शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
3
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
4
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
5
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
6
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
7
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
8
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
9
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
10
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
11
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
12
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
13
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
14
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
15
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
16
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
17
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
18
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
19
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
20
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

सत्ताबदलानंतर नागपूर मनपाची आर्थिक कोंडी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2019 11:33 IST

राज्यात सत्ताबदल झाल्यास या प्रकल्पांना फटका बसल्यास महापालिकेची आर्थिक कोंडी होण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देविकास प्रकल्पांना फटका बसण्याची शक्यता विशेष अनुदान सुरू राहणार की नाही?

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून नागपूर शहरात हजारो कोटींचे प्रकल्प सुरू आहेत. यात स्मार्ट सिटी प्रकल्प, सिमेंट रस्ते, अमृत योजना, झोपडपट्टी पुनर्वसन, मेट्रो रेल्वे , परिवहन सेवा, भांडेवाडी येथील वेस्ट टू एनर्जी यासह अन्य प्रकल्पांचा समावेश आहे. तर नागनदी प्रदूषण निर्मूलन प्रकल्प प्रकल्प मंजुरीच्या अंतिम टप्प्यात आहे. कें द्र सरकारच्या काही प्रकल्पात राज्य सरकारचा वाटा २५ ते ३० टक्के आहे. तर काही प्रकल्प राज्य सरकारच्या निधीतून राबविले जात आहेत. राज्यात सत्ताबदल झाल्यास या प्रकल्पांना फटका बसल्यास महापालिकेची आर्थिक कोंडी होण्याची शक्यता आहे.केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून शहरातील विकास प्रकल्पांना गती मिळाली. तर काही प्रकल्प मंजुरीच्या अंतिम टप्प्यात आहे. परंतु राज्यातील सत्ताबदलाचा विकास प्रकल्पांवर परिणाम होण्याची शक्यता असल्याने महापालिकेची चिंता वाढली आहे. नागपूर शहरात ३५७७.७७ कोटींचा स्मार्ट सिटी प्रकल्पाचे सुरु झाले आहे. यात केंद्र सरकारचा वाटा ५० टक्के तर राज्य सरकारचा वाटा २५ टक्के वाटा आहे. म्हणजेच ८९४.२५ कोटींचा वाटा राज्य सरकार उचलणार आहे. यातील १९३ कोटी प्राप्त झाले आहे. उर्वरित ७०१ .२५ कोटी राज्य सरकारकडून मिळणे अपेक्षित आहे. शहरातील दुसऱ्या व तिसºया टप्प्यातील सिमेंट रस्ते प्रकल्पात राज्य सरकारचा वाटा २०० कोटींचा आहे. यातील पूर्ण वाटा अजूनही प्राप्त झालेला नाही.स्वच्छ भारत अभियानांतर्गत राबविण्यात येणारया प्रकल्पासाठी केंद्र व राज्य सरकारकडून निधी मिळत आहे. सत्तातरामुळे राज्याकडून मिळणाºया निधीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या कार्यकाळात नागपूर महापालिकेला दर वर्षाला मिळणारे विशेष अनुदान बंद झाले होेते. राज्यात भाजपचे सरकार आल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी बंद अनुदान पुन्हा सुरू केले. यामुळे महापालिकेला दोन टप्प्यात ३०० कोटींचा विशेष निधी प्राप्त झाला. तसेच मागील पाच वर्षांत शासनाकडे थकीत असलेले अनुदान प्राप्त झाले. यामुळे बिकट आर्थिक परिस्थितीचा सामना करीत असलेल्या महापालिकेला मोठा दिलासा मिळाला.

नागनदी प्रकल्पात राज्याचा ६०८ कोटींचा वाटानागनदी प्रदूषण निर्मंूलन प्रकल्प अंतिम टप्प्यात आहे. जानेवारी २०२० पासून या प्रकल्पाचे काम सुरू होणार आहे. २४३४ कोटींच्या या प्रकल्पात केंद्र सरकारचा वाटा ६० टक्के असून महापालिकेचा १५ टक्के तर राज्य सरकारचा वाटा २५ टक्के आहे. म्हणजेच राज्य सरकार ६०८.५ कोटींचा वाटा उचलणार आहे. राज्यात सत्ताबदल झाल्यास राज्याकडून हा वाटा उचलला जाणार की नाही. अशी शंका निर्माण झाली आहे. यामुळे पदाधिकारी व प्रशासनाची चिंता वाढली आहे.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिका