शहरं
Join us  
Trending Stories
1
वैभव खेडेकरांच्या BJP प्रवेशाचा मुहूर्त मिळेना; कार्यकर्त्यांसह मुंबई गाठली पण पक्षप्रवेश नाही
2
"देशी गाय कोणी विकायला निघालं, तर त्याला फाशी द्या"; सदाभाऊ खोत यांची सरकारकडे मागणी, नेमकं काय म्हणाले?
3
भारताने जिंकलेल्या १९८३ वर्ल्डकप फायनलमधील पंच डिकी बर्ड यांचे ९२व्या वर्षी निधन
4
पावसाने झोडपले, शेतकरी संकटात, सरकार कर्जमाफीचा निर्णय कधी घेणार?; एकनाथ शिंदे म्हणाले...
5
“पंचनामे-सर्वे सोडा, ओला दुष्काळ जाहीर करा अन् सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये द्या”: सपकाळ
6
GST कपातीनंतर आता एवढी स्वस्त झालीय ५ स्टार रेटिंग असलेली Tata Punch; जाणून घ्या, कोण कोणत्या कारला देते टक्कर?
7
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांमुळे इमॅन्युएल मॅक्रॉन अडकले ट्रॅफिकमध्ये; फ्रान्सच्या प्रमुखांनी थेट लावला ट्रम्प यांनी फोन
8
"कधीतरी जबाबदारी घ्यायला शिका"; भाजपा खासदाराने ममता बॅनर्जींना सुनावले, म्हणाले- "सतत..."
9
"गर्भवती महिलांना पॅरासिटामॉल गोळीने..."; WHO ने फेटाळून लावला डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
10
फ्लिपकार्ट बिग बिलिअन डेजचा मोठा स्कॅम? अनेकांनी आयफोन १६ ऑर्डर केले, कंपनीने अचानक रद्द केले...
11
चिंताजनक! लहानपणीच्या 'या' छोट्याशा निष्काळजीपणामुळे ५०% वाढतो हृदयरोगाचा धोका
12
गुंडांना आवरा अन्यथा धडा शिकवू, ज्येष्ठ कार्यकर्त्याशी झालेल्या गैरवर्तनावरून काँग्रेसचा भाजपाला इशारा
13
मुलीने पुण्यात मैत्रिणीसोबत बांधली लग्नाची गाठ; आई वडिलांनी लपवून दुसऱ्यांदा तरुणासोबत लावलं लग्न
14
महाराष्ट्रातील पर्यटन स्थळांचा फोटो काढून जिंकू शकता ५ लाख ! कुठे करायचा अपलोड, काय आहे योजना?
15
"फरहानच्या AK47 वर अभिषेक-गिलचं 'ब्रह्मास्त्र' पडलं भारी.."; पाकिस्तानी क्रिकेटरनेच सुनावलं
16
जिच्याशी अफेअर त्या नर्सलाच डॉक्टरने ठार मारले, आधी नशेचं इंजेक्शन दिलं, मग कारखाली चिरडलं  
17
National Film Award: पांढरे केस, गॉगल आणि सूटबूट! राष्ट्रीय पुरस्कारासाठी शाहरुखचा लूक, 'त्या' कृतीने जिंकली मनं
18
वडिलांना आणि भावाला अडकण्यासाठी मुलीने रचला भयानक कट; बॉयफ्रेंडच्या मित्राची हत्या केली अन्...
19
“राज्यातील रस्त्यांच्या देखभाल-दुरुस्तीसाठी १२९६.०५ कोटींचा निधी”: शिवेंद्रसिंहराजे भोसले
20
PAK vs SL : 'डबल पंजा पॅटर्न'मुळे लंकेचा पेपर सोपा! पाकला मात्र नापास होण्याचा धोका!

