शहरं
Join us  
Trending Stories
1
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
2
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
3
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
4
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
5
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
6
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
7
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
8
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
9
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
10
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
11
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
12
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
13
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
14
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
15
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
16
रस्ते गिळलेली अतिक्रमणे होणार नियमित; महसूल विभागाचा मोठा निर्णय
17
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
18
सहाव्या वर्षी वडिलांना एक चाल सांगितली अन्...; कोनेरू हम्पीची खास आठवण
19
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
20
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)

नागपूर: पेन्ट्रीकारमध्ये कमी वजनाचे भोजन, मेन्यूकार्डही नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2018 23:08 IST

दपूम रेल्वेच्या नागपूर विभागाचे नवनियुक्त वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक आशुतोष श्रीवास्तव यांनी पदभार स्वीकारल्यानंतर दोन दिवसातच गीतांजली एक्स्प्रेसच्या पेन्ट्रीकारची आकस्मिक पाहणी करून पेन्ट्रीकार व्यवस्थापकाची खरडपट्टी काढली.

ठळक मुद्दे‘आयआरसीटीसी’कडे करणार तक्रारनागपुरात ‘सिनिअर डीसीएम’ची अकस्मात पाहणी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : रेल्वेगाडीच्या पेन्ट्रीकारमध्ये ठराविक वजनापेक्षा कमी वजनाचे भोजन पुरविण्यात येत असल्याची तक्रार नेहमीच रेल्वेचे प्रवासी करतात. पेन्ट्रीकारमध्ये स्वच्छतेचा अभाव असतो, कर्मचाऱ्यांजवळ मेन्यूकार्ड नसते अशीही ओरड होते. परंतु रेल्वे प्रशासनावर या तक्रारींचा कोणताच परिणाम होत नाही. प्रवाशांची ही धारणा बदलविण्यासाठी दपूम रेल्वेच्या नागपूर विभागाचे नवनियुक्त वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक आशुतोष श्रीवास्तव यांनी पदभार स्वीकारल्यानंतर दोन दिवसातच गीतांजली एक्स्प्रेसच्या पेन्ट्रीकारची आकस्मिक पाहणी करून पेन्ट्रीकार व्यवस्थापकाची खरडपट्टी काढली. याबाबत ते आयआरसीटीसीकडे तक्रार करणार आहेत.मिळालेल्या माहितीनुसार, दपूम रेल्वेचे नवनियुक्त वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक आशुतोष श्रीवास्तव यांनी १३ एप्रिलला रेल्वेगाडी क्रमांक १२८५९ गीतांजली एक्स्प्रेसच्या प्रवासादरम्यान अचानक पेन्ट्रीकारचे निरीक्षण केले. त्यांनी स्वच्छता, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, इतर प्रवासी सुविधांसह खाद्यपदार्थ, भोजनाचा तसेच नाश्त्याचा दर्जा, वजन आदींची तपासणी केली. यावेळी त्यांना काही त्रुटी आढळल्या. तपासणीत त्यांना पेन्ट्रीकारमध्ये समाधानकारक स्वच्छता दिसली नाही. पेन्ट्रीकार कर्मचाºयांजवळ मेन्यूकार्ड नव्हते. जनता खाना नव्हते. भोजन दिल्यानंतर बिल देण्याची व्यवस्था नव्हती. पेन्ट्रीकार कर्मचाऱ्यांकडून निर्धारित वजनाऐवजी कमी वजनाचे भोजन, नाश्ता देणे आणि त्यासाठी अधिक रक्कम वसूल करण्यात येत असल्याची बाब त्यांच्या निदर्शनास आली. त्यामुळे त्यांनी पेन्ट्रीकार व्यवस्थापकाची चांगलीच खरडपट्टी काढली. याबाबत ते ‘आयआरसीटीसी’कडे तक्रार करणार आहेत.प्रवाशांनी तक्रार करावीदपूम रेल्वे नागपूर विभागाच्या वाणिज्य विभागाने प्रवाशांना रेल्वे हेल्पलाईनच्या माध्यमातून अशा असुविधांबाबत रेल्वे प्रशासनाला माहिती देऊन प्रवासी सेवांचा दर्जा राखण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.वाणिज्य कर्मचाऱ्यांना सल्लाभविष्यात रेल्वे प्रवाशांना स्वच्छ आणि पौष्टिक आहार ठरवून दिलेल्या दरानुसार उपलब्ध करून देण्याच्या सूचना वाणिज्य विभागाच्या अधिकारी व पर्यवेक्षकांना देण्यात आल्या. सोबतच त्यांना रेल्वे सुविधांचा दर्जा टिकून राहावा यासाठी पेन्ट्रीकारसह इतर प्रवासी सुविधांची नियमित तपासणी करण्याचे निर्देश दिले.‘आयआरसीटीसी’ला देणार अहवाल‘गीतांजली एक्स्प्रेसच्या पेन्ट्रीकारमधील आकस्मिक पाहणीदरम्यान अनेक त्रुटी आढळल्या. पेन्ट्रीकारचे कंत्राट आयआरसीटीसीकडून देण्यात येते. त्यामुळे रेल्वेगाड्यात पुरविण्यात प्रवासी सुविधात त्रुटी राहू नये यासाठी संबंधित कंत्राटदारावर कारवाईसाठी लवकरच याबाबतचा अहवाल छायाचित्रासह ‘आयआरसीटीसी’ला सोपविणार आहोत.- आशुतोष श्रीवास्तव, ‘सिनियर डीसीएम’, दपूम रेल्वे, नागपूर विभाग 

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेNagpur Railway Stationरेल्वे स्टेशन नागपूर