शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

नागपुरात गुंतवणूकदारांची चार वर्षात ३६८ कोटी रुपयांनी फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2019 00:08 IST

गेल्या चार वर्षात नागपुरात ७५ आर्थिक गुन्हे नोंदविण्यात आले असून त्यामध्ये ५७ हजार ९०४ गुंतवणूकदारांची एकूण ३६८ कोटी ३८ लाख ८९ हजार ९८९ रुपयांनी फसवणूक झाली आहे. यापैकी केवळ १४७ कोटी ४५ लाख ५० हजार ९३४ रुपयेच गुन्हेगारांकडून वसूल झाले आहेत.

ठळक मुद्दे७५ गुन्ह्यांची नोंद : १३८ आरोपींना अटक, ३३ गुन्हे न्यायप्रविष्ट

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गेल्या चार वर्षात नागपुरात ७५ आर्थिक गुन्हे नोंदविण्यात आले असून त्यामध्ये ५७ हजार ९०४ गुंतवणूकदारांची एकूण ३६८ कोटी ३८ लाख ८९ हजार ९८९ रुपयांनी फसवणूक झाली आहे. यापैकी केवळ १४७ कोटी ४५ लाख ५० हजार ९३४ रुपयेच गुन्हेगारांकडून वसूल झाले आहेत.गुन्हे शाखेच्या आर्थिक कक्षाने माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांना माहितीच्या अधिकारांतर्गत दिलेल्या माहितीतून ही धक्कादायक बाब प्रकाशात आली आहे. ही माहिती १ जानेवारी २०१५ ते २८ फेब्रुवारी २०१९ या कालावधीतील आहे. इतर माहितीनुसार, ७५ पैकी १२ आर्थिक गुन्हे बँकांशी संबंधित आहेत. तक्रारीनंतर पोलिसांनी अरविंद सहकारी बँक, एलिना एम्प्लॉयमेंट रिसोर्स फार्म, वासनकार इन्व्हेंस्टमेन्ट, शिक्षक सहकारी बँक, शेयर्स मार्के ट, शिष्यवृत्ती, व्ही. व्ही. इन्व्हेस्टमेन्ट, व्हिनस एफ. एक्स. कंपनी, बिट क्वाईन, साई प्रकाश डेव्हलपमेन्ट, क्यू नेट विहान, ढोकेश्वर क्रेडिट सोसायटी, गांडुळ खत प्रकल्प, समृद्धी जीवन सोसायटी आदींशी संबंधित १३८ आरोपींना अटक केली. सध्या ३३ गुन्हे न्यायप्रविष्ट आहेत. महिला व समता सहकारी बँक घोटाळ्यात किती रक्कम वसूल करण्यात आली व किती आरोपींना अटक करण्यात आली याची माहिती अनुपलब्ध असल्याचे सांगण्यात आले.

टॅग्स :InvestmentगुंतवणूकfraudधोकेबाजीRTI Activistमाहिती अधिकार कार्यकर्ता