शहरं
Join us  
Trending Stories
1
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
2
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
3
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
4
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
5
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
6
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
7
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
8
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
9
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
10
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
11
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
12
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
13
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
14
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...
15
संजय कपूर यांच्या पार्थिवावर कुठे आणि कधी होणार अंत्यसंस्कार? 'या' कारणामुळे होतोय उशीर
16
Sonam Raghuwanshi: कॉर्पोरेट लूक ते साखरपुड्यातील शृंगार! राजाच्या हत्येतील आरोपी सोनमचे पहिल्यांदाच समोर आले फोटो
17
June Panchak 2025: आजपासून पाच दिवस पंचक योग; महत्त्वाचे काम तसेच प्रवास टाळता आला तर उत्तम!
18
जिओचे नेटवर्क डाऊन झाले! इंटरनेट गायब, कॉल ड्रॉपही...; फायबरचे ग्राहकही वैतागले... 
19
Share Market Update : बाजारात जोरदार तेजी! सेन्सेक्स ८१,००० पार, 'या' शेअर्सनी दिला बंपर रिटर्न! कुठे झाली घसरण?

नागपूर विद्यापीठ; ७१ टक्के महाविद्यालयांत निवडणूक साक्षरता मंडळच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2022 07:00 IST

Nagpur News राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठामधील तब्बल ७१ टक्के महाविद्यालयांमध्ये निवडणूक साक्षरता मंडळच स्थापन झालेले नाही.

ठळक मुद्देराष्ट्रीय मतदार दिवसाचे आयोजन ठरणार केवळ औपचारिकता

योगेश पांडे

नागपूर : युवापिढीमध्ये मतदानाचे महत्त्व जावे व त्यांच्यामध्ये जागृती व्हावी, यासाठी राज्यभरातील महाविद्यालयांमध्ये विविध उपक्रमांचे आयोजन करण्याची सूचना राज्य शासनाने केली आहे. या अनुषंगाने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने महाविद्यालयांमधील निवडणूक साक्षरता मंडळाच्या माध्यमातून कार्यक्रम आयोजित करण्याचे निर्देश दिले आहेत. परंतु, तब्बल ७१ टक्के महाविद्यालयांमध्ये निवडणूक साक्षरता मंडळच स्थापन झालेले नाही. अनेक महाविद्यालयांना तर ही संकल्पनादेखील माहिती नाही. अशा स्थितीत राष्ट्रीय मतदार दिवसाचे आयोजन केवळ औपचारिकताच ठरेल, असे चित्र आहे.

१८ वर्षे पूर्ण केलेल्या नवीन तरुण मतदारांचा मतदार यादीत समावेश करणे तसेच त्यांचा मतदान प्रक्रियेत सहभाग वाढविणे हा याच्यामागे मुख्य उद्देश आहे. विद्यार्थ्यांपर्यंत मतदानाचे महत्त्व पोहोचावे, यासाठी महाविद्यालयांमध्ये विविध उपक्रम आयोजित करण्यात यावेत, असे शासन निर्देश आहेत. हा दिवस साजरा करणे प्रत्येक महाविद्यालयाला अनिवार्य आहे व निवडणूक साक्षरता मंडळांच्या मार्फत कार्यक्रम घ्यावेत, असे पत्रच विद्यार्थी विकास संचालक डॉ. अभय मुदगल यांनी महाविद्यालयांना पाठविले. परंतु, अनेक महाविद्यालयांत निवडणूक साक्षरता मंडळ कागदावरच आहेत. १५ ऑगस्ट २०२१ पर्यंत महाविद्यालयांना निवडणूक साक्षरता मंडळ स्थापन करायचे होते; मात्र अनेक महाविद्यालयांनी कागदावरच मंडळांची स्थापना केली व तसा अहवाल विद्यापीठाला पाठविला. ५०३ पैकी ३५६ महाविद्यालयांनी तर असे मंडळच स्थापन केलेले नाही. ३० डिसेंबर रोजी विद्यापीठाने तातडीचे पत्र पाठविल्यानंतरदेखील बऱ्याच महाविद्यालयांनी यासाठी पुढाकार घेतला नसल्याचे चित्र आहे.

तर महाविद्यालयांवर कारवाई होणार

सर्व महाविद्यालयांत निवडणूक साक्षरता मंडळ स्थापन करण्याबाबत राज्यपालांकडून ७ जुलै २०२१ तर उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडून २३ जुलै २०२१ रोजी विद्यापीठाला पत्र आले होते. १३ ऑगस्ट २०२१ रोजी विद्यापीठातर्फे पत्र जारी झाले. यानुसार महाविद्यालयांमध्ये १५ ऑगस्टपर्यंत निवडणूक साक्षरता मंडळाची स्थापना करावी व विद्यापीठातील नोडल अधिकाऱ्याकडे त्याची जबाबदारी देण्यात यावी, असे निर्देश देण्यात आले. मात्र महाविद्यालयांनी या पत्राला गंभीरतेने घेतलेच नाही. शासनाच्या निर्देशांचे पालन करणे अनिवार्य आहे. ज्या महाविद्यालयांकडून मंडळांची स्थापना होणार नाही व निर्देशांचे पालन होणार नाही, त्यांच्यावर १० विविध प्रकारच्या कारवाया विद्यापीठ करू शकते. त्यात संलग्नता रद्द करणे, दंड इत्यादी प्रकारच्या कारवायांचादेखील समावेश आहे, अशी माहिती डॉ. अभय मुदगल यांनी दिली.

टॅग्स :Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur Universityराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