शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
2
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
3
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
4
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
5
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
6
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
7
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
8
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
9
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
10
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."
11
नवरात्रीचा मुहूर्त? पंतप्रधान मोदी नव्या ठिकाणाहून कामकाज पाहणार; PMOचा पत्ता बदलणार
12
"भेटायला येतो असा मी मित्रासारखा हट्ट केला होता पण...", प्रियाच्या आठवणीत अभिजीत भावुक
13
Video - पैशांचा पाऊस! चालत्या ट्रेनमधून उडवल्या ५०० च्या नोटा; गोळा करण्यासाठी लोकांची झुंबड
14
बच्चू कडूंना कधीच सोडणार नाही म्हणणारे माजी आमदार सोडून गेले; काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश
15
सारख्या नावाचे दिवस गेले... सेम चेहराही शोधावा लागणार; यापुढे EVM वर उमेदवाराचा रंगीत फोटो छापणार...
16
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”
17
समुद्रात दडलाय सोन्याचा खजिना; किंमत 2000 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त, काढणार कसा?
18
आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर प्राणघातक हल्ला: अनेक पोलिस एम्समध्ये दाखल
19
कार अन् ट्रकचा भीषण अपघात; एकाच कुटुंबातील सात जणांचा जागीच मृत्यू
20
ICC T20I Rankings : नंबर वन अभिषेक शर्मानं साधला मोठा डाव; कॅप्टन सूर्यासह तिलक वर्मा घाट्यात

नागपुरात लागले ४० हजार एलईडी, मात्र ऊर्जा बचत किती?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2018 12:26 IST

४० हजार म्हणजेच जवळपास ३६ टक्के एलईडी लावण्यात आले. परंतु नेमकी किती बचत होत आहे. याची आकडेवारी विद्युत विभागाकडे अजूनही उपलब्ध नसल्याने ऊर्जा बचतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

ठळक मुद्दे४७० कोटींचा प्रकल्पमनपाच्या विद्युत विभागाकडे माहिती नाही

गणेश हूड।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महापालिकेला पथदिव्यांची देखभाल व दुरुस्ती तसेच वीज बिलावर मोठ्या प्रमाणात खर्च करावा लागतो. या खर्चासोबतच ऊर्जा बचत व्हावी, या हेतूने सोडियम दिव्याऐवजी शहरात १ लाख ३८ हजार हजार एलईडी दिवे लावण्याचा निर्णय चार वर्षापूर्वी घेण्यात आला. यातील ४० हजार म्हणजेच जवळपास ३६ टक्के एलईडी लावण्यात आले. त्यानंतर प्रशासनाच्या दाव्यानुसार ऊर्जा बचत होऊन वीज बिलात कपात अपेक्षित होती. परंतु नेमकी किती बचत होत आहे. याची आकडेवारी विद्युत विभागाकडे अजूनही उपलब्ध नसल्याने ऊर्जा बचतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.शहरातील पददिवे बदलवून एलईडी लावल्यास ६० ते ७० टक्के ऊर्जा बचत होणार आहे. ९९ महिन्यात एलईडी दिवे लावल्यानंतर पुढील ९ वर्षात प्रकल्पावरील संपूर्ण खर्चाची परतफेड होऊन ३५० कोटींची बचत होणार होईल, असा दावा विद्युत विभागाकडून केला जात आहे. त्यानुसार ४० हजार एलईडी लावल्यानंतर वीज बिलात ३५ ते ३६ टक्के कपात अपेक्षित होती. मात्र नेमकी किती बचत होत आहे याची आकडेवारी विभागाकडे नाही. वास्तविक ४७० कोटींचा हा प्रकल्प असून कंत्राटदारांना ५४ हप्त्यांत २७० कोटी द्यायचे आहेत. त्यामुळे प्रकल्प राबविताना ज्या भागात एलईडी लावण्यात आले अशा मार्गावरील पथदिव्यांचे आधी येणारे वीज बिल आताचे बिल याची माहिती तुलनात्मक माहिती अपेक्षित होती. विभागाकडे यासंदर्भात माहिती नसल्याने संभ्रम निर्माण झाला आहे.डिसेंबर २०१८पर्यंत शहरात आणखी ९८ हजार एलईडी मे २०१९ पर्यंत लावण्यात येणार आहेत. यातून ७० टक्के वीज बचतीचा दावा करण्यात आला आहे. डिसेंबर २०१८ पर्यंत दिवे फिटिंगचे काम होणे अपेक्षित होते. मात्र एलईडी दिव्यासंदर्भातील प्रकरण न्यायप्रविष्ट होते. यामुळे काम ठप्प होते.आता याचिका निकाली निघाल्याने उर्वरित दिवे लावण्याचे काम सुरू करण्यात येणार आहे. एलईडी दिवे लावताना ५९ कोटींचा मूलभूत बळकटीकरणाचा प्रकल्पही सोबतच राबविला जाणार आहे. यात खांब उभारणे व केबल टाकण्याचे काम सोबतच केले जात आहे.

४७० कोटींचा प्रकल्पमहापालिकेने २०१४ मध्ये शहरातील विद्यमान पथदिवे बदलवून एलईडी पथदिवे लावण्याचा निर्णय घेतला होता.या प्रकल्पांवर ४७० कोटींचा खर्च अपेक्षित आहे. यात नादुरुस्त केबल बदलणे, तुटलेल्या खांबाच्या ठिकाणी नवीन खांब बसविणे, फिडबॅक देणारे नवीन फिडर बसविणे आदी कामांचा समावेश आहे. मार्च २०१८ पर्यंत हा प्रकल्प पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र विविध अडचणीमुळे प्रकल्प रखडला. ४०हजार एलईडी लावण्यात आले. आणखी ९८ हजार एलईडी लावण्याचे शिल्लक आहे. कामाची गती विचारात घेता मे २०१९ पर्यंत हा प्रकल्प पूर्ण होईल की नाही, याची शाश्वती नाही.

झोननिहाय कंत्राट तरीही विलंब२०१४ मध्ये जे. के. सोल्युशन इंक कंपनीला निर्धारित कालावधीत एलईडी दिवे बसविण्यात अपयश आल्याने या कंपनीचे कंत्राट रद्द करण्यात आले. या कंपनीचा अनुभव विचारात घेता झोननिहाय एलईडी दिवे बसविण्याचे वेगवेगळ्या कंपन्यांना कंत्राट देण्यात आले. त्यानंतरही कामात अद्याप गती आलेली नाही.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिका