शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
2
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
3
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
4
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
5
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
6
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
7
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
8
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
9
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
10
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
11
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
12
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
13
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
14
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
15
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
16
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
17
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
18
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
19
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची
20
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...

नागपूर संघभूमी नव्हे दीक्षाभूमीच

By admin | Updated: April 15, 2016 03:07 IST

नागपूर ही संघभूमी असल्याची ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.

कन्हैया कुमार : सक्रिय राजकारणाचे संकेतनागपूर : नागपूर ही संघभूमी असल्याची ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. परंतु प्रत्यक्षात तर नागपूर ही डॉ. आंबेडकरांच्या विचारांनी पवित्र झालेली दीक्षाभूमीच आहे. नागपूर गोळवलकरांचे नव्हे तर डॉ.आंबेडकरांचे आहे, असे प्रतिपादन कन्हैया कुमार याने गुरुवारी केले. धनवटे नॅशनल कॉलेज येथे झालेल्या जाहीर सभेदरम्यान त्याने विविध मुद्दे उचलत केंद्र शासनावर टीका केली.मी नागपुरात कुठलाही संदेश द्यायला आलो नाही, तर डॉ.आंबेडकरांचा संदेश घेण्यासाठी आलो आहे. या मातीत त्यांचे संस्कार आहे. नागपुरात केवळ ‘हाफपॅन्ट’वाले लोक राहत नाहीत, तर पूर्ण डोके असलेल्यादेखील अनेक व्यक्ती आहेत. मी प्रत्येक वर्षी १४ एप्रिल रोजी नागपुरात येईल असे तो म्हणाला. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव घेऊन केंद्र शासनाकडून विविध कार्यक्रम राबविण्यात येत आहेत. परंतु केवळ मतांसाठी हे करण्यात येत आहे. जर खरेच हिंमत असेल तर हिंदुत्ववाद्यांनी मनुस्मृती जाळून दाखवावी, असे आवाहन त्याने केले.विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी ‘जेएनयू’तून सुरू झालेले आंदोलन विविध विद्यापीठांमध्ये पसरले. नागपूर हे देशाचे केंद्रस्थान आहे. नागपुरातदेखील विरोधाचा ‘दांडा’ चालला पाहिजे व सामाजिक न्यायासाठी हे केंद्र व्हावे, असेदेखील तो म्हणाला. कन्हैयाच्या सभेसाठी मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी व डाव्या चळवळीतील कार्यकर्ते आले होते. कार्यक्रम सुरू होण्याअगोदरच सभागृह ‘हाऊसफुल्ल’ झाले होते. (प्रतिनिधी)अनेक जणांना बाहेरच उभे रहावे लागले. (प्रतिनिधी)मोदी ‘आयएसडी’ पंतप्रधानजम्मू-काश्मीरमधील ‘एनआयटी’मध्ये स्थानिक व बाहेरील लोकांमुळे तणाव निर्माण झाला असे केंद्र सरकार म्हणत आहे. नरेंद्र मोदी स्वत: ‘आयएसडी’ पंतप्रधान आहेत. त्यांनी ‘लोकल’ आणि ‘एसटीडी’ असे खेळायला नको, अशी टिप्पणी कन्हैया कुमारने केली. नरेंद्र मोदी यांनी खूप आश्वासने दिली होती. परंतु प्रत्यक्षात त्यांची पूर्तता झाली नाही. केवळ श्रीमंतांसाठी ते काम करत असून गरीब चहावाल्याला मात्र विसरले आहेत.