शहरं
Join us  
Trending Stories
1
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', ऑपरेशन सिंदूरवरुन PM मोदींची बोचरी टीका
2
"लाल किल्ल्यावर भगवा फडकवा पण तिरंगा मानलाच पाहिजे"; संभाजी भिडेंच्या विधानाची चर्चा
3
TCS ऑफिसबाहेर फुटपाथवरच झोपला कर्मचारी, थकीत सॅलरीवरून वाद; टाटा कंपनीनं मौन सोडलं
4
राज ठाकरे म्हणाले, आपलीच सत्ता येणार; पण कशी? उद्धवसेनेशी युती करून की स्वबळावर?
5
शिंदेसेनेत प्रवेश करणाऱ्या नेत्याचा प्रताप; पक्षप्रवेशात ४०-५० नावे बोगस निघाली, प्रकरण काय?
6
धाराशिव हादरले! जुन्या वादातून महाकाली कलाकेंद्र परिसरात गोळीबार, एक जखमी
7
पत्नीशी झाला वाद, पित्याने दोन चिमुकल्यांवर काढला राग! मुलांना वाहत्या नदीत फेकलं अन्...
8
'मस्त राहा, सगळं मस्तच होईल' प्रेमानंद महाराजांनी सांगितले आनंदी जीवनाचे ६ मार्ग!
9
चक्क २० वर्षीय युवकानं बनवला स्वत:चा देश, ४०० जणांना दिलं नागरिकत्व; युरोपियन देश अवाक् झाले
10
Aditya Infotech IPO Listing: ५१% प्रीमिअमवर लिस्ट झाला 'हा' IPO; गुंतवणुकदारांवर पैशांचा पाऊस, एन्ट्री घेताच खरेदीसाठी उड्या
11
बापरे! हे तर भलतेच...! इलेक्ट्रीक कार जास्त प्रदूषण करतात; पेट्रोल, डिझेलशी तुलना कराल तर...थक्क व्हाल
12
स्वप्न साकार! वडील भाजी विकायचे, आईने गहाण ठेवले दागिने; लेकीने केलं कष्टाचं सोनं
13
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
14
"कोणी तुम्हाला इच्छेविरोधात हात...", तसल्या सीनबद्दलच्या दृष्टिकोनावर काय म्हणाली मराठी अभिनेत्री?
15
मध्यमवर्गीयांची धाव SIP पर्यंत; पण, देशातील सर्वात श्रीमंत १% लोक करतात 'या' २ गोष्टीत सर्वाधिक गुंतवणूक
16
"लॉकेट आणलंय, डोळे बंद कर"; पत्नीने सरप्राइजसाठी डोळे बंद करताच पती झाला राक्षस, केले २० वार!
17
"भाऊ, मी यावेळी राखी बांधू शकणार नाही"; पती आणि सासरच्यांना कंटाळून महिलेने संपवलं जीवन
18
चातुर्मासातील पहिला बुध प्रदोष: कसे करावे व्रत? ‘या’ मंत्रांचा जप करा, महादेव शुभच करतील!
19
इथेनॉल मिश्रित पेट्रोल वाहनांचे इंजिन, मायलेजवर परिणाम करते? लोकांमध्ये दावे सुरु होताच मंत्रालयाने केला खुलासा...
20
गुंतवणूकदारांसाठी 'सुवर्ण संधी'! 'हे' ५ स्टॉक खरेदी करण्याचा ब्रोकरेज फर्मचा सल्ला, काय आहे टार्गेट प्राइस?

नागपूर मनपा अर्थसंकल्पाला मंजुरी नसल्याने विकासाला ब्रेक !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2018 00:55 IST

शहरातील नागरिकांनी विकासावर विश्वास ठेवून भाजपाच्या १०८ नगसेवकांना निवडून दिले. सलग तिसऱ्यांना भाजपाची महापालिकेत सत्ता आली. केंद्रात व राज्यात सत्ता असल्याने शहर विकासासाठी महापालिकेची सत्ताही भाजपाच्याच हाती सोपविली. परंतु शहरात गडर लाईल, चेंबर, खड्ड्यांची दुरुस्ती अशी साधी कामे होत नसल्याचे चित्र आहे. स्थायी समितीच्या अर्थसंकल्पानंतर विकास कामांना गती मिळेल, अशी आशा होती. मात्र अर्थसंकल्पाला अद्याप आयुक्तांची मंजुरी मिळालेली नाही. मंजुरीशिवाय अर्थसंकल्पाची अंमलबजावणी करता येत नसल्याने शहरातील विकास कामांना बे्रक लागले आहेत.