नागपूरला हवी ब्रॉडगेज मेट्रो, नव्या रेल्वेगाड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2022 07:00 IST

Nagpur News सर्वसामान्य प्रवाशांसाठी जिव्हाळ्याची असलेल्या रेल्वेचे रखडलेले प्रकल्प मार्गी लागून नागपुरातून ब्रॉडगेज रेल्वे तसेच विभागाला नव्या रेल्वेगाड्या मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

ठळक मुद्देरखडलेले प्रकल्प व थर्ड आणि फोर्थ लाईनचा प्रश्न मार्गी लागणे गरजेचे

 

नागपूर : देशाचा अर्थसंकल्प आज, १ फेब्रुवारीला सादर होणार आहे. या अर्थसंकल्पात रेल्वे बजेटही जाहीर होणार आहे. त्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांसाठी जिव्हाळ्याची असलेल्या रेल्वेचे रखडलेले प्रकल्प मार्गी लागून नागपुरातून ब्रॉडगेज रेल्वे तसेच विभागाला नव्या रेल्वेगाड्या मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

नागपूर-सेवाग्राम थर्ड आणि फोर्थ लाईनची घोषणा आठ वर्षांपूर्वी करण्यात आली होती. थर्ड आणि फोर्थ लाईनच्या कामाला सुरुवातही करण्यात आली आहे. परंतु, अद्यापही हे काम पूर्ण झालेले नाही. त्यामुळे नागपूर विभागाला नव्या रेल्वेगाड्या मिळण्यासाठी थर्ड आणि फोर्थ लाईनचा प्रश्न मार्गी लागणे गरजेचे आहे. याशिवाय विदर्भ आणि मराठवाड्याला जोडणाऱ्या वर्धा-यवतमाळ-नांदेड या मार्गासाठी अर्थसंकल्पात ठोस तरतूद करण्याची गरज आहे.

नागपूरवरून ब्रॉडगेज मेट्रो सुरू करण्याची घोषणा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी २०२० मध्ये केली होती. परंतु, अद्यापही ब्रॉडगेज मेट्रो चालविण्याबाबत निर्णय झालेला नाही. ब्रॉडगेज मेट्रो सुरू झाल्यास ग्रामीण भागातील प्रवाशांची सुविधा होणार आहे. त्यामुळे अमरावती, बडनेरा, चंद्रपूर, बुटीबोरी, आमला, काटोल येथे ब्रॉडगेज मेट्रो सुरू करण्याची गरज आहे. नागपूर रेल्वेस्थानकाचा वर्ल्ड क्लास स्टेशन म्हणून विकास करण्याची घोषणा पाच वर्षांपूर्वी करण्यात आली. त्यानुसार इंडियन रेल्वे स्टेशन डेव्हलपमेंट काॅर्पोरेशनकडे हे काम सोपविण्यात आले. परंतु, अद्यापही नागपूरला वर्ल्ड क्लास स्टेशन करण्याबाबत पाऊल उचलण्यात आलेले नाही. त्यामुळे या अर्थसंकल्पात विदर्भातील रखडलेले प्रकल्प मार्गी लागण्याची आणि नव्या रेल्वेगाड्या मिळण्याची अपेक्षा आहे.

या आहेत मागण्या

-वर्धा-यवतमाळ-नांदेड मार्गाच्या कामाला गती

-नागपूर-सेवाग्राम थर्ड, फोर्थ लाईनच्या कामाला गती

-नागपूर स्टेशनचा वर्ल्ड क्लास स्टेशन म्हणून विकास

-बडनेरा येथे कोच तयार करण्याचा कारखाना सुरू करावा

-नागपूर-नागभीड ब्रॉडगेज लाईन सुरू करावी

-इतवारीला पीट लाईन सुरू करावी

-बिलासपूर-नागपूर दरम्यान १६० किलोमीटर वेगाने गाड्या धावणे

-अजनी रेल्वेस्थानकावरून नव्या रेल्वेगाड्या सुरू कराव्यात

नव्या रेल्वेगाड्यांची गरज

नागपूरवरून नवी दिल्ली, मुंबई, कोलकाता, बंगळुरू, गुजरात, तिरुपती, त्रिवेंद्रम येथे थेट रेल्वेगाड्या सुरू करण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून होत आहे. परंतु, आतापर्यंत या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे या अर्थसंकल्पात नागपूरवरून विविध शहरात थेट रेल्वेगाड्या सुरू कराव्यात, अशी मागणी आहे.

रखडलेले प्रकल्प मार्गी लागावेत

‘अर्थसंकल्पात विदर्भातील रेल्वेचे रखडलेले प्रकल्प मार्गी लागावेत ही अपेक्षा आहे. याशिवाय नागपूरवरून नवी दिल्ली, त्रिवेंद्रम, कोलकाता, बंगळुरू, गुजरात येथे थेट रेल्वेगाड्या सुरू करण्याची गरज आहे.’

-प्रवीण डबली, माजी झेड आरयुसीसी सदस्य, दक्षिण पूर्व मध्य रेल्वे

............

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वे