’ ठेवणे कठीण होईल. पर्यायाने परीक्षा केंद्र वाढवावी लागतील. त्यासाठी महाविद्यालयांना तयार करणे हे जिकीरीचे काम असेल. शिवाय परीक्षा झाल्या तर निकालांना विलंब होईल व त्यामुळे पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशप्रक्रिया आॅक्टोबरनंतरच राबवावी लागेल, अशी माहिती सूत्रांनी दिली.

टॅग्स :Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur Universityराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठexamपरीक्षा