शहरं
Join us  
Trending Stories
1
3BHK फ्लॅट 'काश्मिरी फळे' ठेवण्याच्या नावाखाली घेतला अन्...; डॉक्टर मुजम्मिलची स्फोटके लपवण्याची सगळी Inside Story
2
रिझवानचा मित्र परवेझला अटक, पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होता, भाऊ आहे सैन्यात
3
भाजपा मुंबई अध्यक्ष अमित साटम यांच्याकडून मराठीची अवहेलना; महापालिकेच्या नियमाला हरताळ, काय घडलं?
4
या इलेक्ट्रीक स्पोर्ट्स कारचे भारतीय दिवाने...! अब्जाधीशही करतायत ४-५ महिन्यांची वेटिंग, लाँच झाल्यापासून...
5
आयपीओंमुळे गुंतवणूकदार मालामाल; ६६ टक्के कंपन्यांनी लिस्टिंगच्या दिवशी दिला दमदार नफा 
6
WPL Mega Auction 2026 : नीता अंबानी थेट हरमनप्रीतसह पोहचल्या शॉपिंगला; असं पहिल्यांदाच घडलं (VIDEO)
7
कोण आहेत पवन नंदा आणि सौम्या सिंह राठौर? WinZO च्या संस्थापकांना अटक, कारण काय?
8
हर्बालाइफचा नवा 'लिफ्ट ऑफ' – शून्य साखर असलेलं, ऊर्जा देणारं इफर्व्हेसंट ड्रिंक, तुमचा दिवस बनवा अधिक जोमदार 
9
“लाडक्या बहिणींची गर्दी म्हणजे शिवसेनेचा विजय निश्चित, धनुष्यबाणाला मतदान करा”: एकनाथ शिंदे
10
Nothing: परवडणाऱ्या किंमतीत प्रीमियम स्मार्टफोन, नथिंग फोन (३ए) लाईट भारतात लॉन्च!
11
"शहाणं समजू नका, दमदाटीचा फुगा कधीतरी फुटतोच"; अनगरातील संघर्षानंतर उज्ज्वला थिटेंच्या पाठीशी अजित पवार
12
काँग्रेसचे अनेक सोशल मीडिया अकाउंट परदेशातून चालवले जातात; संबित पात्रांचा गंभीर आरोप
13
दत्त जयंती २०२५: गुरुलीलामृत ग्रंथ पठण करा, स्वामी सदैव साथ देतील; पाहा, कसे करावे पारायण?
14
Video - "मी आपलं भविष्य...", सरकारी शाळेतील शिक्षिकेची बेरोजगार तरुणांना लग्नाची ऑफर
15
वर्ष संपता संपता २०२५ साठीची बाबा वेंगाची भविष्यवाणी खरी ठरली; अशी घटना घडली की, ठरली 'असाधारण घटनां'पैकी एक
16
टीम इंडियाचा लाजिरवाणा पराभव झाल्यानंतरही सौरव गांगुलीला 'या' गोष्टीचा आनंद, म्हणाला...
17
Mumbai Fraud: मुंबईतील ७२ वर्षीय उद्योजकासोबत ३५ कोटींचा 'शेअर' घोटाळा; कसे लुटले कळूही दिलं नाही
18
दोषमुक्त पंचक २०२५: ५ दिवस अशुभ-अमंगल, ‘ही’ कामे करणे टाळा; कधी संपणार प्रतिकूल काळ?
19
जमीन घोटाळ्याप्रकरणी बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीनांना २१ वर्षांची शिक्षा! मुलगा-मुलीलाही प्रत्येकी ५ वर्षांचा तुरुंगवास
20
सोन्याच्या दरात घसरण, चांदी मात्र सुस्साट... एकाच झटक्यात २७५८ रुपयांची तेजी, पाहा नवी किंमत
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर मनपा सभागृहात नगरसेवकांचा प्रश्न विचारण्याचा अधिकार हिरावला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2017 23:37 IST

महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत प्रश्न विचारण्याचा मूलभूत अधिकार हिरावला गेल्याने नगरसेवकांनी या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

ठळक मुद्देनगरसेवकांची कोंडीसमित्यांनी प्रश्न फेटाळलेविरोधीपक्षांनी नोंदविला निषेध

