शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

नागपूर त्रस्त; चालू वर्षातील सर्वाधिक तापमान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2019 09:40 IST

शनिवारी तासभर झालेल्या वादळी पावसामुळे नागरिकांना थोडा दिलासा मिळाला परंतु तो फार काळ टिकू शकला नाही. केवळ २४ तासातच कमाल तापमान रेकॉर्ड ३.२ डिग्रीने वाढून ४७ डिग्रीवर पोहचले आहे.

ठळक मुद्देनवतपाची ‘उष्ण’ लाट२४ तासात ३.२ डिग्रीने चढला पारा ३० एप्रिल ४६.३ डिग्री सेल्सिअस २८ मे ४७.५ डिग्री सेल्सिअस ०२ जून ४७ डिग्री सेल्सिअस

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शनिवारी तासभर झालेल्या वादळी पावसामुळे नागरिकांना थोडा दिलासा मिळाला परंतु तो फार काळ टिकू शकला नाही. केवळ २४ तासातच कमाल तापमान रेकॉर्ड ३.२ डिग्रीने वाढून ४७ डिग्रीवर पोहचले आहे. चंद्रपूरच्या ब्रह्मपुरीमध्येही तापमान ४७ डिग्री इतके होते. नागपूर आणि ब्रह्मपुरी हे रविवारी विदर्भात सर्वाधिक उष्ण राहिले.या मोसमात नागपूरचे तापमान दुसऱ्यांदा ४७ डिग्री सेल्सिअसवर पोहोले आहे. नवतपाचा आज शेवटचा दिवस होता. परंतु येत्या आठवडाभर नागरिकांना भीषण उष्णता सहन करवी लागणार आहे. हवामान विभागानेही याला दुजोरा दिला असून सोमवारी विदर्भातील बहुतांश भागात रेड अलर्ट जारी केले आहे. नवतपा लागल्यापासून नागपूरसह विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट आहेत.नागपुरात नवतपाच्या चौथ्या दिवशी २८ मे रोजी कमाल तापमान ४७.५ डिग्री सेल्सिअसवर पोहोचले होते. पाच दिवसानंतर पुन्हा तापमान ४७ डिग्रीवर पोहोचल्याने जनजीवन प्रभावित झाले आहे. पारा सरासरीपेक्षा पाच डिग्री अधिक असल्याने घामाच्या धारा वाहू लागल्या आहेत. रविवारी सकाळपासूनच उन्हाचे चटके बसू लागले. ढगांमुळे उकाड्यानेही त्रस्त केले होते. हवामान विभागानुसार ८ जूनपर्यंत नागपुरातील तापमान ४६ डिग्री सेल्सिअसपर्यंत राहण्याची शक्यता आहे.३ जून रोजी नागपूरसह विदर्भातील अनेक भागांमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर उर्वरित दिवसांसाठी आॅरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. या कालावधीमध्ये पारा सरासरीपेक्षा तीन ते पाच डिग्रीपेक्षा अधिक राहतो. अशा परिस्थितीत थेट उन्हात जाऊ नये, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे.

रात्रीच्या तापमानात घटगेल्या २४ तासात नागपुरातील रात्रीचे तापमान ६.५ डिग्रीने खाली उतरले आहे. रविवारी किमान तापमान २६.३ डिग्री सेल्सिअस नोंदविण्यात आले आहे.

टॅग्स :Summer Specialसमर स्पेशलTemperatureतापमान