शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
2
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
3
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
4
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
5
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
6
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
7
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
8
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
9
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
10
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
11
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
12
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
13
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
14
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
15
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!
16
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
17
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
18
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
19
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
20
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू

नागपूर लोकसभा निवडणूक निकाल २०१९; जनतेने दाखविलेल्या विश्वासाबद्दल ऋणी आहे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2019 16:59 IST

लोकसभेसाठी झालेल्या मतदानाच्या मोजणीतल्या पाचव्या फेरीतच ६८ हजारांची आघाडी घेतलेले भाजपचे उमेदवार नितीन गडकरी यांनी काही वेळापूर्वीच नागपुरात पत्रकारांशी बातचीत केली. त्याचा गोषवारा देत आहोत.

ठळक मुद्देकटुता विसरून पुन्हा सगळे मिळून काम करायला हवे

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: लोकसभेसाठी झालेल्या मतदानाच्या मोजणीतल्या पाचव्या फेरीतच ६८ हजारांची आघाडी घेतलेले भाजपचे उमेदवार नितीन गडकरी यांनी काही वेळापूर्वीच नागपुरात पत्रकारांशी बातचीत केली. त्याचा गोषवारा देत आहोत.देशाच्या विकासासाठी जनतेने भारतीय जनता पार्टीला जी पुन्हा संधी दिली त्याबद्दल मी देशाच्या जनतेचा मनापासून आभारी आहे. गेल्या पन्नास वर्षात जे झालं नाही ते मोदींच्या सरकारने करून दाखवलं. येत्या काळात भारत निश्चितच जगातली एक मोठी आर्थिक सत्ता बनेल. यात शेतकरी, मजूर, गरीब वर्ग, वंचित घटक यांचा विचार प्रामुख्याने केला जाईल.नागपूरच्या जनतेने माझ्यावर पुन्हा एकदा विश्वास टाकला त्याकरिताही मी जनतेचा आभारी आहे. लोकशाहीत या कौलाला स्वीकारणे गरजेचे आहे.निवडणूक आयोगाने निष्पक्ष निवडणुका घेतल्या आहेत. मात्र आपल्याकडे पद्धत आहे की, जिंकली तर जनतेचा कौल आणि पराभव झाला तर इव्हीएम घोटाळा म्हणायचे. पण जनतेचा कौल सर्वांनी स्वीकारावा. निवडणुका हा लोकशाहीचा मोठा उत्सव आहे. त्यात मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले. मी विरोधी पक्षात काम केलं आहे. ती भूमिका निभवावी लागते. त्यामुळे कुणी संन्यास घेण्याची भाषा करू नये. पुढे सगळ््यांनीच मिळून काम करायचं आहे.काँग्रेसचे उमेदवार नाना पटोले यांनी मतमोजणीबाबत घेतलेल्या आक्षेपाविषयी विचारलेल्या प्रश्नाला, त्यांनी आपल्याला काहीच म्हणायचं नाही असे उत्तर दिले.यंदा निवडणुकीतील प्रचारात भाषेचा स्तर खाली आल्याकडे लक्ष वेधले तेव्हा त्यांनी, जनता दोन्ही पक्षांचे ऐकून निर्णय देत असते, मात्र गुणात्मक सुधारणेसाठी सर्वांनी पालन करावे. पंतप्रधान चोर आहे, अशा प्रकारची भाषा योग्य नाही.२०१४ मध्ये नागरिकांत नाराजी होती. त्यामुळे त्यांनी नरेंद्र मोदी यांची निवड केली. मोदी सरकारने गेल्या पाच वर्षात एक स्थिर सरकार देशाला दिलं आहे. हे सरकार विकासाभिमुख आहे. आम्ही विदर्भातील पाण्याचा मुख्य प्रश्न येत्या काळात हाताळणार आहोत, असे त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरादाखल मत व्यक्त केले.

 

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकालNitin Gadkariनितीन गडकरी