आॅनलाईन लोकमतनागपूर : महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत नगरसेवकांना प्रश्न विचारावयाचा झाल्यास तो संबंधित विषय समित्यांच्या माध्यमातूनच स्वीकारला जाईल, असा प्रस्ताव महापौरांनी आॅक्टोबरच्या सर्वसाधारण सभेत गोंधळात मंजूर केला होता. बहुसंख्य नगरसेवकांना या प्रस्तावाबाबत अजूनही माहिती नाही. २० नोव्हेंबरला सर्वसाधारण सभा होत आहे. सभेच्या अजेंड्यात समावेश करण्यासाठी पाठविलेले प्रश्न समित्यांनी नाकारल्यानंतर या निर्णयाची सदस्यांना माहिती मिळाली. सभागृहात प्रश्न विचारण्याचा मूलभूत  अधिकार हिरावला गेल्याने नगरसेवकांनी या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.प्रभागातील समस्या, प्रशासनाकडून होणारी अडवणूक, प्रलंबित विकास कामे तसेच मूलभूत समस्या मांडण्याचे सर्वसाधारण सभागृह हे नगरसेवकांचे हक्काचे व्यासपीठ आहे. महापालिका कायद्यानुसार त्यांना हा अधिकार मिळाला आहे. सभागृहात प्रश्न विचारण्याच्या धास्तीने अधिकारी नागरिकांच्या समस्या सोडवितात. परंतु गेल्या सभागृहात झालेल्या निर्णयामुळे नगरसेवकांच्या प्रश्न विचारण्यावर मर्यादा आली आहे.विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी विषय पत्रिके त समावेश करण्यासाठी निगम सचिवांकडे प्रश्न दिले होते. परंतु नगरसेवकांना समित्यांच्या माध्यमातून प्रश्न देण्याचा सल्ला देण्यात आला. त्यानुसार विषय समित्याकडे प्रस्ताव देण्यात आले होते. परंतु समित्यांनी बहुसंख्य प्रस्ताव फेटाळले तर काहींना पुढील सभेच्या कामकाजात विषयाचा समावेश केला जाईल, असे त्यांना सांगण्यात आले.विरोधकांनी केला निषेधपरिवहन विभागाशी संबंधित प्रश्नाचा कामकाजात समावेश व्हावा यासाठी विरोधीपक्षनेते तानाजी वनवे, राष्ट्रवादीचे गटनेते दुनेश्वर पेठे, बसपाचे मोहम्मद जमाल आदींनी शनिवारी परिवहन समितीच्या बैठकीत विभागाशी संबंधित प्रश्न उपस्थित करुन सर्वसाधारण सभेत उपस्थित करण्याची सूचना केली. परंतु समितीकडून हा प्रस्ताव फेटाळण्यात आला. या घटनेचा विरोधी पक्षाच्या नेत्यांनी निषेध केला.नोटीसद्वारे येणारे प्रस्ताव फेटाळलेमहापालिके च्या सर्वसाधारण सभेच्या कामकाजाची नियमावली आहे. याचे प्रारुपही ठरलेले आहे. त्यामुळे सदस्यांनी नियमाला अनुसरून प्रश्न वा सूचना देणे अपेक्षित आहे. विशेष सभेची विषय पत्रिका काढल्यानंतर तातडीचे प्रश्न नगरसेवक नोटीसच्या माध्यमातून सभागृहात प्रश्न उपस्थित करतात. परंतु यावेळी नोटीसद्वारे येणारे सर्व प्रस्ताव फेटाळण्यात आले आहेत. यामुळे नगरसेवकांचा मूलभूत अधिकारच हिरावला गेला.तर सभागृह चालू देणार नाहीसभागृहात प्रश्न विचारण्याचा मूलभूत हक्कच हिरावला जात असेल तर सभागृहाला अर्थच शिल्लक राहणार नाही. त्यामुळे समित्यांच्या माध्यमातूनच नगरसेवकांनी प्रश्न विचारण्याचा घेण्यात आलेला निर्णय सत्ताधाऱ्यांनी मागे घ्यावा. विरोधीपक्षाच्या नेत्यांनी यापूर्वीच या संदर्भात पत्र दिले होते. परंतु ही मागणी फेटाळण्यात आली आहे. अन्यथा सोमवारी सभागृह चालू देणार नाही. असा इशारा विरोधी पक्षाच्या नेत्यांनी दिला आहे.विरोधकांची नाकेबंदीमहापालिकेत भाजापाचे १०८ नगरसेवक आहेत. २९ काँग्रेस तर १० बसपाचे आहेत. शिवसेना २ तर राष्ट्रीवादीचा एक व एक अपक्ष नगरसेवक आहे. सत्तापक्षाचे नगरसेवक सभागृहात प्रश्न मांडत नाही. प्रश्न विचारावयाचाच झाला तर सत्तापक्षाची कोंडी होणार नाही असेच प्रश्न उपस्थित करण्याची मुभा आहे. विरोधी पक्षातही मोजकेच नगरसेवक सभागृहात बोलतात. परंतु काही सदस्यांच्या प्रश्नामुळे सत्तापक्षाची कोंडी होती. यामुळे प्रश्न विचारता येणार नाही. अशी यंत्रणा निर्माण करून विरोधीपक्षाची नाकेबंदी करण्यात आली आहे.

टॅग्स :Politicsराजकारण