शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
2
सरकारांना ईव्हींवर आणखी ऑफर्स द्याव्या लागणार? विक्रीच्या वेगावर निती आयोगाचे वक्तव्य...
3
छोट्या भावावर हात उचलणाऱ्याला कायमचं संपवलं; भावाचा बदला घेणारी २२ वर्षीय 'लेडी डॉन' कोण?
4
नवऱ्याचं पोट फाडलं, मृतदेहावर अ‍ॅसिड ओतलं; बॉयफ्रेंडसाठी तबस्सुमनं गाठला क्रूरतेचा कळस 
5
Jalana: "भाजप प्रवेशाच्या निव्वळ अफवा"; राजेश टोपेंनी चर्चांना दिला पूर्णविराम
6
कथावाचक प्रदीम मिश्रा यांच्या कुबेरेश्वर धाममध्ये चेंगराचेंगरी, २ महिलांचा मृत्यू, अनेकजण जखमी   
7
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
8
Thane: ठाण्यातील प्रतिष्ठित शाळेत ४ वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार, पालकांच्या आरोपानंतर तपास सुरू
9
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
10
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?
11
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीपूर्वी पगारात होणार इतकी वाढ? कोणाला मिळणार फायदा?
12
"Help Me! गर्लफ्रेंडसोबत फिरायला जायचंय..."; बॉयफ्रेंडने लावले UPI स्कॅनर असलेले पोस्टर
13
Mumbai: कबुतरांना दाणे टाकताना रोखलं, वृद्ध व्यक्तीसह त्यांच्या मुलावर लोखंडी रॉडने हल्ला!
14
शर्टचा फोटो, अज्ञात चेहरा...४३४ कोटींच्या एमडी ड्रग्जबाबत खुलासा; कर्नाटकातून मुंबईत कसं यायचे?
15
शांतता अन् निसर्ग सौंदर्याचा अनोखा मिलाफ; बीच लव्हर असाल तर भारतातील 'या' समुद्र किनाऱ्यांना नक्की भेट द्या!
16
"कोण खरा भारतीय, कोण नाही हे कोर्ट ठरवू शकत नाही’’, प्रियंका गांधींनी केला राहुल गांधींचा बचाव
17
ये वर्दी सिर्फ हिंमत नही बलिदान भी मांगती है! फरहान अख्तरच्या '१२० बहादुर'चा टीझर रिलीज
18
राज ठाकरेंशी युतीला कौल? इंडिया-मविआवर पाणी सोडण्याची तयारी? दिल्लीत उद्धव ठाकरेंची परीक्षा
19
Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर
20
मी तिचा पहिला रूग्ण, ती माझी शेवटची डॉक्टर, १३ दिवसांचा ड्रामा नको...; इंजिनिअरनं संपवलं जीवन

‘श्वानदंश’ आकडेवारीत नागपूर मनपाचे ‘गोलमाल’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2018 10:40 IST

उपराजधानीत भटक्या श्वानांची प्रचंड दहशत वाढली असून शहराच्या अनेक भागात तर रात्रीच्या वेळी जाणे फारच कठीण झाले आहे. एकीकडे श्वानांमुळे नागरिक त्रस्त झाले असताना मनपाने मात्र श्वानदंशाच्या आकडेवारीचाच खेळ सुरू केला आहे.

ठळक मुद्देएकाच कालावधीतील दंशांबाबत वेगवेगळी माहितीदोन माहिती अधिकारांतील आकड्यांमध्ये तफावत

योगेश पांडे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : उपराजधानीत भटक्या श्वानांची प्रचंड दहशत वाढली असून शहराच्या अनेक भागात तर रात्रीच्या वेळी जाणे फारच कठीण झाले आहे. एकीकडे श्वानांमुळे नागरिक त्रस्त झाले असताना मनपाने मात्र श्वानदंशाच्या आकडेवारीचाच खेळ सुरू केला आहे. मनपाने स्वत:च्याच आकडेवारीत अवघ्या वर्षभरात हेराफेरी केली असून श्वानदंशांची संख्याच कमी दाखविण्याचा प्रताप केला आहे. त्यामुळे शहरात श्वानदंशाची नेमकी आकडेवारी किती असा प्रश्न उपस्थित झाला आहे. २०१७ व २०१८ मध्ये प्राप्त झालेल्या माहितीच्या अधिकाराच्या आकडेवारीतून मनपाची ही ‘पोलखोल’ झाली आहे.उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी काही दिवसांअगोदर माहिती अधिकारांतर्गत मनपाकडे विचारणा केली होती. २०११ सालापासून किती नागरिकांना श्वानदंश झाला, किती नागरिकांचा यामुळे मृत्यू झाला, मनपाने किती श्वानांची नसबंदी केली इत्यादी प्रश्न त्यांनी विचारले होते. याअगोदर याचसंदर्भात त्यांनी २०१५ व २०१७ मध्येदेखील माहितीच्या अधिकारांतर्गत विचारणा केली होती. मात्र मनपाने यंदा दिलेली आकडेवारी ही २०१५ व २०१७ च्या आकडेवारीपासून पूर्णत: वेगळी आहे. जुन्या आकडेवारीनुसार एप्रिल २०११ ते सप्टेंबर २०१७ या कालावधीत नागपुरातील ७२ हजार ८९२ नागरिकांना श्वानांनी दंश केला होता. मात्र माहिती अधिकारातील नवीन आकडेवारीनुसार नोव्हेंबर २०११ ते जुलै २०१८ या कालावधीत श्वानदंश झालेल्या नागरिकांची आकडेवारी ही अवघी ३१ हजार २५८ इतकी दाखविण्यात आली आहे. दिवसांचा कालावधी लक्षात घेता सप्टेंबर २०१७ नंतर जुलै २०१८ पर्यंत आकडेवारी वाढणे किंवा तेवढीच राहणे अपेक्षित होते. मात्र मनपाच्या आकडेवारीत चक्क ४१ हजार ६३४ नागरिकांची घट झाली आहे. ही टक्केवारी थोडीथोडकी नसून १३३ टक्के इतकी आहे. मनपाने नेमकी आकडेवारीतील गणित का बिघडविले व श्वानदंश झालेल्या नागरिकांची नेमकी संख्या किती असे प्रश्न उपस्थित होत आहेत.

नेमकी खरी माहिती कोणती ?माहितीच्या अधिकाराअंतर्गत नेमकी व अचूक माहिती असणे अपेक्षित असते. मनपाच्या आरोग्य विभागाकडून एकाच कालावधीत संपूर्ण शहरात झालेल्या श्वानदंशाबाबत २०१७ व २०१८ मध्ये वेगवेगळी माहिती देण्यात येत असेल तर हा संभ्रम निर्माण करणारा प्रकार आहे. आता नेमकी खरी माहिती कोणती मानावी, असा प्रश्न अभय कोलारकर यांनी उपस्थित केला.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिका