शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
2
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
3
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
4
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
5
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन
6
“बॅगवरचा फोटो कसला पाहता, मदत पाहा”; एकनाथ शिंदे शेतकऱ्यांच्या बांधावर, केली नुकसानीची पाहणी
7
बापासमोरच दोन वर्षाच्या मुलाला जबड्यात धरून बिबट्या पसार; १५० जवानांकडून शोधमोहिम, मृतदेह सापडला
8
आपली मुलगी राजकारणात येणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले, म्हणाले...
9
लवकरच बाजारात येतेय Toyota ची Mini Fortuner! महाराष्ट्रातल्या 'या' शहरात होणार उत्पादन; किती असू शकते किंमत? जाणून घ्या
10
तंत्रज्ञानाची किमया! सॅमसंगने AI Home केलं लाँच; आता घर होईल स्मार्ट, फक्त एक क्लिक अन्...
11
तांत्रिक बिघाड की मोसादचा हात? संयुक्त राष्ट्रांत पॅलेस्टाईनवर चर्चा होताच ४ बड्या नेत्यांचा माईक बंद  
12
पद्मश्री ज्येष्ठ लेखक एस. एल. भैरप्पा काळाच्या पडद्याआड; पंतप्रधान मोदींसह राष्ट्रपतींनी वाहिली श्रद्धांजली
13
लडाखमधील आंदोलनाला हिंसक वळण, जाळपोळ, लेहमध्ये ४ जणांचा मृत्यू, ७० जण जखमी 
14
हलगर्जीपणाचा कळस! सरकारी रुग्णालयात दुसऱ्याच पायाची सर्जरी, ऑक्सिजन मास्क काढला अन्...
15
"फायनलमध्ये बघून घेऊ’’, दोन वेळा मार खाल्यानंतर शाहीन शाह आफ्रिदीचं भारताला आव्हान    
16
समस्या संपतील, स्वामी कायम सोबत असतील; ९ गुरुवार व्रताने बदल नक्की दिसतील, अशक्य शक्य होईल!
17
जीएसटीमुळे वाहनांच्या किंमतीच नाही, RTO Tax देखील कमी झाला; तिहेरी फायदा कोणालाच कळला नाही...
18
समृद्धी महामार्गावर दुहेरी उत्पन्नाचा स्रोत; सौरऊर्जा निर्मिती करणारा देशातील पहिला 'एक्सप्रेसवे' !
19
Swami Chaitanya Saraswati: 'माझ्या खोलीत ये, तुला...'; स्वामी चैतन्यानंद सरस्वतीचे 'अश्लील कारनामे', व्हॉटसअप चॅटमध्ये काय?
20
आयटी-मेटलसह 'या' क्षेत्रातील शेअर्समध्ये मोठी पडझड; गुंतवणूकदारांचे ३ लाख कोटी रुपये बुडाले

नागपूरची वीजहानी राज्यात सर्वात कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2018 11:52 IST

आर्थिक वर्ष २०१७-१८ मध्ये नागपूर परिमंडळाने केलेल्या दमदार कामगिरीमुळे येथील वीजहानी ०.७७ टक्के कमी करण्यात यश मिळवीत सर्वात कमी वीजहानी असलेल्या परिमंडळांच्या यादीत ७.०४ टक्के वीजहानीसह राज्यात अव्वल स्थान पटकाविले आहे.

ठळक मुद्देपुणे-भांडुप-कल्याणला टाकले मागे वीजचोरीविरोधात आक्रमक भूमिका

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महावितरणच्या नागपूर परिमंडळाची (वर्धा आणि नागपूर जिल्हा) वीजहानी राज्यात सर्वात कमी आहे. आर्थिक वर्ष २०१७-१८ मध्ये नागपूर परिमंडळाने केलेल्या दमदार कामगिरीमुळे येथील वीजहानी ०.७७ टक्के कमी करण्यात यश मिळवीत सर्वात कमी वीजहानी असलेल्या परिमंडळांच्या यादीत ७.०४ टक्के वीजहानीसह राज्यात अव्वल स्थान पटकाविले आहे. इतकेच नव्हे तर पुणे, भांडुप आणि कल्याण यासारख्या सशक्त परिमंडळांनाही मागे टाकले आहे.नागपूर परिमंडळाने आर्थिक वर्ष २०१७-१८ मध्ये वीज बिल वसुली आणि थकबाकीदार वीजग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात मिळविलेले यश, वीजचोरीविरोधात सातत्याने आक्रमक भूमिका यासारख्या विविध आघाड्यांवर केलेल्या उपाययोजनांचे फलित म्हणजे परिमंडळाच्या हानीत तब्बल ०.७७ टक्क्याने घट झाली आहे. आर्थिक वर्ष २०१६-१७ च्या तुलनेत आर्थिक वर्ष २०१७-१८ मध्ये नागपूर परिमंडळाला होणाऱ्या वीजपुरवठ्यात ६.२५ टक्क्यांनी वाढ झाली आहे तर त्यातुलनेत उच्चदाब वीजविक्री ९.६५ टक्क्यांनी वाढली आहे; याशिवाय लघुदाब गैरकृषी वीजविक्री २ टक्क्यांनी वाढली आहे तर कृषिपंपाकरिताची वीजविक्री ६.७० टक्क्यांनी वाढली आहे, अशाप्रकारे नागपूर परिमंडळाची एकूण वीजविक्री आर्थिक वर्ष २०१६-१७ च्या तुलनेत आर्थिक वर्ष २०१७-१८ मध्ये तब्बल ७.१४ टक्क्यांनी वाढली आहे.नागपूर परिमंडळासोबतच नागपूर परिक्षेत्रातील पाचही परिमंडळांनी वीजहानी कमी करण्यात यश मिळविले आहे. यात अकोलाची वीजहानी २.६४ टक्क्यांनी कमी होऊन १९.९१ टक्के झाली आहे तर अमरावती वीजहानी १.१९ टक्क्यांनी कमी होऊन १५.८० टक्के झाली आहे. याशिवाय चंद्र्रपूरची वीजहानी ०.४१ टक्क्यांनी कमी होऊन १०.७३ टक्के तर गोंदियाची वीजहानी ०.६० टक्क्यांनी कमी होऊन १५.५३ टक्क्यांवर आली आहे.

यावर्षीही वीजहानी कमी राहणारनागपूर जिल्ह्याने विजेच्या बाबतीत राज्याला एक आदर्श उदाहरण घालून द्यावे, याबाबत ऊर्जामंत्री बावनकुळे यांचा नेहमीच कटाक्ष असतो. त्यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळेच हे यश मिळाले आहे. नागपूर शहरातील तीन विभाग फ्रेंचायसीला मे २०११ मध्ये देण्यात आले, त्यावेळी ३५ टक्क्यांहून अधिक वीजहानी होती. ती २०१६-१७ मध्ये १५.६१ टक्क्यांवर आली तर २०१७-१८ साली वीजहानी १४.६३ टक्क्यांवर आली. आर्थिक वर्ष २०१८-१९ मध्येही फ्रेंचायसीसह नागपूर परिमंडळाची वीजहानी राज्यात सर्वाधिक कमी राहील, असा विश्वास नागपूर परिमंडळाचे मुख्य अभियंता दिलीप घुगल यांनी व्यक्त केला आहे.

टॅग्स :electricityवीज