शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

नागपूर मनपाकडून ‘श्वानदंश’ आकडेवारीचा ‘झोलझाल’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2022 07:15 IST

Nagpur News नागपूर शहरात श्वानदंशाची नेमकी आकडेवारी किती असा प्रश्न उपस्थित झाला आहे. २०२० व २०२२ मध्ये प्राप्त झालेल्या माहितीच्या अधिकाराच्या आकडेवारीतून मनपाची ही ‘पोलखोल’ झाली आहे.

ठळक मुद्देएकाच कालावधीतील दंशांच्या आकड्यात ६७ टक्क्यांचा फरकदोन माहिती अधिकारांतील आकड्यांमध्ये तफावत

योगेश पांडे

नागपूर : उपराजधानीत भटक्या श्वानांची प्रचंड दहशत वाढली असून, शहराच्या अनेक भागात तर रात्रीच्या वेळी जाणे फारच कठीण झाले आहे. एकीकडे श्वानांमुळे नागरिक त्रस्त झाले असताना मनपाने मात्र भटक्या श्वानांच्या दंशाच्या आकडेवारीचाच खेळ सुरूच ठेवला आहे. मनपानेच अवघ्या सव्वा वर्षात २०१९-२० सालच्या स्वत:च्याच आकडेवारीत हेराफेरी केली असून, श्वानदंशांची संख्याच कमी दाखविण्याचा प्रताप केला आहे. त्यामुळे शहरात श्वानदंशाची नेमकी आकडेवारी किती असा प्रश्न उपस्थित झाला आहे. २०२० व २०२२ मध्ये प्राप्त झालेल्या माहितीच्या अधिकाराच्या आकडेवारीतून मनपाची ही ‘पोलखोल’ झाली आहे.

उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी काही दिवसांअगोदर माहिती अधिकाराअंतर्गत मनपाकडे विचारणा केली होती. २०१९-२० सालापासून किती नागरिकांना भटक्या श्वानांचा दंश झाला हे त्यांनी विचारले होते. याअगोदर याचसंदर्भात २०२० मध्येदेखील मनपाने माहितीच्या अधिकारात माहिती दिली होती. दोन्ही माहिती अधिकारांत मनपाच्या आरोग्य विभागाने श्वानदंश झालेल्या नागरिकांची आकडेवारी दिली आहे. मनपाने यंदा दिलेली आकडेवारी ही २०२०च्या आकडेवारीपासून पूर्णत: वेगळी आहे. दोन्ही आकड्यांत तब्बल ११ हजार ५५० इतक्या दंशांची तफावत आहे. विशेष म्हणजे श्वानदंशांच्या आकड्यात वाढ झाली नसून घट झाली आहे. मनपाने नेमके आकडेवारीतील गणित का बिघडविले व श्वानदंश झालेल्या नागरिकांची नेमकी संख्या किती, असे प्रश्न उपस्थित होत आहेत.

मनपाचे अंकगणित की दिशाभूल?

जुन्या आकडेवारीनुसार एप्रिल २०१९ ते मार्च २०२० या कालावधीत नागपुरातील १७ हजार २५१ नागरिकांना भटक्या श्वानांनी दंश केला होता. मात्र माहिती अधिकारातील नवीन आकडेवारीनुसार याच कालावधीत श्वानदंश झालेल्या नागरिकांची आकडेवारी ही अवघी पाच हजार ७०१ इतकी दाखविण्यात आली आहे. श्वानदंशाच्या रुग्णांची आकडेवारी वाढू शकते. मात्र ही संख्या कमी करण्याचे ‘मॅजिक’ मनपाने केले आहे. यामागे मनपाचे अंकगणित आहे, की दिशाभूल असा प्रश्न उपस्थित होत आहे.

नेमकी खरी माहिती कोणती?

माहितीच्या अधिकारांतर्गत नेमकी व अचूक माहिती असणे अपेक्षित असते. मनपाच्या आरोग्य विभागाकडून एकाच कालावधीत झालेल्या संपूर्ण शहरात भटक्या श्वानांच्या दहशतीबाबत वेगवेगळी माहिती देण्यात येत असेल तर हा संभ्रम निर्माण करणारा प्रकार आहे.

टॅग्स :dogकुत्रा