शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
2
"मोदी सरकार उत्सव करत असताना लोक रेल्वेतून पडून मेली" मुंब्रातील घटनेवरून राहुल गांधी बरसले
3
Mumbra Train Accident: लोकल ट्रेनमधून पडले, किडे-मुंग्यांसारखा गेला जीव, मृत्यू झालेले कोण? नावे आली समोर
4
"रेल्वे मंत्री आहेत की रील मंत्री?" मुंबई रेल्वे दुर्घटनेवरून आदित्य ठाकरेंची केंद्रावर टीका
5
मुंबईला जाणाऱ्या मालवाहू जहाजात स्फोट, ५० कंटेनर समुद्रात पडले; ४ कर्मचारी बेपत्ता
6
ना युक्रेन, ना ब्रिटन, 'हा' देश रशियाचा शत्रू नंबर वन; हिटलरशी आहे थेट कनेक्शन, कारण...
7
भारताच्या कंपन्यांवर टाळं लावण्याच्या प्रयत्नात पाकिस्तानचा मित्र चीन! आपली काय आहे तयारी?
8
परप्रातांमधून मुंबईत आदळणारे लोंढेच जबाबदार; मुंबईत मुंब्रा घटनेवरून राज ठाकरेंचा संताप
9
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशीची हत्या करणारे हेच ते; आरोपींचे फोटो आले समोर, सोनमसोबत रचला भयंकर कट
10
लोकलमधील पोलला घट्ट धरून ठेवलं म्हणून, नाहीतर..; अपघातातून बचावलेल्या मच्छिंद्रने सांगितली आपबिती
11
पती, पत्नी आणि हत्याकांड! राजा रघुवंशीप्रमाणेचे 'या' तरुणांचाही पत्नीने काढला काटा
12
25 वर्षांच्या प्रियकराकडून 36 वर्षीय प्रेयसीची हत्या; दोन दिवसांनंतर हॉटेलमध्ये सापडला मृतदेह
13
आपल्याच कंपनीत अधिकाऱ्यांपेक्षाही कमी सॅलरी घेतात गौतम अदानी, पाहा किती आहे त्यांचं वेतन?
14
मुंब्र्याच्या 'त्या' धोकादायक वळणाबाबत मनसे कार्यकर्त्याने दिलं होतं पत्र; अपघातात त्यानेच गमावले पाय
15
मुंब्रा अपघात: "प्रवाशांवरच त्यांच्या मृत्यूचे खापर फोडून चालणार नाही"; शरद पवारांचे रोखठोक मत
16
NCP अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्याचा मृतदेह स्वत:च्या कारमध्येच आढळला; नेमकं काय घडलं?
17
Mumbai Train Accident: "घटना दुर्दैवी, 'रेल्वे'कडून अपघाताची चौकशी सुरू"; मुख्यमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती
18
Raja Raghuvanshi :'सोनम माझ्यासोबत बोलत नाही, मला लग्न करायचं नाही'; लग्नाआधीच राजा रघुवंशीने आईला सांगितलं होतं
19
"दुआ लिपासोबत मुलं जन्माला घालायचीत", वादग्रस्त वक्तव्यावर बादशाहचं स्पष्टीकरण, म्हणाला...
20
IND vs ENG: 'तो बुमराहपेक्षाही भारी...' माजी क्रिकेटपटूनं घेतलं 'या' गोलंदाजाचं नाव!

नागपूर विद्यापीठ ; ‘बीएड’च्या परीक्षा परत पुढे ढकलल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 11:08 IST

Nagpur News राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने अखेर ‘बीएड’च्या २०१९-२० वर्षातील प्रथम सत्राच्या ऑफलाईन परीक्षा परत एकदा पुढे ढकलल्याआहेत. ‘

ठळक मुद्दे ‘कोरोना’चे आकडे वाढत असल्याने विद्यापीठाने २४ व २६ फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात येणारे पेपर पुढील निर्देशांपर्यंत पुढे ढकलले आहेत. परीक्षा व मूल्यमापन संचालक डॉ. प्रफुल्ल साबळे यांनी त्यासंदर्भातील अधिसूचनादेखील जारी केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने अखेर ‘बीएड’च्या २०१९-२० वर्षातील प्रथम सत्राच्या ऑफलाईन परीक्षा परत एकदा ‘पोस्टपोन’ केल्या आहेत. ‘कोरोना’चे आकडे वाढत असल्याने प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे ‘कोरोना’मुळे दुसऱ्यांदा परीक्षा ‘पोस्टपोन’ करावी लागली आहे. जी परीक्षा २०१९ च्या हिवाळ्यात पूर्ण व्हायला पाहिजे होती, ती आता कधी होणार असा प्रश्न विद्यार्थ्यांना पडला आहे.

२०१९-२० मध्ये बी.एड.च्या प्रवेशप्रक्रियेला विलंब झाल्यामुळे हिवाळी २०१९ ची प्रथम सत्राची परीक्षा १६ मार्चला सुरू झाली होती. मात्र, पहिला पेपर होताच ‘लॉकडाऊन’ करण्यात आले. त्यामुळे परीक्षा रद्द करण्यात आली. ही परीक्षा हिवाळी २०१९ ची असल्याने विद्यापीठाला साथ प्रतिबंधक कायद्यानुसार या विद्यार्थ्यांना पुढील वर्गात सरळ प्रवेश देणेही अशक्य आहे. त्यांची प्रथम सत्राच्या परीक्षेचा निकाल जाहीर करून त्या आधारे द्वितीय सत्रातील विद्यार्थ्यांना तिसऱ्या सत्रात प्रमोट करता येणार आहे. त्यामुळे ९ ते ११ नोव्हेंबरदरम्यान परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. परंतु अनेक विद्यार्थी बाहेरगावचे आहेत. आता नागपुरात येऊन परीक्षा कशी द्यायची व त्या कालावधीत रहायचे कुठे हा त्यांच्यासमोर मोठा प्रश्न पडला होता. कोरोनामुळे परीस्थिती नियंत्रित झाल्यावरच विद्यापीठाने परीक्षा घ्यावी अशी मागणी विद्यार्थ्यांकडून केली गेली व विद्यापीठानेदेखील परीक्षा पुढे ढकलली होती.

मनपाकडून विद्यापीठ प्रशासनाला फोन

बुधवारी दुपारी २ वाजता विद्यार्थ्यांचा ‘एज्युकेशनल टेक्नॉलॉजी अ‍ॅन्ड कॉम्प्युटर असिस्टेड इन्स्ट्रक्शन्स’ हा पेपर होता. विद्यार्थी पेपरसाठी परीक्षा केंद्रांवरदेखील पोहोचले. डॉ.बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयच ‘कोरोना’मुळे ‘सील’ करण्यात आल्याने तेथील विद्यार्थ्यांना दुसऱ्या परीक्षा केंद्रांवर हलविण्यासाठी विद्यापीठाने वाहनेदेखील पाठविली. मात्र मनपा प्रशासनाकडून विद्यापीठाला फोन गेला व परीक्षा घेतल्यास ‘कोरोना’च्या नियमावलीचा भंग ठरेल असे सांगण्यात आले. त्यामुळे विद्यापीठाने तातडीने परीक्षा पुढे ढकलण्याचे निर्देश जारी केले, अशी माहिती कुलगुरू डॉ.सुभाष चौधरी यांनी दिली.

टॅग्स :examपरीक्षा