ठळक मुद्देमहिना उलटला तरी आयुक्तांची स्वाक्षरी नाही

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहरातील नागरिकांनी विकासावर विश्वास ठेवून भाजपाच्या १०८ नगसेवकांना निवडून दिले. सलग तिसऱ्यांना भाजपाची महापालिकेत सत्ता आली. केंद्रात व राज्यात सत्ता असल्याने शहर विकासासाठी महापालिकेची सत्ताही भाजपाच्याच हाती सोपविली. परंतु शहरात गडर लाईल, चेंबर, खड्ड्यांची दुरुस्ती अशी साधी कामे होत नसल्याचे चित्र आहे. स्थायी समितीच्या अर्थसंकल्पानंतर विकास कामांना गती मिळेल, अशी आशा होती. मात्र अर्थसंकल्पाला अद्याप आयुक्तांची मंजुरी मिळालेली नाही. मंजुरीशिवाय अर्थसंकल्पाची अंमलबजावणी करता येत नसल्याने शहरातील विकास कामांना बे्रक लागले आहेत.स्थायी समितीचे अध्यक्ष वीरेंद्र कुकरेजा यांनी ११ जूनला वर्ष २०१८-१९ चा २९४६ क ोटींचा अर्थसंकल्प सादर केला. गेल्या वर्षाच्या तुलनेत अर्थसंकल्प ६७४.०३ कोटींनी अधिक आहे. असे असूनही नवीन कोणतीही योजना नाही. अर्थसंकल्पातील उत्पन्नाचे उद्दिष्ट गाठण्यासाठी नियोजन करण्याचा दावा स्थायी समितीचे अध्यक्ष वीरेंद्र कुकरेजा यांनी केला होता. मालमत्ता करातून ५०९ कोटींच्या वसुलीचे लक्ष ठेवले होते. परंतु सुरुवातीच्या तीन महिन्यात वसुली उद्दिष्टाच्या बरीच मागे आहे. गेल्या वर्षात जोर लावल्यानंतरही महापालिकेच्या तिजोरीत १७५० कोटंींचाच महसूल जमा झाला होता. अनुदानाच्या बळावर अर्थसंकल्प फुगवला असल्याने आयुक्त वीरेंद्र सिंह नाराज असल्याची माहिती आहे. वास्तविक अर्थसंकल्पाला कात्री लावण्याचे त्यांना अधिकार आहेत. त्यानुसार डिसेंबर-जानेवारी महिन्यात ते अर्थसंकल्पाला कात्री लावू शकतात. परंतु मंजुरीला विलंब होत असल्याने मूलभूत सुविधांच्या कामावर परिणाम झाला आहे. दीड वर्षानंतरही प्रभागातील कामांना गती मिळालेली नाही. विरोधी पक्षाचेच नाही तर सत्तापक्षाच्या नगरसेवकांनाही प्रशासन जुमानत नसल्याने नगरसेवक हतबल आहेत.सहा महिन्यांपासून कामे ठप्पआयुक्तांच्या कात्रीनंतर विकास कामांवर परिणाम होतो. प्रभाग व झोन स्तरावरील कामे बंद पडतात. ज्या कामांना निधी उपलब्ध असतो. अशीच कामे सुरू असतात. त्यामुळे फेब्रुवारी महिन्यापासून कामे ठप्पच आहेत. मार्च महिन्यात स्थायी समिती अध्यक्षांची निवड करण्यात आली. त्यानंतर जून महिन्यात अर्थसंकल्प सादर करण्यात आला.या घडामोडीमुळे फेबु्रवारी ते जुलै दरम्यान विकास कामे ठप्पच आहेत. आता पावसाळ्यामुळे सुरू असल्याने सुरू असलेली कामेही बंदच आहेत.फाईल मंजुरीचा कालावधीजुलै ते सप्टेंबर या कालावधीत विकास कामांच्या फाईलला मंजुरी घेतली जाते. निविदा प्रक्रिया व कार्यादेश दिले जातात. प्रभाग व वॉर्ड निधीतून प्राधान्यक्रम ठरविला जातो. सप्टेंबर-आॅक्टोबर महिन्यात कामे सुरू होतात. परंतु यावेळी अर्थसंकल्पाला मंजुरी नसल्याने ही प्रक्रि या थांबली आहे.लवकरच मंजुरी मिळेलस्थायी समितीच्या अर्थसंकल्पाला सभागृहाची मंजुरी मिळालेली आहे. आयुक्तांनी त्यावर स्वाक्षरी करताच अंमलबजावणी सुरू होईल. काही मुद्यावर आयुक्तांसोबत चर्चा व्हायची होती, ती आता झाली आहे. लवकरच आयुक्त अर्थसंकल्पाला मंजुरी देतील. विकास कामे थांबलेली नाही. जी आधीच मंजूर आहेत ती कामे सुरू आहेत. नवीन कामे अर्थसंकल्पाच्या मंजुरीनंतर सुरू होतील.वीरेंद्र कुकरेजा, अध्यक्ष स्थायी समिती

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाBudgetअर्थसंकल्प