शहरं
Join us  
Trending Stories
1
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
2
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
3
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
4
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
5
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
6
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
7
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
8
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
9
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
10
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
11
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
12
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
13
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
14
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
15
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
16
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
17
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
18
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
19
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
20
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त

नागपूर विद्यापीठ ; ‘बीएड’च्या परीक्षा परत पुढे ढकलल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 11:08 IST

Nagpur News राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने अखेर ‘बीएड’च्या २०१९-२० वर्षातील प्रथम सत्राच्या ऑफलाईन परीक्षा परत एकदा पुढे ढकलल्याआहेत. ‘

ठळक मुद्दे ‘कोरोना’चे आकडे वाढत असल्याने विद्यापीठाने २४ व २६ फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात येणारे पेपर पुढील निर्देशांपर्यंत पुढे ढकलले आहेत. परीक्षा व मूल्यमापन संचालक डॉ. प्रफुल्ल साबळे यांनी त्यासंदर्भातील अधिसूचनादेखील जारी केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने अखेर ‘बीएड’च्या २०१९-२० वर्षातील प्रथम सत्राच्या ऑफलाईन परीक्षा परत एकदा ‘पोस्टपोन’ केल्या आहेत. ‘कोरोना’चे आकडे वाढत असल्याने प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे ‘कोरोना’मुळे दुसऱ्यांदा परीक्षा ‘पोस्टपोन’ करावी लागली आहे. जी परीक्षा २०१९ च्या हिवाळ्यात पूर्ण व्हायला पाहिजे होती, ती आता कधी होणार असा प्रश्न विद्यार्थ्यांना पडला आहे.

२०१९-२० मध्ये बी.एड.च्या प्रवेशप्रक्रियेला विलंब झाल्यामुळे हिवाळी २०१९ ची प्रथम सत्राची परीक्षा १६ मार्चला सुरू झाली होती. मात्र, पहिला पेपर होताच ‘लॉकडाऊन’ करण्यात आले. त्यामुळे परीक्षा रद्द करण्यात आली. ही परीक्षा हिवाळी २०१९ ची असल्याने विद्यापीठाला साथ प्रतिबंधक कायद्यानुसार या विद्यार्थ्यांना पुढील वर्गात सरळ प्रवेश देणेही अशक्य आहे. त्यांची प्रथम सत्राच्या परीक्षेचा निकाल जाहीर करून त्या आधारे द्वितीय सत्रातील विद्यार्थ्यांना तिसऱ्या सत्रात प्रमोट करता येणार आहे. त्यामुळे ९ ते ११ नोव्हेंबरदरम्यान परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. परंतु अनेक विद्यार्थी बाहेरगावचे आहेत. आता नागपुरात येऊन परीक्षा कशी द्यायची व त्या कालावधीत रहायचे कुठे हा त्यांच्यासमोर मोठा प्रश्न पडला होता. कोरोनामुळे परीस्थिती नियंत्रित झाल्यावरच विद्यापीठाने परीक्षा घ्यावी अशी मागणी विद्यार्थ्यांकडून केली गेली व विद्यापीठानेदेखील परीक्षा पुढे ढकलली होती.

मनपाकडून विद्यापीठ प्रशासनाला फोन

बुधवारी दुपारी २ वाजता विद्यार्थ्यांचा ‘एज्युकेशनल टेक्नॉलॉजी अ‍ॅन्ड कॉम्प्युटर असिस्टेड इन्स्ट्रक्शन्स’ हा पेपर होता. विद्यार्थी पेपरसाठी परीक्षा केंद्रांवरदेखील पोहोचले. डॉ.बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयच ‘कोरोना’मुळे ‘सील’ करण्यात आल्याने तेथील विद्यार्थ्यांना दुसऱ्या परीक्षा केंद्रांवर हलविण्यासाठी विद्यापीठाने वाहनेदेखील पाठविली. मात्र मनपा प्रशासनाकडून विद्यापीठाला फोन गेला व परीक्षा घेतल्यास ‘कोरोना’च्या नियमावलीचा भंग ठरेल असे सांगण्यात आले. त्यामुळे विद्यापीठाने तातडीने परीक्षा पुढे ढकलण्याचे निर्देश जारी केले, अशी माहिती कुलगुरू डॉ.सुभाष चौधरी यांनी दिली.

टॅग्स :examपरीक्षा