शहरं
Join us  
Trending Stories
1
देशात 'अल-कायदा'चे स्लीपर सेल? NIAने ५ राज्यांत १० ठिकाणी छापे टाकले; गुजरात कनेक्शनमुळे खळबळ
2
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
3
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
4
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
5
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
6
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
7
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
8
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
9
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
10
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
11
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
12
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
13
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
14
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
15
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
16
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
17
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
18
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
19
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
20
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...

नागपूरची वीजहानी राज्यात सर्वात कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2018 11:52 IST

आर्थिक वर्ष २०१७-१८ मध्ये नागपूर परिमंडळाने केलेल्या दमदार कामगिरीमुळे येथील वीजहानी ०.७७ टक्के कमी करण्यात यश मिळवीत सर्वात कमी वीजहानी असलेल्या परिमंडळांच्या यादीत ७.०४ टक्के वीजहानीसह राज्यात अव्वल स्थान पटकाविले आहे.

ठळक मुद्देपुणे-भांडुप-कल्याणला टाकले मागे वीजचोरीविरोधात आक्रमक भूमिका

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महावितरणच्या नागपूर परिमंडळाची (वर्धा आणि नागपूर जिल्हा) वीजहानी राज्यात सर्वात कमी आहे. आर्थिक वर्ष २०१७-१८ मध्ये नागपूर परिमंडळाने केलेल्या दमदार कामगिरीमुळे येथील वीजहानी ०.७७ टक्के कमी करण्यात यश मिळवीत सर्वात कमी वीजहानी असलेल्या परिमंडळांच्या यादीत ७.०४ टक्के वीजहानीसह राज्यात अव्वल स्थान पटकाविले आहे. इतकेच नव्हे तर पुणे, भांडुप आणि कल्याण यासारख्या सशक्त परिमंडळांनाही मागे टाकले आहे.नागपूर परिमंडळाने आर्थिक वर्ष २०१७-१८ मध्ये वीज बिल वसुली आणि थकबाकीदार वीजग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात मिळविलेले यश, वीजचोरीविरोधात सातत्याने आक्रमक भूमिका यासारख्या विविध आघाड्यांवर केलेल्या उपाययोजनांचे फलित म्हणजे परिमंडळाच्या हानीत तब्बल ०.७७ टक्क्याने घट झाली आहे. आर्थिक वर्ष २०१६-१७ च्या तुलनेत आर्थिक वर्ष २०१७-१८ मध्ये नागपूर परिमंडळाला होणाऱ्या वीजपुरवठ्यात ६.२५ टक्क्यांनी वाढ झाली आहे तर त्यातुलनेत उच्चदाब वीजविक्री ९.६५ टक्क्यांनी वाढली आहे; याशिवाय लघुदाब गैरकृषी वीजविक्री २ टक्क्यांनी वाढली आहे तर कृषिपंपाकरिताची वीजविक्री ६.७० टक्क्यांनी वाढली आहे, अशाप्रकारे नागपूर परिमंडळाची एकूण वीजविक्री आर्थिक वर्ष २०१६-१७ च्या तुलनेत आर्थिक वर्ष २०१७-१८ मध्ये तब्बल ७.१४ टक्क्यांनी वाढली आहे.नागपूर परिमंडळासोबतच नागपूर परिक्षेत्रातील पाचही परिमंडळांनी वीजहानी कमी करण्यात यश मिळविले आहे. यात अकोलाची वीजहानी २.६४ टक्क्यांनी कमी होऊन १९.९१ टक्के झाली आहे तर अमरावती वीजहानी १.१९ टक्क्यांनी कमी होऊन १५.८० टक्के झाली आहे. याशिवाय चंद्र्रपूरची वीजहानी ०.४१ टक्क्यांनी कमी होऊन १०.७३ टक्के तर गोंदियाची वीजहानी ०.६० टक्क्यांनी कमी होऊन १५.५३ टक्क्यांवर आली आहे.

यावर्षीही वीजहानी कमी राहणारनागपूर जिल्ह्याने विजेच्या बाबतीत राज्याला एक आदर्श उदाहरण घालून द्यावे, याबाबत ऊर्जामंत्री बावनकुळे यांचा नेहमीच कटाक्ष असतो. त्यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळेच हे यश मिळाले आहे. नागपूर शहरातील तीन विभाग फ्रेंचायसीला मे २०११ मध्ये देण्यात आले, त्यावेळी ३५ टक्क्यांहून अधिक वीजहानी होती. ती २०१६-१७ मध्ये १५.६१ टक्क्यांवर आली तर २०१७-१८ साली वीजहानी १४.६३ टक्क्यांवर आली. आर्थिक वर्ष २०१८-१९ मध्येही फ्रेंचायसीसह नागपूर परिमंडळाची वीजहानी राज्यात सर्वाधिक कमी राहील, असा विश्वास नागपूर परिमंडळाचे मुख्य अभियंता दिलीप घुगल यांनी व्यक्त केला आहे.

टॅग्स :electricityवीज