शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
4
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
5
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
6
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
7
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
8
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
9
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
10
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
11
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
12
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
13
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
14
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
15
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
16
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
17
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
18
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
19
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
20
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर

नागपुरात लागले ४० हजार एलईडी, मात्र ऊर्जा बचत किती?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2018 12:26 IST

४० हजार म्हणजेच जवळपास ३६ टक्के एलईडी लावण्यात आले. परंतु नेमकी किती बचत होत आहे. याची आकडेवारी विद्युत विभागाकडे अजूनही उपलब्ध नसल्याने ऊर्जा बचतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

ठळक मुद्दे४७० कोटींचा प्रकल्पमनपाच्या विद्युत विभागाकडे माहिती नाही

गणेश हूड।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महापालिकेला पथदिव्यांची देखभाल व दुरुस्ती तसेच वीज बिलावर मोठ्या प्रमाणात खर्च करावा लागतो. या खर्चासोबतच ऊर्जा बचत व्हावी, या हेतूने सोडियम दिव्याऐवजी शहरात १ लाख ३८ हजार हजार एलईडी दिवे लावण्याचा निर्णय चार वर्षापूर्वी घेण्यात आला. यातील ४० हजार म्हणजेच जवळपास ३६ टक्के एलईडी लावण्यात आले. त्यानंतर प्रशासनाच्या दाव्यानुसार ऊर्जा बचत होऊन वीज बिलात कपात अपेक्षित होती. परंतु नेमकी किती बचत होत आहे. याची आकडेवारी विद्युत विभागाकडे अजूनही उपलब्ध नसल्याने ऊर्जा बचतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.शहरातील पददिवे बदलवून एलईडी लावल्यास ६० ते ७० टक्के ऊर्जा बचत होणार आहे. ९९ महिन्यात एलईडी दिवे लावल्यानंतर पुढील ९ वर्षात प्रकल्पावरील संपूर्ण खर्चाची परतफेड होऊन ३५० कोटींची बचत होणार होईल, असा दावा विद्युत विभागाकडून केला जात आहे. त्यानुसार ४० हजार एलईडी लावल्यानंतर वीज बिलात ३५ ते ३६ टक्के कपात अपेक्षित होती. मात्र नेमकी किती बचत होत आहे याची आकडेवारी विभागाकडे नाही. वास्तविक ४७० कोटींचा हा प्रकल्प असून कंत्राटदारांना ५४ हप्त्यांत २७० कोटी द्यायचे आहेत. त्यामुळे प्रकल्प राबविताना ज्या भागात एलईडी लावण्यात आले अशा मार्गावरील पथदिव्यांचे आधी येणारे वीज बिल आताचे बिल याची माहिती तुलनात्मक माहिती अपेक्षित होती. विभागाकडे यासंदर्भात माहिती नसल्याने संभ्रम निर्माण झाला आहे.डिसेंबर २०१८पर्यंत शहरात आणखी ९८ हजार एलईडी मे २०१९ पर्यंत लावण्यात येणार आहेत. यातून ७० टक्के वीज बचतीचा दावा करण्यात आला आहे. डिसेंबर २०१८ पर्यंत दिवे फिटिंगचे काम होणे अपेक्षित होते. मात्र एलईडी दिव्यासंदर्भातील प्रकरण न्यायप्रविष्ट होते. यामुळे काम ठप्प होते.आता याचिका निकाली निघाल्याने उर्वरित दिवे लावण्याचे काम सुरू करण्यात येणार आहे. एलईडी दिवे लावताना ५९ कोटींचा मूलभूत बळकटीकरणाचा प्रकल्पही सोबतच राबविला जाणार आहे. यात खांब उभारणे व केबल टाकण्याचे काम सोबतच केले जात आहे.

४७० कोटींचा प्रकल्पमहापालिकेने २०१४ मध्ये शहरातील विद्यमान पथदिवे बदलवून एलईडी पथदिवे लावण्याचा निर्णय घेतला होता.या प्रकल्पांवर ४७० कोटींचा खर्च अपेक्षित आहे. यात नादुरुस्त केबल बदलणे, तुटलेल्या खांबाच्या ठिकाणी नवीन खांब बसविणे, फिडबॅक देणारे नवीन फिडर बसविणे आदी कामांचा समावेश आहे. मार्च २०१८ पर्यंत हा प्रकल्प पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र विविध अडचणीमुळे प्रकल्प रखडला. ४०हजार एलईडी लावण्यात आले. आणखी ९८ हजार एलईडी लावण्याचे शिल्लक आहे. कामाची गती विचारात घेता मे २०१९ पर्यंत हा प्रकल्प पूर्ण होईल की नाही, याची शाश्वती नाही.

झोननिहाय कंत्राट तरीही विलंब२०१४ मध्ये जे. के. सोल्युशन इंक कंपनीला निर्धारित कालावधीत एलईडी दिवे बसविण्यात अपयश आल्याने या कंपनीचे कंत्राट रद्द करण्यात आले. या कंपनीचा अनुभव विचारात घेता झोननिहाय एलईडी दिवे बसविण्याचे वेगवेगळ्या कंपन्यांना कंत्राट देण्यात आले. त्यानंतरही कामात अद्याप गती आलेली नाही.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिका