शहरं
Join us  
Trending Stories
1
यश दयालसमोर धोनी ठरला फिका! नो बॉल.. फ्री हिट ट्विस्टनंतरही CSK नं गमावला सामना, RCB टॉपला
2
भारत-पाक सीमेवर मोठी कारवाई, राजस्थानात पाकिस्तानी रेंजर ताब्यात!
3
घरगुती वाद विकोपाला! अकोला येथे दुहेरी खून: पतीकडून पत्नी, सावत्र मुलीची गळा दाबून हत्या
4
रामराजे नाईक-निंबाळकर यांनाही उत्तरे द्यावीच लागणार, मुख्यमंत्र्यांचे यावर बारीक लक्ष- जयकुमार गोरे
5
आयपीएल २०२५ मध्ये युवा फलंदाजांचा दबदबा, आरसीबीविरुद्ध आयुष म्हात्रेचं सुपरफास्ट अर्धशतक
6
अँथनी अल्बानीज पुन्हा होणार ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान! ऐतिहासिक विजयानंतर PM मोदींनी केलं अभिनंदन
7
"भारताला कारवाईचा पूर्ण अधिकार...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर माजी अमेरिकन NSA जॉन बोल्टन स्पष्टच बोलले
8
२१ वर्षीय पोराची कडक फिफ्टी! कोण आहे किंग कोहलीचा नवा ओपनिंग पार्टनर Jacob Bethell?
9
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
10
IPL 2025 : कोहलीनं जिरवली! खलील अहमदनं दुसऱ्याच्या जीवावर असा काढला राग, मग... (VIDEO)
11
नवविवाहितेच्या खून प्रकरणात आरोपी पतीला जन्मठेपेची शिक्षा; १० हजारांचा दंड, लातुरातील घटना
12
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
13
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
14
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
15
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
16
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
17
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
18
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
19
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं
20
मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप

नागपूर हीच माझी जन्मभूमी आणि कर्मभूमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 17:25 IST

Nagpur News Shweta Pendse दोन दिवसापूर्वी ६७व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार- २०१९ची घोषणा झाली. यात उत्कृष्ट मराठी चित्रपट म्हणून ‘बार्डो’ला राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाले. मात्र, हा चित्रपट नागपूरकर कलावंतांशी निगडित आहे, याची माहिती फार थोड्या जणांना आहे.

ठळक मुद्दे राष्ट्रीय पुरस्कार विजेता चित्रपट ‘बार्डो’ची पटकथाकार, संवादलेखिका, गीतकार व अभिनेत्री

अंकिता देशकर

 लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : दोन दिवसापूर्वी ६७व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार- २०१९ची घोषणा झाली. यात उत्कृष्ट मराठी चित्रपट म्हणून ‘बार्डो’ला राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाले. मात्र, हा चित्रपट नागपूरकर कलावंतांशी निगडित आहे, याची माहिती फार थोड्या जणांना आहे. या चित्रपटाची पटकथा, संवाद व गीत नागपुरातील गुणी अभिनेत्री, नाट्यदिग्दर्शक, नाट्यलेखिका डॉ. श्वेता पेंडसे हिने लिहिले आहेत. विशेष म्हणजे, या चित्रपटात तिने भूमिकाही साकारली आहे. याच चित्रपटातील ‘रान पेटलं’ या गाण्यासाठी सावनी रवींद्र या गायिकेला सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिकेचा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आणि हे गाणे श्वेता पेंडसे यांनीच लिहिले आहे.

डॉ. श्वेता पेंडसे यांनी चित्रपटाचे कथाकार व दिग्दर्शक भीमराव मुडे यांच्यासोबत चित्रपटाची पटकथा लिहिली आहे. दहा वर्षापूर्वी मुंबईत स्थायिक झालेल्या श्वेताने लोकमतशी संवाद साधताना ‘नागपूर ही माझी जन्मभूमी आणि हीच माझी कर्मभूमी’ असल्याचे सांगितले. श्वेता यांनी शहरातच रसायनशास्त्रात डॉक्टरेट पूर्ण केले. या चित्रपटातील अनेक लोक नागपूरशी संबंधित असून, त्याचा अभिमान वाटतो.  या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाल्याने उल्हासित झालो आहोत. हा कोण्या एका व्यक्तीचा नव्हे तर सामूहिक प्रयत्नांचा पुरस्कार असल्याची भावना श्वेता पेंडसे यांनी व्यक्त केली. ‘बार्डो’ हा पटकथा लिहिण्याचा दुसरा प्रयत्न आहे. यासोबतच विदर्भाची पार्श्वभूमी असलेले व उच्चारांचा समावेश असलेले गाणे लिहिण्याचा योग मी विदर्भातील असल्यामुळे आला. गीत लिहिण्याचा हा माझा पहिलाच प्रयत्न होता आणि त्याला रोहण-रोहण या अद्भुत संगीतकाराचा स्पर्श झाला आहे. या चित्रपटाला आम्ही आमच्या पोटच्या बाळासारखे साकारले आहे. हा चित्रपट आईन्स्टाईनच्या ‘थेअर ऑफ ड्रीम रिलेटिव्हिटी’ या संकल्पनेवर आधारित आहे. विज्ञान विषयातील माझा अभ्यास चित्रपटाची पटकथा लिहिण्यात लाभदायक ठरल्याचे त्यांनी सांगितले.

‘रान पेटलं’ या गाण्याची पार्श्वभूमी विदर्भाची आहे. त्यासाठी ठराविक लहेजा व भाषेची गरज होती. टीममधूनच हे गाणे कोणीतरी लिहावे, जेणेकरून जिव्हाळा व्यक्त होईल, अशी धारणा प्रत्येकाची होती. मी विदर्भाची असल्याने हे गाणे मला लिहिण्यास सांगितले गेले.

- डॉ. श्वेता पेंडसे, अभिनेत्री, गीतकार, पटकथाकार, संवादलेखिका

 

....................

टॅग्स :bollywoodबॉलिवूड